शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

संयुक्त किसान कामगार मोर्चातर्फे २७ ला भारत बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:29 IST

इचलकरंजी : शेतकरीविरोधी तीन काळे कृषी कायदे व वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून त्या ...

इचलकरंजी : शेतकरीविरोधी तीन काळे कृषी कायदे व वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून त्या जीएसटीच्या कक्षेत आणावे. स्वामीनाथन समितीच्या शिफारसीनुसार सर्व शेतीमालाला आधारभूत किमती व सरकारी खरेदीची हमी देणारा कायदा करावा, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (दि. २७) संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने भारत बंदची घोषणा केली असल्याची माहिती प्रा. ए. बी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

भांडवलदार व मालकधार्जिणे कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द करा. कामगारांच्या कल्याणकारी कायद्यांची अंमलबजावणी करा. केंद्र व राज्य सरकारी, निमसरकारी क्षेत्रातील सर्व रिक्त जागा भरा, सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६ टक्के शिक्षणावर व ३ टक्के आरोग्यावर खर्च करून सार्वजनिक शिक्षण व आरोग्य व्यवस्था मजबूत करावी. सार्वजनिक उद्योग खासगी भांडवलदाराकडे देऊ नये. महिला, दलित, आदिवासी यांच्यावरील अत्याचारांना आळा घालावा. देशाच्या लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संविधानावरील हल्ले बंद करा, यासाठी हा लढा उभारला जात असल्याचे ते म्हणाले. देशाच्या इतिहासातील पहिलेच इतके मोठे आंदोलन सुरू आहे. शेती-शेतकरी, रोजगार व देश वाचविण्यासाठी हा संघर्ष आहे. सकाळी अकरा वाजता छत्रपती शाहू पुतळा येथून मोर्चाला सुरुवात होणार असून, गांधी पुतळा मार्गे प्रांत कार्यालय येथे निदर्शने करणार असल्याचे प्रताप होगाडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस दत्ता माने, भरमा कांबळे, हणमंत लोहार, धोंडिबा कुंभार, सदा मलाबादे, मारुती आजगेकर उपस्थित होते.

चौकट

शेतकरी, कामगार, व्यावसायिक व तरुणांना आवाहन

२७ ला भारत बंद ऐतिहासिक असून, यामध्ये अखिल भारतीय किसान सभेसह ५०० हून अधिक शेतकरी संघटना, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू ) सह १० केंद्रीय कामगार संघटना, सर्व डाव्या पुरोगामी विद्यार्थी, युवक व महिला संघटना एकवटल्या आहेत. तसेच लोकशाही, धर्मनिरपेक्षतावादी १९ राजकीय पक्षांनीही या लढ्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, व्यावसायिक व तरुणांनी भारत बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.