शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

संभाजीनगर कामगार चाळ धोकादायक

By admin | Updated: August 6, 2015 23:47 IST

महापालिकेची नोटीस : १०० कुटुंबांचा जीव टांगणीला, रहिवाशांची कॉम्प्लेक्समध्ये पुनर्वसनाची हमी

गणेश शिंदे  कोल्हापूर --४० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या संभाजीनगर कामगार चाळीमधील कुटुंबांना महापालिका प्रशासनाने नोटिसा पाठविल्यामुळे या चाळीत राहणाऱ्या सुमारे १०० कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे. कोल्हापूर महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी नगरपालिकेने १९७४ मध्ये संभाजीनगर येथील रेसकोर्स नाक्यासमोर ‘संभाजीनगर कामगार चाळ’ या नावाने महापालिकेचे सफाई कामगार व झाडू कामगार यांच्यासाठी तत्कालीन आयुक्त डी. एन. कपूर व देवस्थळी यांच्या कारकिर्दीत ही चाळ बांधण्यात आली. दरम्यान, या चाळीत १९४८ मध्ये चार बैठी (कौलारू ) घरे होती. ती घरे सुमारे ३०० स्क्वेअर फुटांची, तर त्यानंतर बांधण्यात आलेली आरसीसीची घरे सध्या सुमारे २७० स्क्वेअर फुटांची आहेत. साधारणत: दीड ते दोन एकरांत ही चाळ वसली आहे.चाळीमध्ये पाच इमारती असून तिथे सुमारे शंभर कुटुंबांचे वास्तव्य आहे. महापालिका प्रशासन महापालिकेच्या या कामगारांकडून पगारामधून घरभाडे भत्ता कपात करते. दरम्यान, ४ आॅगस्ट २०१५ रोजी महापालिका प्रशासनाने कामगार चाळीतील कुटुंबांना ही चाळ धोकादायक बनली असल्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. यामुळे नागरिक चिंतेत आहेत.महापालिका इमारत पाडून उभारणार कॉम्प्लेक्स...संभाजीनगर कामगार चाळ पाडून या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. या कॉम्प्लेक्समध्ये खाली दुकानगाळे, तर वरच्या मजल्यावर या कामगारांना घरे बांधून देणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.रहिवाशांचेही कॉम्प्लेक्समध्ये पुनर्वसन करण्याची हमीही चाळ धोकादायक बनली आहे. आपण ती १५ दिवसांत खाली करणे आवश्यक आहे. या ठिकाणी नवीन इमारत बांधून २००५ मध्ये झालेल्या महासभेच्या ठरावानुसार नवीन इमारतीत तुमचे पुनर्वसन करण्यात येईल, अशा नोटिसा महापालिका प्रशासनाने या कुटुंबांना पाठविल्या आहेत.चाळीमधील सर्वांची लवकरच याप्रश्नी बैठक घेणार आहे व त्यात चर्चा केली जाईल. अजून ही इमारत २५ ते ३० वर्षे टिकेल, असे प्रथमदर्शनी दिसून येते. याप्रश्नी प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी आहे. - अनिल मोहन पटवणे, रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते