शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

बखरकारांकडून संभाजीराजेंची बदनामी

By admin | Updated: December 6, 2015 01:32 IST

रमेश जाधव : ‘अद्वितीय छत्रपती श्री संभाजी महाराज’ ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर : बखरकारांनीच छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. बखरकार मल्हार रामचंद्र चिटणीस यांनी पूर्वग्रहदूषितपणा ठेवून संभाजी महाराजांचा बदनामीजनक इतिहास रंगवून तो मांडला, असे प्रतिपादन विचारवंत प्रा. डॉ. रमेश जाधव यांनी शनिवारी येथे केले. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे अ‍ॅड. अनंत दारवटकर (पुणे) लिखित ‘अद्वितीय छत्रपती श्री संभाजी महाराज : खंड १ ते ५’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ग्रंथाचे प्रकाशन प्रा. डॉ. रमेश जाधव यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीत इतिहासतज्ज्ञ प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई, प्रबोधन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. बी. शिंदे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची होती. यावेळी प्रा. डॉ. रमेश जाधव म्हणाले, संभाजी महाराजांचे रंगविण्यात आलेले चित्र हे बखरीवर आधारितच आहे. त्यामधून मल्हारराव चिटणीस यांच्यासारख्या बखरकारांनी वाईट हेतूने चुकीचा इतिहास मांडला. असे असले तरी काही इतिहासकारांनी संभाजीराजेंचे चांगले चित्रही समोर आणले हे नाकारून चालणार नाही. अनंत दारवटकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगितला जातो. हे लक्षात आल्यावर खऱ्या इतिहासाची चिकित्सा जागृत झाली. त्यानंतर आपण याकडे वळलो. भारत संशोधन मंडळात जायला लागल्यानंतर यातील अनेक गोष्टी समोर आल्या. खरा इतिहास मांडण्याच्या हेतूनेच आपण संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा ग्रंथ लिहू शकलो. संशोधनातून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. जे. बी. शिंदे म्हणाले, इतिहासाचा विपर्यास केला जात असल्याची सद्य:स्थिती आहे. अशा वातावरणात संभाजी महाराजांवरील ग्रंथ प्रकाशित होत असल्याने नवे ऐतिहासिक पर्व सुुरू होण्यास हातभार लागणार आहे. संभाजी महाराजांचे चित्र त्रोटक होते; परंतु या ग्रंथाच्या माध्यमातून समग्र इतिहास समोर आला आहे. यामध्ये अनेक कागदपत्रांची छाननी व अभ्यासपूर्ण लेखन करण्यात आल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)