शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कोल्हापुरात सनई, चौघड्यांच्या साथीने व्यवसाय सुरु, राजारामपुरीत रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ बंद असलेली कोल्हापूर शहरातील सर्वप्रकारची व्यावसायिक दुकाने सोमवारी ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ बंद असलेली कोल्हापूर शहरातील सर्वप्रकारची व्यावसायिक दुकाने सोमवारी सुरु झाली. प्रशासनाने निर्बंध उठवल्यामुळे राजारामपुरीत व्यापारी, दुकानदारांनी बैलगाडीतून सनई, चौघड्यांसह रॅली काढून व्यवसाय सुरु झाल्याचा आनंद व्यक्त केला. सर्व व्यवसाय सुरु झाल्याने अनेक दिवसांपासून रिकामे वाटणारे रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली.

कोल्हापूर जिल्ह्यात पहिली लाट ओसरल्यानंतर साधारणपणे नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये कोल्हापुरातील सर्व व्यवसाय सुरु झाले. परंतु, व्यावसायिक, व्यापारी यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. एप्रिलपासून कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्याने पुन्हा व्यवसाय बंद ठेवावे लागले. शासनाचे निर्बंध, जनता कर्फ्यू, संपूर्ण लॉकडाऊन अशा विविध कारणांनी गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील अनेक दुकाने बंद होती. ती सुरु करावीत, असा व्यापाऱ्यांचा तगादा सुरु होता. यासाठी निवेदने, गाठीभेटीद्वारे राज्य शासनाला विनंती करण्यात आली होती. परंतु, जोपर्यंत तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्हा येत नाही, तोपर्यंत प्रशासनाने व्यवसायाला परवानगी नाकारली होती.

अखेर सोमवारपासून जिल्हा प्रशासनाने शहरातील निर्बंध आणखी शिथील केले आणि अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह सरसकट सर्वच दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली. त्यामुळे व्यापारी, दुकानदारांमध्ये काहीसे उत्साहाचे वातावरण होते. व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरु करण्यासाठी कालपासूनच तयारी सुरु केली होती. दुकानांच्या साफसफाईसह पूजेची तयारी केली होती. सोमवारी सकाळी व्यापारी, दुकानदारांनी ‘पुन्हा असा प्रसंग येऊ नये’, अशी भावना व्यक्त करत दुकानात पाऊल टाकले.

राजारामपुरीत व्यापाऱ्यांची रॅली -

प्रशासनाने निर्बंध शिथील केल्यामुळे राजारामपुरीत सकाळी व्यापाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ राजारामपुरी जनता बझार येथून रॅली काढण्यात आली. ही रॅली मुख्य मार्गावरुन मारुती मंदिर व परत बस रुटने गेली. रॅलीमध्ये सनई, चौघडा होता. व्यापाऱ्यांच्या हातात जनजागृती करणारे फलक होते. ‘मास्क नाही - प्रवेश नाही, दुकानात सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्स राखा’ अशाप्रकारचे फलक रॅलीत आणले होते. या रॅलीत ललित गांधी, अनिल पिंजाणी, शाम बासरानी, दीपक पुरोहित, अभिजित गुजर, प्रताप पवार, प्रशांत पोकळे, रहिम सनदी, दर्शन गांधी, गजानन पवार, महेश जेवराणी, सतीश माने, भरत रावळ अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक व्यापारी सहभागी झाले होते.

- लसीकरण झालेल्या ग्राहकांना डिस्काऊंट -

राजारामपुरीत खरेदीसाठी येणाऱ्या ज्या ग्राहकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांच्यासाठी खास डिस्काऊंट देण्याचा निर्णय राजारामपुरीतील व्यापाऱ्यांनी घेतला असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली. आमचा हा प्रयत्न व्यवसाय वाढीसाठी नाही तर लसीकरणाला प्रोत्साहन मिळावे म्हणून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- शहरात वाहनांसह नागरिकांची मोठी गर्दी -

सरसकट सर्वच दुकाने सुरु झाल्यामुळे सोमवारी शहरात वाहनांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आज (मंगळवारी) आषाढी एकादशी तर उद्या बकरी ईद असल्यामुळे बाजारपेठेत सगळीकडे गर्दी झाली होती. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर, बाजारपेठेत वाहनांची कोंडी झाली होती. पार्किंगला जागा न मिळाल्याने मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या बोळांत चारचाकी वाहने लावण्याची वेळ वाहनधारकांवर आली. भरपावसात वाहतुकीची कोंडी फोडताना वाहतूक शाखेच्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.