शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

सांगली--‘डीसीसी’ची हलगी

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

जिल्ह्यातल्या तमाम दादा, अण्णा, काका, भाऊ, तात्या आणि साहेब मंडळींनी बँकेवर डोळा ठेवलाय. इस्लामपूरच्या साहेबांचं तोंडसुद्धा न बघणाऱ्या मदनभाऊंनी थेट इस्लामपूरकरांच्या मांडीला मांडी लावून हातमिळवणी

सांगली डीसीसी बँकेची निवडणूक जेमतेम आठवड्यावर आलीय. काल म्हणे ‘डीसीसी’चा मराठी लाँगफॉर्म ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ याऐवजी ‘डब्यात चाललेली चोरांची बँक’ असा कुणीतरी केल्याची आवई उठली! तसा बोर्डही मागच्या बोळात गुपचूप लावला गेला म्हणे! (जतच्या जगताप साहेबांना विचारायला पाहिजे. असल्या भन्नाट आयडीया त्यांनाच सुचतात!)... असं असलं तरी जिल्ह्यातल्या तमाम दादा, अण्णा, काका, भाऊ, तात्या आणि साहेब मंडळींनी बँकेवर डोळा ठेवलाय.कालपरवापर्यंत इस्लामपूरच्या साहेबांचं तोंडसुद्धा न बघणाऱ्या मदनभाऊंनी थेट इस्लामपूरकरांच्या मांडीला मांडी लावून हातमिळवणी केली. यात संजयकाका आणि जगताप साहेबांची चतुराई कामी आली, पण यामुळं सोनसळचे साहेब जाम चिडले. त्यांनी विशालदादाला हाताशी धरून नवं पॅनेल उतरवलं. अर्थात दोन ठिकाणी माणसं मिळाली नाहीत आणि दोन जागांवर ‘अभद्र युती’ची (हे मोहनशेठचं म्हणणं हं.) माणसं बिनविरोध निवडून आल्यानं चार जागांनी ते मागं राहिलेत, ही गोष्ट अलाहिदा. मोहनशेठ, विशालदादा आणि सोनसळच्या साहेबांचा संताप तसा सात्विकच! कारण मदनभाऊंच्या साथीनं संजयकाका आणि जगताप साहेबांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवला आणि त्यामुळं इस्लामपूरच्या साहेबांना गुदगुल्या झाल्या. मग तो संताप सात्विक नसेल तरच नवल! खरं तर त्यांना एकत्र पॅनेलमध्ये घेतलं असतं तर एवढं आकांडतांडव केलं असतं का? (हे म्हणणं मात्र दिलीपतात्यांचं बरं का!) उलट सगळ्यांनी हातात हात घालून ‘व्हिक्टरी’ची दोन बोटं वर करत वाकुल्या दाखवल्या असत्या. मागच्या निवडणुकीत असंच झालं नव्हतं का! सगळ्यांनी जागा वाटून घेतल्या (नव्हे खाल्ल्या) होत्या. अपवाद फक्त विशालदादाचा. त्यावेळी इस्लामपूरकरांच्या खेळीनं ‘महाभारत’ घडलं होतं. भाऊंचे शिलेदार जमादारसरांनी विशालदादांना आस्मान दाखवलं होतं. आता तर एका गटात एकही सोसायटी हातात नसताना थेट मदनभाऊंशी झुंजायला लागतंय... तर दुसऱ्या गटात आर. आर. आबांच्या सुरेशभाऊंशी कुस्ती लागलीय. काही झालं तरी दादा घराण्याच्या पदरी नामुष्की आहेच.तसं पॅनेलच्या जुळवाजुळवीआधी सोनसळच्या साहेबांनी कमळाबाईला सोबत न घेण्याचा सल्ला इस्लामपूरकरांना दिला होता. त्यात त्यांचा रोख संजयकाका आणि जगताप साहेबांवर होता... पण खेळी तिथंच उलटली. आधीच तासगाव आणि नागेवाडीच्या कारखान्यावरून संजयकाका त्यांच्यावर खार खाऊन आहेत, तर जतमधील पाहुण्या-रावळ्यांच्या राजकारणामुळं जगताप साहेब आणि कदम मंडळींतून विस्तव जात नाही. त्यात सोनसळच्या साहेबांनी कमळाबाईला सोबत न घेण्याचा सल्ला दिला... तोही इस्लामपूरकरांना! कमळाबाई आणि इस्लामपूरकरांचं नातं माहीत असताना सोनसळच्या साहेबांनी असं करावं? झालं! ते सांगलीत यायच्या आधीच मध्यानरात्री काका आणि जगताप साहेबांनी भाऊंना पटवलं. महापालिकेचं एकमेव सत्ताकेंद्र हातात असलेल्या भाऊंनी नमतं घेत इस्लामपूरकरांशी जुळवून घेतलं. दोनदा आमदारकी हुकलीय, पुढं बाजार समितीचं इलेक्शन आलंय. परत काही ‘वाईटवंगाळ’ व्हायला नको, असा विचार भाऊंनी केलाय म्हणे. (काल सोनसळच्या साहेबांनीही हेच सांगितलं...) इस्लामपूरकरांनाही नेमकं हेच पाहिजे होतं. एका दगडात त्यांनी पाखरांचा थवाच खाली पाडलाय. यंदा त्यांनी मानसिंगभाऊ, दिलीपतात्यांना बिनविरोध निवडून आणलंय. मानसिंगभाऊंना बँकेचं ‘चेअरमन’पद देऊन पुनर्वसन करण्याचा बेत दिसतोय, असं घड्याळवाले सांगताहेत... पण ते पुढच्या पुढं. तूर्त तरी संजयकाकांच्या भाषेत ही हलगी तापलीय. आता वाजंलही... त्याला घुमक्याची साथ मिळंल आणि त्यावर दादा, अण्णा, काका, भाऊ, तात्या, साहेब मंडळी झिम्माड लेझीम खेळायला लागतील...जाता-जाता : शिराळ्याचे नाईक साहेब वेळीच सावध झाल्यानं त्यांच्या रणधीरला बाद करायचा डाव मात्र उधळून लावला गेला. कमळाबाईशी इमान राखत (...आणि इस्लामपूरकरांची खेळी ओळखत) त्यांनी सोनसळकरांच्या पॅनेलकडं पाठ फिरवली. विट्याच्या सदाभाऊंचे चिरंजीव वैभवरावांनीही सोनसळकरांचा हात झिडकारला. कारण सोनसळकर आणि अनिलभाऊंची ‘फिक्सिंग’ त्यांना विधानसभेपासून सलतीय. यात घोरपडे सरकारांचा मात्र पुरता ‘मामा’ झाला. कमळाबाईच्या यादीतून त्यांचं नाव कापलं गेलं. (काकांनीच ही ‘गेम’ केल्याची कुजबूज कवठ्याच्या दूध संघात ऐकायला येतेय...) म्हणून सरकारांनी आपला मोहरा सोनसळकरांच्या पॅनेलमधून पुढं केलाय. ‘जाने कहाँ गये वो दिन...’ असं गाणं हल्ली त्यांच्या ‘स्कॉर्पिओ’मध्ये सारखं लावलं जातंय...- श्रीनिवास नागे