शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

समीर गायकवाडची याचिका मागे

By admin | Updated: February 19, 2016 01:12 IST

उच्च न्यायालयाची संमती : खटला अन्यत्र वर्ग करण्याची केली होती विनंती

कोल्हापूर/मुंबई : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला अन्यत्र चालविण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल केलेला याचिका संशयित आरोपी समीर गायकवाड याचे वकील संजीव पुनाळेकर यांनी गुरुवारी मागे घेतली. न्यायाधीश श्रीमती सोंडूर बलदोटा यांच्यापुढे पुनाळेकर यांनी तशी तोंडी विनंती केल्यावर न्यायाधीशांनी त्यास सहमती दिली. या खटल्याची सुनावणी दि. २३ फेब्रुवारीस होणार होती. त्यामुळे या खटल्याची सुनावणी आता कोल्हापुरातच होणार हे निश्चित झाले.खटल्याची सुनावणी निष्पक्षपातीपणे व्हावी, यासाठी तो कोल्हापूरच्या बाहेर चालवावा, अशी याचिका (क्रमांक ८४०/२०१५) संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. दक्षिण शिवाजीनगर, मोती चौक, शनिमारुती मंदिराजवळ, सांगली, सध्या कळंबा कारागृह, कोल्हापूर) याने गतवर्षी दि. १८ डिसेंबरला वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्याची सुनावणी दि. १४ जानेवारी व दि. २ फेब्रुवारीस झाली. दि. २ फेब्रुवारीस झालेल्या सुनावणीवेळी न्यायाधीश साधना जाधव यांनी सरकारी वकिलांच्या तपासातील दिरंगाईवर ताशेरे मारले होते व ‘सॉरी स्टेट आॅफ अफेअर्स...’अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पानसरे कुटुंबीयांच्या मागणीनुसार राज्य सरकारने या खटल्यात बाजू मांडण्यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांचीही नियुक्ती केली होती.उच्च न्यायालयाच्याच रेट्यामुळे पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास एसआयटी, सीबीआय व कर्नाटक सीआयडी या तिन्ही यंत्रणा समन्वयाने करू लागल्या आहेत. त्यांतर्गत बुधवारीच पुण्यात या तिन्ही यंत्रणांचीच बैठक झाली व त्यानुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी कोल्हापुरात येऊन पानसरे हत्येमध्ये वापरलेल्या गोळ््यांच्या पाच पुंगळ््या व पानसरे यांच्या शरीरात मिळाळेली एक गोळी ताब्यात घेतली. त्यामुळे हा तपास आणखी काही दिवस पुढे चालणार हे स्पष्ट झाले. खटल्याची ट्रायल सुनावणी लवकर सुरू होणार नाही हे याचिकाकर्त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी खटला अन्यत्र हलविण्याची याचिकाच तोंडी विनंती करून मागे घेतली. ही सुनावणी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत कुठेतरी व्हावी अशी गायकवाड याची मागणी होती. या दाव्यात राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले होते.हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती..पानसरे हत्या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने वरिष्ठ वकिलांनी बाजू मांडावी; अशी व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार पुण्याचे ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली; परंतु त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला नव्हता. तो आदेश गुरुवारी निघाल्याने त्यांच्या नियुक्तीबाबतची संभ्रमावस्थाही दूर झाली.या खटल्यामध्ये पानसरे कुटुंबीयांचा अथवा कुणाचाच कोणत्याही प्रकारचा संशयितांवर दबाव नव्हता. त्यामुळे हा खटला कोल्हापूरच्या बाहेर चालविण्याच्या मागणीस आमचा विरोध होता. आता त्यांनी स्वत:च याचिका मागे घेतल्याने त्यातील संदिग्धता आणि न्यायालयीन लढाई थोडी कमी झाली.- मेघा पानसरेपुंगळ्या, गोळीसीबीआयच्या ताब्यातअ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी घटनास्थळावरून जप्त केलेल्या पाच पुंगळ्या व डॉक्टरांनी पानसरे यांच्या अवयवांमधून काढण्यात आलेली एक गोळी गुरुवारी नवी मुंबई येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या पथकाला देण्यात आली. बंद लखोट्यामधून पुंगळ्या व गोळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी पथकाच्या ताब्यात दिल्या.‘त्या’ शाळकरी मुलाच्या सुरक्षिततेमध्ये वाढगोविंंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या ‘त्या’ शाळकरी मुलाच्या सुरक्षिततेत पोलिसांनी वाढ केली आहे. पूर्वी एक पोलीस कॉन्स्टेबल या मुलाच्या सुरक्षिततेसाठी होता. आता एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी असे चौघेजण त्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने तैनात केले आहेत.