शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

सांगली--‘डीसीसी’ची हलगी

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

जिल्ह्यातल्या तमाम दादा, अण्णा, काका, भाऊ, तात्या आणि साहेब मंडळींनी बँकेवर डोळा ठेवलाय. इस्लामपूरच्या साहेबांचं तोंडसुद्धा न बघणाऱ्या मदनभाऊंनी थेट इस्लामपूरकरांच्या मांडीला मांडी लावून हातमिळवणी

सांगली डीसीसी बँकेची निवडणूक जेमतेम आठवड्यावर आलीय. काल म्हणे ‘डीसीसी’चा मराठी लाँगफॉर्म ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ याऐवजी ‘डब्यात चाललेली चोरांची बँक’ असा कुणीतरी केल्याची आवई उठली! तसा बोर्डही मागच्या बोळात गुपचूप लावला गेला म्हणे! (जतच्या जगताप साहेबांना विचारायला पाहिजे. असल्या भन्नाट आयडीया त्यांनाच सुचतात!)... असं असलं तरी जिल्ह्यातल्या तमाम दादा, अण्णा, काका, भाऊ, तात्या आणि साहेब मंडळींनी बँकेवर डोळा ठेवलाय.कालपरवापर्यंत इस्लामपूरच्या साहेबांचं तोंडसुद्धा न बघणाऱ्या मदनभाऊंनी थेट इस्लामपूरकरांच्या मांडीला मांडी लावून हातमिळवणी केली. यात संजयकाका आणि जगताप साहेबांची चतुराई कामी आली, पण यामुळं सोनसळचे साहेब जाम चिडले. त्यांनी विशालदादाला हाताशी धरून नवं पॅनेल उतरवलं. अर्थात दोन ठिकाणी माणसं मिळाली नाहीत आणि दोन जागांवर ‘अभद्र युती’ची (हे मोहनशेठचं म्हणणं हं.) माणसं बिनविरोध निवडून आल्यानं चार जागांनी ते मागं राहिलेत, ही गोष्ट अलाहिदा. मोहनशेठ, विशालदादा आणि सोनसळच्या साहेबांचा संताप तसा सात्विकच! कारण मदनभाऊंच्या साथीनं संजयकाका आणि जगताप साहेबांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवला आणि त्यामुळं इस्लामपूरच्या साहेबांना गुदगुल्या झाल्या. मग तो संताप सात्विक नसेल तरच नवल! खरं तर त्यांना एकत्र पॅनेलमध्ये घेतलं असतं तर एवढं आकांडतांडव केलं असतं का? (हे म्हणणं मात्र दिलीपतात्यांचं बरं का!) उलट सगळ्यांनी हातात हात घालून ‘व्हिक्टरी’ची दोन बोटं वर करत वाकुल्या दाखवल्या असत्या. मागच्या निवडणुकीत असंच झालं नव्हतं का! सगळ्यांनी जागा वाटून घेतल्या (नव्हे खाल्ल्या) होत्या. अपवाद फक्त विशालदादाचा. त्यावेळी इस्लामपूरकरांच्या खेळीनं ‘महाभारत’ घडलं होतं. भाऊंचे शिलेदार जमादारसरांनी विशालदादांना आस्मान दाखवलं होतं. आता तर एका गटात एकही सोसायटी हातात नसताना थेट मदनभाऊंशी झुंजायला लागतंय... तर दुसऱ्या गटात आर. आर. आबांच्या सुरेशभाऊंशी कुस्ती लागलीय. काही झालं तरी दादा घराण्याच्या पदरी नामुष्की आहेच.तसं पॅनेलच्या जुळवाजुळवीआधी सोनसळच्या साहेबांनी कमळाबाईला सोबत न घेण्याचा सल्ला इस्लामपूरकरांना दिला होता. त्यात त्यांचा रोख संजयकाका आणि जगताप साहेबांवर होता... पण खेळी तिथंच उलटली. आधीच तासगाव आणि नागेवाडीच्या कारखान्यावरून संजयकाका त्यांच्यावर खार खाऊन आहेत, तर जतमधील पाहुण्या-रावळ्यांच्या राजकारणामुळं जगताप साहेब आणि कदम मंडळींतून विस्तव जात नाही. त्यात सोनसळच्या साहेबांनी कमळाबाईला सोबत न घेण्याचा सल्ला दिला... तोही इस्लामपूरकरांना! कमळाबाई आणि इस्लामपूरकरांचं नातं माहीत असताना सोनसळच्या साहेबांनी असं करावं? झालं! ते सांगलीत यायच्या आधीच मध्यानरात्री काका आणि जगताप साहेबांनी भाऊंना पटवलं. महापालिकेचं एकमेव सत्ताकेंद्र हातात असलेल्या भाऊंनी नमतं घेत इस्लामपूरकरांशी जुळवून घेतलं. दोनदा आमदारकी हुकलीय, पुढं बाजार समितीचं इलेक्शन आलंय. परत काही ‘वाईटवंगाळ’ व्हायला नको, असा विचार भाऊंनी केलाय म्हणे. (काल सोनसळच्या साहेबांनीही हेच सांगितलं...) इस्लामपूरकरांनाही नेमकं हेच पाहिजे होतं. एका दगडात त्यांनी पाखरांचा थवाच खाली पाडलाय. यंदा त्यांनी मानसिंगभाऊ, दिलीपतात्यांना बिनविरोध निवडून आणलंय. मानसिंगभाऊंना बँकेचं ‘चेअरमन’पद देऊन पुनर्वसन करण्याचा बेत दिसतोय, असं घड्याळवाले सांगताहेत... पण ते पुढच्या पुढं. तूर्त तरी संजयकाकांच्या भाषेत ही हलगी तापलीय. आता वाजंलही... त्याला घुमक्याची साथ मिळंल आणि त्यावर दादा, अण्णा, काका, भाऊ, तात्या, साहेब मंडळी झिम्माड लेझीम खेळायला लागतील...जाता-जाता : शिराळ्याचे नाईक साहेब वेळीच सावध झाल्यानं त्यांच्या रणधीरला बाद करायचा डाव मात्र उधळून लावला गेला. कमळाबाईशी इमान राखत (...आणि इस्लामपूरकरांची खेळी ओळखत) त्यांनी सोनसळकरांच्या पॅनेलकडं पाठ फिरवली. विट्याच्या सदाभाऊंचे चिरंजीव वैभवरावांनीही सोनसळकरांचा हात झिडकारला. कारण सोनसळकर आणि अनिलभाऊंची ‘फिक्सिंग’ त्यांना विधानसभेपासून सलतीय. यात घोरपडे सरकारांचा मात्र पुरता ‘मामा’ झाला. कमळाबाईच्या यादीतून त्यांचं नाव कापलं गेलं. (काकांनीच ही ‘गेम’ केल्याची कुजबूज कवठ्याच्या दूध संघात ऐकायला येतेय...) म्हणून सरकारांनी आपला मोहरा सोनसळकरांच्या पॅनेलमधून पुढं केलाय. ‘जाने कहाँ गये वो दिन...’ असं गाणं हल्ली त्यांच्या ‘स्कॉर्पिओ’मध्ये सारखं लावलं जातंय...- श्रीनिवास नागे