शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

समरजितसिंह यांनी दाखविले राजकीय कसब

By admin | Updated: November 11, 2015 00:03 IST

शाहू कृषी संघ : जुन्या, नव्यांचा मेळ घातल्याने निवडणूक बिनविरोध

जहाँगीर शेख -कागल --येथील शाहू समूहातील १५ कोटी वार्षिक उलाढाल असणाऱ्या श्री छ. शाहू कृषी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १५ जागांसाठी बरोबर १५ अर्ज दाखल होत ही निवडणूक बिनविरोध झाली. या संघाचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनांनंतर शाहू समूहातील ही पहिलीच निवडणूक असल्याने विक्रमसिंहराजेंच्या प्रती श्रद्धा आणि विद्यमान अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या प्रती असणारी सहानुभूती या निमित्ताने सभासदांनी दाखवून दिली. असे असले तरी समरजितसिंह घाटगेंनी जुन्या-नव्या संचालक मंडळांची रचना करीत आपल्यातील राजकीय कसबची झलकही दाखवून दिली आहे. या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित होते. कारण विक्रमसिंह राजेंच्या निधनामुळे या शाहू समूहात आजही त्यांची पोकळी जाणवत आहे, तर राजे गट वगळता संजय घाटगे गटाला मानणारे सभासद तसेच मुश्रीफ गटाचे काही समर्थक सभासद या संघात आहेत, पण लोकभावनेप्रमाणेच आमदार हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे यांनी या निवडणुकीकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामध्ये सदैव बंडखोरीच्या पवित्र्यात असणारे काही स्वयंभू नेते होते. यामुळे समरजितसिंह घाटगेंना पॅनेल रचना करण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले. त्यांनी भविष्यातील या कृषी संघाची व्याप्ती आणि व्यवसाय तसेच संघटन याचा मेळ घालत पॅनेलची रचना केली. पाच संचालकांना थांबविले. त्यामध्ये ज्येष्ठ संचालक धोंडिराम मगदूम यांची तब्येत ठीक नसते. विजयसिंह घोरपडे यांच्या जागी प्रशांत घोरपडे (खडकेवाडा) यांना संधी दिली. युवराज पसारे (कागल) यांना दूध संघावर संधी दिल्याने त्यांच्या पत्नी वैशाली यांच्याऐवजी करनूरच्या विमल चौगुलेंना संधी देत करनूर गावाला पहिल्यांदा प्रतिनिधित्व दिले, तर सुनील मगदूम (सिद्धनेर्ली), उत्तम पाटील (बाचणी) ही तरुण बिग्रेड निवडून पुढील इरादेही स्पष्ट केले. नानासाहेब घाटगे, अरुण शिंत्रे, रंजना सातवेकर यांना संधी देत भागनिहाय प्रतिनिधित्व जपले. पंकज वीरकुमार पाटील यांच्यावर कर्नाटक राज्याची जबाबदारी कायम ठेवली. एकूणच समरजितसिंह घाटगे यांनी कृषी उद्योग संघाचा आणि राजकीय संघाचाही विचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. राजेंची शिस्त कायम....विक्रमसिंहराजे गटात कोणतीही निवडणूक लढविताना गटाची परवानगी घेतल्याशिवाय उमेदवारी अर्ज दाखल केले जात नाहीत. या निवडणुकीतही इच्छुकांनी आपले अर्ज समरजितसिंह घाटगे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांनी सांगितलेल्या १५ जणांनीच निवडणुकीचे अर्ज भरले. संघाची एक पंचवार्षिक २००५ची निवडणूक वगळता सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.