शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

समीरची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव

By admin | Updated: April 16, 2016 00:49 IST

त्यामुळे दहा दिवसांपूर्वी त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा दोनवेळा दाखल केलेला जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्याने त्याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने दाखल केलेल्या अर्जावर सोमवार (दि. १८) उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ढेरे यांच्यासमोर सुनावणी होत आहे. पानसरे हत्येप्रकरणी दि. १४ डिसेंबर २०१५ रोजी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात समीर गायकवाडवर दोषारोपपत्र दाखल झाले. पोलिसांनी समीरविरोधात ३९२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केल्याने हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग केला. त्यानंतर समीरचे वकील एस. व्ही. पटवर्धन यांनी दि. १८ जानेवारीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला. त्यावर तपासी अधिकारी चैतन्या एस. व सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी अभिप्राय दिला. त्याचबरोबर विशेष सरकारी वकील हर्षल निंबाळकर यांनीही युक्तिवाद मांडला. न्यायाधीश बिले यांनी समीरचा दोनवेळा दाखल झालेला अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे दहा दिवसांपूर्वी त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. सोमवारच्या सुनावणीमध्ये त्याच्या बाजूने हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अ‍ॅड. संजीव पुनाळेकर बाजू मांडणार आहेत. या अर्जावरील सुनावणीनंतर समीरवर दोषारोपपत्र (चार्ज फ्रेम) करा, अशी मागणी सत्र न्यायालयास करणार असल्याचे अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)