शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

समीरची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव

By admin | Updated: April 16, 2016 00:49 IST

त्यामुळे दहा दिवसांपूर्वी त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा दोनवेळा दाखल केलेला जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्याने त्याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने दाखल केलेल्या अर्जावर सोमवार (दि. १८) उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ढेरे यांच्यासमोर सुनावणी होत आहे. पानसरे हत्येप्रकरणी दि. १४ डिसेंबर २०१५ रोजी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात समीर गायकवाडवर दोषारोपपत्र दाखल झाले. पोलिसांनी समीरविरोधात ३९२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केल्याने हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग केला. त्यानंतर समीरचे वकील एस. व्ही. पटवर्धन यांनी दि. १८ जानेवारीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला. त्यावर तपासी अधिकारी चैतन्या एस. व सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी अभिप्राय दिला. त्याचबरोबर विशेष सरकारी वकील हर्षल निंबाळकर यांनीही युक्तिवाद मांडला. न्यायाधीश बिले यांनी समीरचा दोनवेळा दाखल झालेला अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे दहा दिवसांपूर्वी त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. सोमवारच्या सुनावणीमध्ये त्याच्या बाजूने हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अ‍ॅड. संजीव पुनाळेकर बाजू मांडणार आहेत. या अर्जावरील सुनावणीनंतर समीरवर दोषारोपपत्र (चार्ज फ्रेम) करा, अशी मागणी सत्र न्यायालयास करणार असल्याचे अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)