शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

प्रचारात समरजित यांची आघाडी

By admin | Updated: February 17, 2017 01:04 IST

४० हून अधिक बैठका : नवोदिता घाटगेंनीही कागल पिंजून काढले

कोल्हापूर : भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या तुलनेत कागल तालुक्यात ‘शाहू’ साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी प्रचारसभा व गटांच्या बैठकी घेण्यात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आतापर्यंत त्यांनी ४० हून अधिक सभा व त्यापेक्षा दुप्पट गटांच्या बैठका घेऊन जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. त्यांच्यासमवेत नवोदिता घाटगे यांनीही तालुका पिंजून काढत थेट महिला वर्गाशी संपर्क साधल्याने कागलचे राजकारण ढवळून निघाले आहे. कागल तालुक्यात आतापर्यंत घाटगे गटाने अनेक निवडणुका लढविल्या. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे हे सक्रिय राजकारणात होते, त्यावेळी राजकारणाचा रंग काहीसा वेगळा होता. दोन गटांतच निवडणूक होत असल्याने फारशी ताणाताण करावी लागत नव्हती; पण सध्याच्या राजकारणात विकासकामांबरोबर संपर्कालाही महत्त्व आल्याने निवडणुकांची शैलीही बदलली आहे. प्रत्येक राजकीय पक्षात कोणतीही निवडणूक असू दे, उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत असतो. तो मिटविण्यात नेत्यांची निम्मी ताकद खर्च होते. त्यानंतर सभा, बैठका सुरू होतात. पण, समरजितसिंह घाटगे यांनी १४ डिसेंबरपासून सभा व बैठकांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेसाठी वातावरण निर्मितीस सुरुवात केली आहे. दोन-तीन गावांचा एक मोठा मेळावा घेत आपली भूमिका व विकासाचे व्हिजन लोकांना समजावून सांगण्यावर त्यांनी भर दिला. पहिल्या टप्प्यात त्यांनी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघनिहाय इच्छुकांचा अंदाज घेत सक्षम उमेदवारांचा शोध घेतला. त्यानंतर १७ जानेवारी ते १२ फेबु्रवारी या कालावधीत त्यांनी दुसऱ्या टप्प्यात त्यांनी सभांचा धडाकाच लावला. त्यांच्यासमवेत नवोदिता घाटगे यांनी दुसऱ्या बाजूने हळदी-कुंकू कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांशी संपर्क वाढविला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह इतर पक्षांनी गेले तीन महिने प्रचार यंत्रणा राबविलेली दिसत नाही. आतापर्यंत ४० हून अधिक सभा घेऊन प्रत्येक मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला आहे. कागल तालुक्यासारखी राजकीय ईर्षा कोठेही पाहावयास मिळत नाही, हे जरी खरे असले तरी नेत्यांची राबणूक व व्हिजन हेही तिथेच पाहावयास मिळते. (प्रतिनिधी)टीकाटिप्पणीला फाटा...जसजशी निवडणूक जवळ येईल, तशी टोकाची टीका सुरू होते; पण समरजितसिंह यांनी टीकाटिप्पणीला फाटा देत भाजप सरकारची ध्येयधोरणे व विकास यांवरच आपल्या भाषणात भर दिल्याचे दिसते.रोज चौदा तास मतदारसंघात!समरजितसिंह घाटगे यांचा सकाळी आठ वाजल्यापासून मतदारसंघातील दौरा सुरू होतो. सकाळच्या टप्प्यात तीन-चार गावांत जाऊन बैठका, कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाते. एखाद्या गावातच दुपारचे जेवण करून पुन्हा बैठकांचा धडाका सुरू होऊन रात्री दहापर्यंत ते मतदारसंघातच असतात.