शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

सांगली- कोल्हापूरचा महापूर केंद्र सरकारकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:49 IST

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना महापुराने जोरदार फटका दिला, सुमारे २५ हजार कोटी रुपयांहून अधिक ...

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना महापुराने जोरदार फटका दिला, सुमारे २५ हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे, मात्र केंद्र सरकारने याची नोंद घेतलेली नसून शेजारच्या कर्नाटकातील पूरग्रस्त भागात मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने खास शिष्टमंडळ पाठवून नुकसानीचा आढावा घेण्यात येत आहे.दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यातील सर्वच नद्यांना ५ आॅगस्टपासून सलग दहा दिवस अनेक गावे आणि शहरांना महापुराने वेढले होते. सांगली आणि कोल्हापूर ही शहरेही पाण्याने वेढली गेली. जवळपास वीस नद्यांना पूर आला. त्याचे महाप्रलयी महापुरात रुपांतर होत हजारो एकर शेती पाण्याखाली गेली. कोट्यवधी रुपयांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. हजारो घरांची पडझड झाली. बाजारपेठांचे प्रचंड नुकसान झाले. सरकारी मालमत्ताही या महापुराने उद्ध्वस्त झाली.राज्य सरकारने या महापुरामुळे बाधित झालेल्यांना तातडीची सानुग्रह अनुदान देण्यास सुरूवात केली. शेती आणि व्यापार उद्योगांचे झालेल्या नुकसानीचा पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, या महापुराची केंद्र शासनाकडून अजिबात दखल घेण्यात आली नाही. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नुकसानीचा प्राथमिक अंदाज सुमारे सहा हजार कोटी असल्याचा अंदाज व्यक्त करून त्यापैकी चार हजार कोटी रुपये केंद्र शासनाकडून मदत मागितली जाईल, असे सांगण्यात आले.याउलट केंद्र सरकारला या महापुराच्या गंभीर परिणामांची जाणिव करून देण्यात राज्य सरकारने कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. शेजारच्या कर्नाटक राज्याने मात्र कृष्णा खोºयात आलेल्या या महापुराची गांभिर्याने नोंद घेतली. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दोन आठवड्यात तीनवेळा उत्तर कर्नाटकातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. विभागीय पातळीवर तातडीच्या बैठका घेतल्या. केंद्र सरकारला या महाप्रलयी महापुरामुळे झालेल्या हानीची कल्पना दिली. परिणामी चार केंद्रीय मंत्र्यांनी बेळगाव, बागलकोट, विजापूर, धारवाड आदी जिल्ह्यांचा दौरा करून पूरग्रस्त भागांची पाहणी केली.दरम्यान, राज्य सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाने संयुक्त सचिव श्री. प्रकाश यांच्या नेतृत्त्वाखाली अधिकाऱ्यांची एक समिती तातडीने कर्नाटकातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पाठविली. गेल्या शनिवारपासून सलग चार दिवस सीमावर्ती बेळगाव, विजापूर, बागलकोट या जिल्ह्यांसह धारवाड तसेच हावेरी, कारवार आदी जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांना भेटी देऊन महापुराने झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला. कर्नाटकाने तातडीने पावले उचलल्याने केंद्र सरकारने याची नोंद घेऊन उच्च अधिकार समिती पाठविली आहे. महाराष्ट्रात मात्र सत्ताधारी भाजपपासून विरोधी पक्षदेखील निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंतले आहेत. त्यांनीदेखील याची मागणी लावून धरलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने दखलही घेतलेली नाही.