शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

समरजितसिंह यांनी दाखविले राजकीय कसब

By admin | Updated: November 11, 2015 00:03 IST

शाहू कृषी संघ : जुन्या, नव्यांचा मेळ घातल्याने निवडणूक बिनविरोध

जहाँगीर शेख -कागल --येथील शाहू समूहातील १५ कोटी वार्षिक उलाढाल असणाऱ्या श्री छ. शाहू कृषी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १५ जागांसाठी बरोबर १५ अर्ज दाखल होत ही निवडणूक बिनविरोध झाली. या संघाचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनांनंतर शाहू समूहातील ही पहिलीच निवडणूक असल्याने विक्रमसिंहराजेंच्या प्रती श्रद्धा आणि विद्यमान अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या प्रती असणारी सहानुभूती या निमित्ताने सभासदांनी दाखवून दिली. असे असले तरी समरजितसिंह घाटगेंनी जुन्या-नव्या संचालक मंडळांची रचना करीत आपल्यातील राजकीय कसबची झलकही दाखवून दिली आहे. या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित होते. कारण विक्रमसिंह राजेंच्या निधनामुळे या शाहू समूहात आजही त्यांची पोकळी जाणवत आहे, तर राजे गट वगळता संजय घाटगे गटाला मानणारे सभासद तसेच मुश्रीफ गटाचे काही समर्थक सभासद या संघात आहेत, पण लोकभावनेप्रमाणेच आमदार हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे यांनी या निवडणुकीकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामध्ये सदैव बंडखोरीच्या पवित्र्यात असणारे काही स्वयंभू नेते होते. यामुळे समरजितसिंह घाटगेंना पॅनेल रचना करण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले. त्यांनी भविष्यातील या कृषी संघाची व्याप्ती आणि व्यवसाय तसेच संघटन याचा मेळ घालत पॅनेलची रचना केली. पाच संचालकांना थांबविले. त्यामध्ये ज्येष्ठ संचालक धोंडिराम मगदूम यांची तब्येत ठीक नसते. विजयसिंह घोरपडे यांच्या जागी प्रशांत घोरपडे (खडकेवाडा) यांना संधी दिली. युवराज पसारे (कागल) यांना दूध संघावर संधी दिल्याने त्यांच्या पत्नी वैशाली यांच्याऐवजी करनूरच्या विमल चौगुलेंना संधी देत करनूर गावाला पहिल्यांदा प्रतिनिधित्व दिले, तर सुनील मगदूम (सिद्धनेर्ली), उत्तम पाटील (बाचणी) ही तरुण बिग्रेड निवडून पुढील इरादेही स्पष्ट केले. नानासाहेब घाटगे, अरुण शिंत्रे, रंजना सातवेकर यांना संधी देत भागनिहाय प्रतिनिधित्व जपले. पंकज वीरकुमार पाटील यांच्यावर कर्नाटक राज्याची जबाबदारी कायम ठेवली. एकूणच समरजितसिंह घाटगे यांनी कृषी उद्योग संघाचा आणि राजकीय संघाचाही विचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. राजेंची शिस्त कायम....विक्रमसिंहराजे गटात कोणतीही निवडणूक लढविताना गटाची परवानगी घेतल्याशिवाय उमेदवारी अर्ज दाखल केले जात नाहीत. या निवडणुकीतही इच्छुकांनी आपले अर्ज समरजितसिंह घाटगे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांनी सांगितलेल्या १५ जणांनीच निवडणुकीचे अर्ज भरले. संघाची एक पंचवार्षिक २००५ची निवडणूक वगळता सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.