शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

संगीता खाडे यांची हकालपट्टी करा

By admin | Updated: June 4, 2017 01:26 IST

श्रीपूजकांची मागणी : अंबाबाई मूर्ती लेपप्रकरणी श्रीपूजकांच्या बदनामीचे षड्यंत्रल्

ोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी अभिषेक बंदपासून आर्द्रता नियंत्रणात आणण्यापर्यंतच्या उपाययोजना श्रीपूजकांनी केल्या आहेत. मात्र, श्रीपूजक मूर्तीची काळजी घेत नाहीत, पावित्र्य राखत नाहीत, असे आरोप केले जात आहेत. देवस्थानच्या सदस्या संगीता खाडे यांनी श्रीपूजकांबद्दल बेजबाबदार वक्तव्ये करून समाजात क्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची देवस्थानच्या सदस्यपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती करवीरनिवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या सदस्यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार बैठकीत दिली. ‘अंबाबाई मूर्तीवर पडलेले पांढरे डाग आणि तिची झीज’ या विषयावर गेल्या आठ दिवसांपासून वादंग निर्माण झाले होते. अखेर शुक्रवारी (दि. २) ‘पुरातत्त्व’चे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांनी मूर्ती अंतर्गतरीत्या सुस्थितीत असून, पांढगे डाग घालवून झीज रोखण्यासाठी पुन्हा एकदा संवर्धन प्रक्रिया करावी लागेल, असा निर्वाळा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्वर, अ‍ॅड. केदार मुनीश्वर, नगरसेवक अजित ठाणेकर, शिरीष मुनीश्वर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. ठाणेकर म्हणाले, दानपेटी वगळता देवस्थान आणि श्रीपूजकांमध्ये कोणतेही वाद नाहीत. देवस्थान समितीवर दोन वेळा सदस्य म्हणून गेलेल्या संगीता खाडे यांच्या चुकीच्या वागण्यामुळेच पूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी त्यांना बाजूला ठेवले होते. आता त्यांनी हीन शब्दांत श्रीपूजकांची नाहक बदनामी केली आहे. केदार मुनीश्वर म्हणाले, श्रीपूजक, देवस्थान समिती आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने अंबाबाई मूर्तीवर २०१५ साली रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली. गेल्या काही दिवसांत श्रीपूजक मूर्तीची काळजी घेत नाहीत, आर्द्रतेचे नियम अमलात आणत नाहीत, असे आरोप केले. मात्र, मिश्रा यांच्यामुळेच त्यावर उत्तर मिळाले आहे. मूर्तीची झीज थांबविण्यासाठी श्रीपूजकांनीच १९७० साली व १९९७ साली अभिषेक पूर्णत: बंद केले. मात्र, त्यातील अनेक बाबी देवस्थान समितीच्या अखत्यारीत आहेत. त्या सगळ्यांची तातडीने पूर्तता करणे, फरशा काढणे, आदींसाठी काही कालावधी लागणार आहे. संवर्धन झाल्यापासून काही संस्था, संघटना विवाद निर्माण करीत आहे. हे मंदिर भक्तीचे क्षेत्र आहे, रणक्षेत्र नाही; संघटनेच्या नेत्यांनी चर्चात्मक पवित्रा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सिंग यांना परवानगी साठे यांच्याकडूनचनिवृत्त झालेल्या मनेजर सिंग यांना श्रीपूजकांनी मूर्तीला हात कसा लावू दिला? या प्रश्नावर केदार मुनीश्वर म्हणाले, सिंग खासगी दौऱ्यासाठी जात असताना कोल्हापुरात आले. यावेळी त्यांनी मी सोबत संवर्धनाचे साहित्य आणले असून, मूर्तीवर थर देऊ का? असे विचारले असता माधव मुनीश्वर यांनी देवस्थानची परवानगी घ्या, असे सांगितले. त्यानंतर सिंग यांनी दोन तास देवस्थानच्या कार्यालयात तत्कालीन सचिव शुभांगी साठे यांच्याशी चर्चा केली आणि साठे यांनीच त्यांना परवानगी दिल्यानंतर आम्ही हे काम करू दिले. तेव्हा आम्हाला ते निवृत्त झाले होते हे माहीत नव्हते. मात्र, त्यांनी ही बाब सदस्यांना व प्रशासनाला का सांगितली नाही, हे आम्हाला माहीत नाही. नागचिन्हाबाबत सकारात्मकच : नागचिन्ह घडवू नये यासाठी आम्ही कोणावरही दबाव टाकला नव्हता. आम्ही व मूर्ती अभ्यासकांनीही सगळे संदर्भ, छायाचित्रे दिली होती. मॉडेल म्हणून एका कलाकाराने घडविलेली मूर्तीही ते पाहून आले. तरीही त्यांनी नागचिन्ह का घडविले नाही, हे आम्हाला माहीत नाही. त्यानंतर आम्ही नागचिन्हाबाबत समिती घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मात्र, प्रशासनाने त्यावर समितीच नेमली नाही.