शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

समीर गायकवाडवर दोषारोप निश्चितीचा उद्या फैसला

By admin | Updated: March 7, 2016 01:01 IST

संपूर्ण राज्याचे लक्ष : हर्षल निंबाळकर उपस्थित राहणार--पानसरे हत्या खटला

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला अन्यत्र चालविण्याचा मुद्दा निकालात निघाला आहे; त्यामुळे आरोपी समीर गायकवाड याच्याविरोधात दोषारोप निश्चितीचा फैसला उद्या, मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर होणार आहे. या सुनावणीस ज्येष्ठ सरकारी वकील हर्षल निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तपास यंत्रणांत समन्वय झाल्याने नवे पुरावे पुढे येण्याची शक्यता आहे, असे असताना आरोप निश्चिती कशी करता येईल, याबाबतीत सत्र न्यायालयास अर्जाद्वारे म्हणणे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून तपास यंत्रणेद्वारे दोषारोप निश्चित करू नये, असे म्हणणे सादर केले जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. पानसरे खटल्याची सुनावणी कोल्हापूर सोडून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत व्हावी, अशी आरोपी समीर गायकवाड याची मागणी उच्च न्यायालयाकडे होती; परंतु त्याच्या वकिलांनी ही याचिका मागे घेतली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्याने आरोपीविरोधात दि. ८ मार्चला दोषारोपपत्र निश्चित करून खटल्याच्या सुनावणीला सुरुवात केली जाईल, असे सत्र न्यायाधीश बिले यांनी दि. २३ फेब्रुवारीच्या सुनावणीला स्पष्ट केले होते. दरम्यान, दि. २९ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात पानसरे-दाभोलकर सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांनी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाबद्दल प्रश्न उपस्थित करून आठ मार्चला आरोप निश्चित करण्यात येतील, असा सत्र न्यायालयाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तपास यंत्रणांमध्ये समन्वय झाल्याने नवे पुरावे पुढे येण्याची शक्यता आहे, असे असताना आरोप निश्चित कसा काय करता येईल, या बाबतीत सत्र न्यायालयास अर्जाद्वारे म्हणणे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले होते. न्यायालयाच्या या आदेशानुसार तपास यंत्रणेद्वारी दोषारोप निश्चित करू नये, याबाबतीत सत्र न्यायालयात म्हणणे सादर करणार आहे. त्यामुळे उद्या, मंगळवारच्या सुनावणीत कोणता निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी) न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून तपास यंत्रणेद्वारे दोषारोप निश्चित करू नये, असे म्हणणे सादर होणार