शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

प्रचारात समरजित यांची आघाडी

By admin | Updated: February 17, 2017 01:04 IST

४० हून अधिक बैठका : नवोदिता घाटगेंनीही कागल पिंजून काढले

कोल्हापूर : भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या तुलनेत कागल तालुक्यात ‘शाहू’ साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी प्रचारसभा व गटांच्या बैठकी घेण्यात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आतापर्यंत त्यांनी ४० हून अधिक सभा व त्यापेक्षा दुप्पट गटांच्या बैठका घेऊन जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. त्यांच्यासमवेत नवोदिता घाटगे यांनीही तालुका पिंजून काढत थेट महिला वर्गाशी संपर्क साधल्याने कागलचे राजकारण ढवळून निघाले आहे. कागल तालुक्यात आतापर्यंत घाटगे गटाने अनेक निवडणुका लढविल्या. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे हे सक्रिय राजकारणात होते, त्यावेळी राजकारणाचा रंग काहीसा वेगळा होता. दोन गटांतच निवडणूक होत असल्याने फारशी ताणाताण करावी लागत नव्हती; पण सध्याच्या राजकारणात विकासकामांबरोबर संपर्कालाही महत्त्व आल्याने निवडणुकांची शैलीही बदलली आहे. प्रत्येक राजकीय पक्षात कोणतीही निवडणूक असू दे, उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत असतो. तो मिटविण्यात नेत्यांची निम्मी ताकद खर्च होते. त्यानंतर सभा, बैठका सुरू होतात. पण, समरजितसिंह घाटगे यांनी १४ डिसेंबरपासून सभा व बैठकांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेसाठी वातावरण निर्मितीस सुरुवात केली आहे. दोन-तीन गावांचा एक मोठा मेळावा घेत आपली भूमिका व विकासाचे व्हिजन लोकांना समजावून सांगण्यावर त्यांनी भर दिला. पहिल्या टप्प्यात त्यांनी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघनिहाय इच्छुकांचा अंदाज घेत सक्षम उमेदवारांचा शोध घेतला. त्यानंतर १७ जानेवारी ते १२ फेबु्रवारी या कालावधीत त्यांनी दुसऱ्या टप्प्यात त्यांनी सभांचा धडाकाच लावला. त्यांच्यासमवेत नवोदिता घाटगे यांनी दुसऱ्या बाजूने हळदी-कुंकू कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांशी संपर्क वाढविला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह इतर पक्षांनी गेले तीन महिने प्रचार यंत्रणा राबविलेली दिसत नाही. आतापर्यंत ४० हून अधिक सभा घेऊन प्रत्येक मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला आहे. कागल तालुक्यासारखी राजकीय ईर्षा कोठेही पाहावयास मिळत नाही, हे जरी खरे असले तरी नेत्यांची राबणूक व व्हिजन हेही तिथेच पाहावयास मिळते. (प्रतिनिधी)टीकाटिप्पणीला फाटा...जसजशी निवडणूक जवळ येईल, तशी टोकाची टीका सुरू होते; पण समरजितसिंह यांनी टीकाटिप्पणीला फाटा देत भाजप सरकारची ध्येयधोरणे व विकास यांवरच आपल्या भाषणात भर दिल्याचे दिसते.रोज चौदा तास मतदारसंघात!समरजितसिंह घाटगे यांचा सकाळी आठ वाजल्यापासून मतदारसंघातील दौरा सुरू होतो. सकाळच्या टप्प्यात तीन-चार गावांत जाऊन बैठका, कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाते. एखाद्या गावातच दुपारचे जेवण करून पुन्हा बैठकांचा धडाका सुरू होऊन रात्री दहापर्यंत ते मतदारसंघातच असतात.