शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर २३ ला निर्णय

By admin | Updated: March 15, 2016 01:18 IST

गोविंद पानसरे हत्या प्रकरण : विविध खटल्यांचे दाखले; दोन्ही बाजूंकडून तासभर युक्तिवाद

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक संशयित समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर २३ मार्चला निर्णय घेऊ, असे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सांगितले.सोमवारी गायकवाडच्या जामीन अर्जावर न्यायसंकुलमधील बिले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर व गायकवाडचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांचा तासभर युक्तिवाद झाला. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित समीर गायकवाड याच्यावर न्यायालयात यापूर्वी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. यापूर्वी त्याचे वकील पटवर्धन यांनी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. म्हणून पटवर्धन यांनी दुसऱ्यांदा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला आहे.अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले, ‘पानसरे हत्येप्रकरणी न्यायालयात यापूर्वी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर हा खटला जलदगतीने सुरू करावा, अशी आमची मागणी आहे. तपास अधिकाऱ्यांनी पानसरे हत्या प्रकरणाचा तपास किती दिवस करावा, यावर आमचा आक्षेप नाही आहे; पण तो किती दिवस सुरू राहणार हे सरकारी पक्षाने सांगितलेले नाही. त्यामुळे समीर गायकवाड किती दिवस कळंबा मध्यवर्ती कारागृहात राहणार असे विचारून, सर्वोच्च न्यायालयातील पप्पू यादव व संजय चंद्र विरुद्ध राज्य सरकार अशा दोन खटल्यांचे दाखले दिले. पानसरे यांचे स्नेही दिलीप पवार यांनी आपल्या जीवितास धोका आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ते या खटल्यातील पंच साक्षीदार आहेत. त्यांनीसुद्धा गायकवाडचा जामीन अर्ज मंजूर करू नये, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सरकारी पक्षाने मांडलेले मुद्दे यापूर्वीचेच आहेत, असा युक्तिवाद करून, समीर गायकवाडला जामीन मिळावा, अशी विनंती पटवर्धन यांनी केली.विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर म्हणाले, ‘गायकवाडचा पहिला जामीन अर्ज २८ जानेवारी २०१६ ला जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. गायकवाडला जामीन मिळाल्यास तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शाळकरी मुलावर व इतर साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, साक्षीदारांना फितूर करू शकतो. समीर हा यापूर्वी मडगाव (गोवा) बॉम्बस्फोटातील संशयित फरार रुद्रगौडा पाटील याचा मित्र होता. त्यामुळे गायकवाडला जामीन मिळाल्यास कदाचित तो रुद्रगौडा पाटीलप्रमाणे फरार होऊ शकतो. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पानसरे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे.’ त्यांनी व्हिक्टर विरुद्ध राज्य सरकार, कऱ्हाड येथील उदय पाटील विरुद्ध राज्य सरकार, शेख अन्वर ऊर्फ शेख बाबर विरुद्ध राज्य सरकार, असे आदी चार खटल्यांचे दाखले देत युक्तिवाद मांडला. दोघांचा युक्तिवाद ऐकून बिले यांनी २३ मार्चला समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. अ‍ॅड. निंबाळकर यांना सरकारी वकील अ‍ॅड. चंद्रकांत बुधले यांनी, तर अ‍ॅड. पटवर्धन यांना अ‍ॅड. आनंद देशपांडे, अ‍ॅड. संजय धर्माधिकारी, अ‍ॅड. श्रीपाद होमकर यांनी सहकार्य केले.न्यायालयात मेघा पानसरे, एम. बी. पडवळे, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. धनंजय पठाडे उपस्थित होते.सरकारी पक्षाने न्यायालयात मांडलेले मुद्दे हे यापूर्वीच मांडले आहेत. तपासांत नवीन काही नाही. त्यामुळे समीर गायकवाड याचा जामीन अर्ज मंजूर करावा.- अ‍ॅड. समीर पटवर्धन, बचाव पक्षाचे वकीलगोविंद पानसरे हत्येप्रकरणी तपास यंत्रणा मुळापर्यंत जाऊन व कुशल पद्धतीने तपास करीत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास यंत्रणेचे काम सुरू आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करू नये.- अ‍ॅड. हर्षद निंबाळकर,विशेष सरकारी वकील,