शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सांगली--‘डीसीसी’ची हलगी

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

जिल्ह्यातल्या तमाम दादा, अण्णा, काका, भाऊ, तात्या आणि साहेब मंडळींनी बँकेवर डोळा ठेवलाय. इस्लामपूरच्या साहेबांचं तोंडसुद्धा न बघणाऱ्या मदनभाऊंनी थेट इस्लामपूरकरांच्या मांडीला मांडी लावून हातमिळवणी

सांगली डीसीसी बँकेची निवडणूक जेमतेम आठवड्यावर आलीय. काल म्हणे ‘डीसीसी’चा मराठी लाँगफॉर्म ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ याऐवजी ‘डब्यात चाललेली चोरांची बँक’ असा कुणीतरी केल्याची आवई उठली! तसा बोर्डही मागच्या बोळात गुपचूप लावला गेला म्हणे! (जतच्या जगताप साहेबांना विचारायला पाहिजे. असल्या भन्नाट आयडीया त्यांनाच सुचतात!)... असं असलं तरी जिल्ह्यातल्या तमाम दादा, अण्णा, काका, भाऊ, तात्या आणि साहेब मंडळींनी बँकेवर डोळा ठेवलाय.कालपरवापर्यंत इस्लामपूरच्या साहेबांचं तोंडसुद्धा न बघणाऱ्या मदनभाऊंनी थेट इस्लामपूरकरांच्या मांडीला मांडी लावून हातमिळवणी केली. यात संजयकाका आणि जगताप साहेबांची चतुराई कामी आली, पण यामुळं सोनसळचे साहेब जाम चिडले. त्यांनी विशालदादाला हाताशी धरून नवं पॅनेल उतरवलं. अर्थात दोन ठिकाणी माणसं मिळाली नाहीत आणि दोन जागांवर ‘अभद्र युती’ची (हे मोहनशेठचं म्हणणं हं.) माणसं बिनविरोध निवडून आल्यानं चार जागांनी ते मागं राहिलेत, ही गोष्ट अलाहिदा. मोहनशेठ, विशालदादा आणि सोनसळच्या साहेबांचा संताप तसा सात्विकच! कारण मदनभाऊंच्या साथीनं संजयकाका आणि जगताप साहेबांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवला आणि त्यामुळं इस्लामपूरच्या साहेबांना गुदगुल्या झाल्या. मग तो संताप सात्विक नसेल तरच नवल! खरं तर त्यांना एकत्र पॅनेलमध्ये घेतलं असतं तर एवढं आकांडतांडव केलं असतं का? (हे म्हणणं मात्र दिलीपतात्यांचं बरं का!) उलट सगळ्यांनी हातात हात घालून ‘व्हिक्टरी’ची दोन बोटं वर करत वाकुल्या दाखवल्या असत्या. मागच्या निवडणुकीत असंच झालं नव्हतं का! सगळ्यांनी जागा वाटून घेतल्या (नव्हे खाल्ल्या) होत्या. अपवाद फक्त विशालदादाचा. त्यावेळी इस्लामपूरकरांच्या खेळीनं ‘महाभारत’ घडलं होतं. भाऊंचे शिलेदार जमादारसरांनी विशालदादांना आस्मान दाखवलं होतं. आता तर एका गटात एकही सोसायटी हातात नसताना थेट मदनभाऊंशी झुंजायला लागतंय... तर दुसऱ्या गटात आर. आर. आबांच्या सुरेशभाऊंशी कुस्ती लागलीय. काही झालं तरी दादा घराण्याच्या पदरी नामुष्की आहेच.तसं पॅनेलच्या जुळवाजुळवीआधी सोनसळच्या साहेबांनी कमळाबाईला सोबत न घेण्याचा सल्ला इस्लामपूरकरांना दिला होता. त्यात त्यांचा रोख संजयकाका आणि जगताप साहेबांवर होता... पण खेळी तिथंच उलटली. आधीच तासगाव आणि नागेवाडीच्या कारखान्यावरून संजयकाका त्यांच्यावर खार खाऊन आहेत, तर जतमधील पाहुण्या-रावळ्यांच्या राजकारणामुळं जगताप साहेब आणि कदम मंडळींतून विस्तव जात नाही. त्यात सोनसळच्या साहेबांनी कमळाबाईला सोबत न घेण्याचा सल्ला दिला... तोही इस्लामपूरकरांना! कमळाबाई आणि इस्लामपूरकरांचं नातं माहीत असताना सोनसळच्या साहेबांनी असं करावं? झालं! ते सांगलीत यायच्या आधीच मध्यानरात्री काका आणि जगताप साहेबांनी भाऊंना पटवलं. महापालिकेचं एकमेव सत्ताकेंद्र हातात असलेल्या भाऊंनी नमतं घेत इस्लामपूरकरांशी जुळवून घेतलं. दोनदा आमदारकी हुकलीय, पुढं बाजार समितीचं इलेक्शन आलंय. परत काही ‘वाईटवंगाळ’ व्हायला नको, असा विचार भाऊंनी केलाय म्हणे. (काल सोनसळच्या साहेबांनीही हेच सांगितलं...) इस्लामपूरकरांनाही नेमकं हेच पाहिजे होतं. एका दगडात त्यांनी पाखरांचा थवाच खाली पाडलाय. यंदा त्यांनी मानसिंगभाऊ, दिलीपतात्यांना बिनविरोध निवडून आणलंय. मानसिंगभाऊंना बँकेचं ‘चेअरमन’पद देऊन पुनर्वसन करण्याचा बेत दिसतोय, असं घड्याळवाले सांगताहेत... पण ते पुढच्या पुढं. तूर्त तरी संजयकाकांच्या भाषेत ही हलगी तापलीय. आता वाजंलही... त्याला घुमक्याची साथ मिळंल आणि त्यावर दादा, अण्णा, काका, भाऊ, तात्या, साहेब मंडळी झिम्माड लेझीम खेळायला लागतील...जाता-जाता : शिराळ्याचे नाईक साहेब वेळीच सावध झाल्यानं त्यांच्या रणधीरला बाद करायचा डाव मात्र उधळून लावला गेला. कमळाबाईशी इमान राखत (...आणि इस्लामपूरकरांची खेळी ओळखत) त्यांनी सोनसळकरांच्या पॅनेलकडं पाठ फिरवली. विट्याच्या सदाभाऊंचे चिरंजीव वैभवरावांनीही सोनसळकरांचा हात झिडकारला. कारण सोनसळकर आणि अनिलभाऊंची ‘फिक्सिंग’ त्यांना विधानसभेपासून सलतीय. यात घोरपडे सरकारांचा मात्र पुरता ‘मामा’ झाला. कमळाबाईच्या यादीतून त्यांचं नाव कापलं गेलं. (काकांनीच ही ‘गेम’ केल्याची कुजबूज कवठ्याच्या दूध संघात ऐकायला येतेय...) म्हणून सरकारांनी आपला मोहरा सोनसळकरांच्या पॅनेलमधून पुढं केलाय. ‘जाने कहाँ गये वो दिन...’ असं गाणं हल्ली त्यांच्या ‘स्कॉर्पिओ’मध्ये सारखं लावलं जातंय...- श्रीनिवास नागे