शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

संयुक्त किसान कामगार मोर्चातर्फे २७ ला भारत बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:29 IST

इचलकरंजी : शेतकरीविरोधी तीन काळे कृषी कायदे व वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून त्या ...

इचलकरंजी : शेतकरीविरोधी तीन काळे कृषी कायदे व वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून त्या जीएसटीच्या कक्षेत आणावे. स्वामीनाथन समितीच्या शिफारसीनुसार सर्व शेतीमालाला आधारभूत किमती व सरकारी खरेदीची हमी देणारा कायदा करावा, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (दि. २७) संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने भारत बंदची घोषणा केली असल्याची माहिती प्रा. ए. बी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

भांडवलदार व मालकधार्जिणे कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द करा. कामगारांच्या कल्याणकारी कायद्यांची अंमलबजावणी करा. केंद्र व राज्य सरकारी, निमसरकारी क्षेत्रातील सर्व रिक्त जागा भरा, सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६ टक्के शिक्षणावर व ३ टक्के आरोग्यावर खर्च करून सार्वजनिक शिक्षण व आरोग्य व्यवस्था मजबूत करावी. सार्वजनिक उद्योग खासगी भांडवलदाराकडे देऊ नये. महिला, दलित, आदिवासी यांच्यावरील अत्याचारांना आळा घालावा. देशाच्या लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संविधानावरील हल्ले बंद करा, यासाठी हा लढा उभारला जात असल्याचे ते म्हणाले. देशाच्या इतिहासातील पहिलेच इतके मोठे आंदोलन सुरू आहे. शेती-शेतकरी, रोजगार व देश वाचविण्यासाठी हा संघर्ष आहे. सकाळी अकरा वाजता छत्रपती शाहू पुतळा येथून मोर्चाला सुरुवात होणार असून, गांधी पुतळा मार्गे प्रांत कार्यालय येथे निदर्शने करणार असल्याचे प्रताप होगाडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस दत्ता माने, भरमा कांबळे, हणमंत लोहार, धोंडिबा कुंभार, सदा मलाबादे, मारुती आजगेकर उपस्थित होते.

चौकट

शेतकरी, कामगार, व्यावसायिक व तरुणांना आवाहन

२७ ला भारत बंद ऐतिहासिक असून, यामध्ये अखिल भारतीय किसान सभेसह ५०० हून अधिक शेतकरी संघटना, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू ) सह १० केंद्रीय कामगार संघटना, सर्व डाव्या पुरोगामी विद्यार्थी, युवक व महिला संघटना एकवटल्या आहेत. तसेच लोकशाही, धर्मनिरपेक्षतावादी १९ राजकीय पक्षांनीही या लढ्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, व्यावसायिक व तरुणांनी भारत बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.