शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

समरजितसिंह यांनी दाखविले राजकीय कसब

By admin | Updated: November 11, 2015 00:03 IST

शाहू कृषी संघ : जुन्या, नव्यांचा मेळ घातल्याने निवडणूक बिनविरोध

जहाँगीर शेख -कागल --येथील शाहू समूहातील १५ कोटी वार्षिक उलाढाल असणाऱ्या श्री छ. शाहू कृषी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १५ जागांसाठी बरोबर १५ अर्ज दाखल होत ही निवडणूक बिनविरोध झाली. या संघाचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनांनंतर शाहू समूहातील ही पहिलीच निवडणूक असल्याने विक्रमसिंहराजेंच्या प्रती श्रद्धा आणि विद्यमान अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या प्रती असणारी सहानुभूती या निमित्ताने सभासदांनी दाखवून दिली. असे असले तरी समरजितसिंह घाटगेंनी जुन्या-नव्या संचालक मंडळांची रचना करीत आपल्यातील राजकीय कसबची झलकही दाखवून दिली आहे. या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित होते. कारण विक्रमसिंह राजेंच्या निधनामुळे या शाहू समूहात आजही त्यांची पोकळी जाणवत आहे, तर राजे गट वगळता संजय घाटगे गटाला मानणारे सभासद तसेच मुश्रीफ गटाचे काही समर्थक सभासद या संघात आहेत, पण लोकभावनेप्रमाणेच आमदार हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे यांनी या निवडणुकीकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामध्ये सदैव बंडखोरीच्या पवित्र्यात असणारे काही स्वयंभू नेते होते. यामुळे समरजितसिंह घाटगेंना पॅनेल रचना करण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले. त्यांनी भविष्यातील या कृषी संघाची व्याप्ती आणि व्यवसाय तसेच संघटन याचा मेळ घालत पॅनेलची रचना केली. पाच संचालकांना थांबविले. त्यामध्ये ज्येष्ठ संचालक धोंडिराम मगदूम यांची तब्येत ठीक नसते. विजयसिंह घोरपडे यांच्या जागी प्रशांत घोरपडे (खडकेवाडा) यांना संधी दिली. युवराज पसारे (कागल) यांना दूध संघावर संधी दिल्याने त्यांच्या पत्नी वैशाली यांच्याऐवजी करनूरच्या विमल चौगुलेंना संधी देत करनूर गावाला पहिल्यांदा प्रतिनिधित्व दिले, तर सुनील मगदूम (सिद्धनेर्ली), उत्तम पाटील (बाचणी) ही तरुण बिग्रेड निवडून पुढील इरादेही स्पष्ट केले. नानासाहेब घाटगे, अरुण शिंत्रे, रंजना सातवेकर यांना संधी देत भागनिहाय प्रतिनिधित्व जपले. पंकज वीरकुमार पाटील यांच्यावर कर्नाटक राज्याची जबाबदारी कायम ठेवली. एकूणच समरजितसिंह घाटगे यांनी कृषी उद्योग संघाचा आणि राजकीय संघाचाही विचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. राजेंची शिस्त कायम....विक्रमसिंहराजे गटात कोणतीही निवडणूक लढविताना गटाची परवानगी घेतल्याशिवाय उमेदवारी अर्ज दाखल केले जात नाहीत. या निवडणुकीतही इच्छुकांनी आपले अर्ज समरजितसिंह घाटगे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांनी सांगितलेल्या १५ जणांनीच निवडणुकीचे अर्ज भरले. संघाची एक पंचवार्षिक २००५ची निवडणूक वगळता सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.