शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सांगली- कोल्हापूरचा महापूर केंद्र सरकारकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:49 IST

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना महापुराने जोरदार फटका दिला, सुमारे २५ हजार कोटी रुपयांहून अधिक ...

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना महापुराने जोरदार फटका दिला, सुमारे २५ हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे, मात्र केंद्र सरकारने याची नोंद घेतलेली नसून शेजारच्या कर्नाटकातील पूरग्रस्त भागात मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने खास शिष्टमंडळ पाठवून नुकसानीचा आढावा घेण्यात येत आहे.दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यातील सर्वच नद्यांना ५ आॅगस्टपासून सलग दहा दिवस अनेक गावे आणि शहरांना महापुराने वेढले होते. सांगली आणि कोल्हापूर ही शहरेही पाण्याने वेढली गेली. जवळपास वीस नद्यांना पूर आला. त्याचे महाप्रलयी महापुरात रुपांतर होत हजारो एकर शेती पाण्याखाली गेली. कोट्यवधी रुपयांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. हजारो घरांची पडझड झाली. बाजारपेठांचे प्रचंड नुकसान झाले. सरकारी मालमत्ताही या महापुराने उद्ध्वस्त झाली.राज्य सरकारने या महापुरामुळे बाधित झालेल्यांना तातडीची सानुग्रह अनुदान देण्यास सुरूवात केली. शेती आणि व्यापार उद्योगांचे झालेल्या नुकसानीचा पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, या महापुराची केंद्र शासनाकडून अजिबात दखल घेण्यात आली नाही. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नुकसानीचा प्राथमिक अंदाज सुमारे सहा हजार कोटी असल्याचा अंदाज व्यक्त करून त्यापैकी चार हजार कोटी रुपये केंद्र शासनाकडून मदत मागितली जाईल, असे सांगण्यात आले.याउलट केंद्र सरकारला या महापुराच्या गंभीर परिणामांची जाणिव करून देण्यात राज्य सरकारने कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. शेजारच्या कर्नाटक राज्याने मात्र कृष्णा खोºयात आलेल्या या महापुराची गांभिर्याने नोंद घेतली. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दोन आठवड्यात तीनवेळा उत्तर कर्नाटकातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. विभागीय पातळीवर तातडीच्या बैठका घेतल्या. केंद्र सरकारला या महाप्रलयी महापुरामुळे झालेल्या हानीची कल्पना दिली. परिणामी चार केंद्रीय मंत्र्यांनी बेळगाव, बागलकोट, विजापूर, धारवाड आदी जिल्ह्यांचा दौरा करून पूरग्रस्त भागांची पाहणी केली.दरम्यान, राज्य सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाने संयुक्त सचिव श्री. प्रकाश यांच्या नेतृत्त्वाखाली अधिकाऱ्यांची एक समिती तातडीने कर्नाटकातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पाठविली. गेल्या शनिवारपासून सलग चार दिवस सीमावर्ती बेळगाव, विजापूर, बागलकोट या जिल्ह्यांसह धारवाड तसेच हावेरी, कारवार आदी जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांना भेटी देऊन महापुराने झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला. कर्नाटकाने तातडीने पावले उचलल्याने केंद्र सरकारने याची नोंद घेऊन उच्च अधिकार समिती पाठविली आहे. महाराष्ट्रात मात्र सत्ताधारी भाजपपासून विरोधी पक्षदेखील निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंतले आहेत. त्यांनीदेखील याची मागणी लावून धरलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने दखलही घेतलेली नाही.