शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

समीर गायकवाडची याचिका मागे

By admin | Updated: February 19, 2016 01:12 IST

उच्च न्यायालयाची संमती : खटला अन्यत्र वर्ग करण्याची केली होती विनंती

कोल्हापूर/मुंबई : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला अन्यत्र चालविण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल केलेला याचिका संशयित आरोपी समीर गायकवाड याचे वकील संजीव पुनाळेकर यांनी गुरुवारी मागे घेतली. न्यायाधीश श्रीमती सोंडूर बलदोटा यांच्यापुढे पुनाळेकर यांनी तशी तोंडी विनंती केल्यावर न्यायाधीशांनी त्यास सहमती दिली. या खटल्याची सुनावणी दि. २३ फेब्रुवारीस होणार होती. त्यामुळे या खटल्याची सुनावणी आता कोल्हापुरातच होणार हे निश्चित झाले.खटल्याची सुनावणी निष्पक्षपातीपणे व्हावी, यासाठी तो कोल्हापूरच्या बाहेर चालवावा, अशी याचिका (क्रमांक ८४०/२०१५) संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. दक्षिण शिवाजीनगर, मोती चौक, शनिमारुती मंदिराजवळ, सांगली, सध्या कळंबा कारागृह, कोल्हापूर) याने गतवर्षी दि. १८ डिसेंबरला वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्याची सुनावणी दि. १४ जानेवारी व दि. २ फेब्रुवारीस झाली. दि. २ फेब्रुवारीस झालेल्या सुनावणीवेळी न्यायाधीश साधना जाधव यांनी सरकारी वकिलांच्या तपासातील दिरंगाईवर ताशेरे मारले होते व ‘सॉरी स्टेट आॅफ अफेअर्स...’अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पानसरे कुटुंबीयांच्या मागणीनुसार राज्य सरकारने या खटल्यात बाजू मांडण्यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांचीही नियुक्ती केली होती.उच्च न्यायालयाच्याच रेट्यामुळे पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास एसआयटी, सीबीआय व कर्नाटक सीआयडी या तिन्ही यंत्रणा समन्वयाने करू लागल्या आहेत. त्यांतर्गत बुधवारीच पुण्यात या तिन्ही यंत्रणांचीच बैठक झाली व त्यानुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी कोल्हापुरात येऊन पानसरे हत्येमध्ये वापरलेल्या गोळ््यांच्या पाच पुंगळ््या व पानसरे यांच्या शरीरात मिळाळेली एक गोळी ताब्यात घेतली. त्यामुळे हा तपास आणखी काही दिवस पुढे चालणार हे स्पष्ट झाले. खटल्याची ट्रायल सुनावणी लवकर सुरू होणार नाही हे याचिकाकर्त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी खटला अन्यत्र हलविण्याची याचिकाच तोंडी विनंती करून मागे घेतली. ही सुनावणी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत कुठेतरी व्हावी अशी गायकवाड याची मागणी होती. या दाव्यात राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले होते.हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती..पानसरे हत्या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने वरिष्ठ वकिलांनी बाजू मांडावी; अशी व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार पुण्याचे ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली; परंतु त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला नव्हता. तो आदेश गुरुवारी निघाल्याने त्यांच्या नियुक्तीबाबतची संभ्रमावस्थाही दूर झाली.या खटल्यामध्ये पानसरे कुटुंबीयांचा अथवा कुणाचाच कोणत्याही प्रकारचा संशयितांवर दबाव नव्हता. त्यामुळे हा खटला कोल्हापूरच्या बाहेर चालविण्याच्या मागणीस आमचा विरोध होता. आता त्यांनी स्वत:च याचिका मागे घेतल्याने त्यातील संदिग्धता आणि न्यायालयीन लढाई थोडी कमी झाली.- मेघा पानसरेपुंगळ्या, गोळीसीबीआयच्या ताब्यातअ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी घटनास्थळावरून जप्त केलेल्या पाच पुंगळ्या व डॉक्टरांनी पानसरे यांच्या अवयवांमधून काढण्यात आलेली एक गोळी गुरुवारी नवी मुंबई येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या पथकाला देण्यात आली. बंद लखोट्यामधून पुंगळ्या व गोळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी पथकाच्या ताब्यात दिल्या.‘त्या’ शाळकरी मुलाच्या सुरक्षिततेमध्ये वाढगोविंंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या ‘त्या’ शाळकरी मुलाच्या सुरक्षिततेत पोलिसांनी वाढ केली आहे. पूर्वी एक पोलीस कॉन्स्टेबल या मुलाच्या सुरक्षिततेसाठी होता. आता एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी असे चौघेजण त्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने तैनात केले आहेत.