शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांत सव्वा लाखाहून अधिक नारळांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 17:41 IST

कोल्हापूर : गणरायाच्या आगमनापासून ते त्याच्या विसर्जनापर्यंत नारळाचे अनन्यसाधारण महत्व आहे. यात मोदकाला नारळ, पुजनाला नारळ, नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण अशा नारळाच्या महत्वामुळे कोल्हापूरकरांना केवळ गणेशोत्सवाच्या काळात दररोज सव्वा लाखाहून अधिक नारळ लागत आहेत. यासह अगरबत्ती, कापूर, अष्टगंध, फुले, फळे, चिरमुरे यांची रोजची उलाढाल कोट्यावधींच्या घरात पोहचली आहे.

ठळक मुद्देअगरबत्ती ,कापूर, कापूस वस्त्रमाळ, अष्टगंध , फुलांची उलाढाल पोहचली कोटीतमोदकासाठी हवा कर्नाटकी नारळअगरबत्तीचीही कोट्यावधी रुपयांची उलाढाल

कोल्हापूर : गणरायाच्या आगमनापासून ते त्याच्या विसर्जनापर्यंत नारळाचे अनन्यसाधारण महत्व आहे. यात मोदकाला नारळ, पुजनाला नारळ, नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण अशा नारळाच्या महत्वामुळे कोल्हापूरकरांना केवळ गणेशोत्सवाच्या काळात दररोज सव्वा लाखाहून अधिक नारळ लागत आहेत. यासह अगरबत्ती, कापूर, अष्टगंध, फुले, फळे, चिरमुरे यांची रोजची उलाढाल कोट्यावधींच्या घरात पोहचली आहे.दररोजच्या जेवणात नारळाचा वापर करणाºया मंडळांनी तर नारळ खोबºयाचा वापर केल्याशिवाय जेवणाची चव लागत नाही. यात दोन दिवसांतून एक ट्रक नारळांची तामिळनाडूवरुन आवक होती. या ट्रकमध्ये २६ हजार नारळ भरतात. यावरुन रोजच्या खपाचा अंदाज येईल . पण गणेशोत्सवाचा काळ गृहीत धरता दिवसाला किमान पाच ट्रक नारळांची आवक तामिळनाडू, कर्नाटकातून होत आहे. त्यानूसार १ लाख २५ हजाराहून अधिक नारळांची विक्री दिवसाकाठी होत आहे.यासह गणरायाची आरास करण्यासाठी विविध सुगंधी फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. फुलांचे किलोचे भाव पुढीलप्रमाणे, गलाटा (१५० रु) , गुलाब ( १० रु प्रतिनग), झंड (३००रु किलो )अ‍ॅस्टर (४नगांची एक पेंडी १० रु), , केवडा (७० रुपये प्रतीनग), कमळ (१० ते १५ रुपये प्रतीनग),असा आहे. या फुलांचे दरही पावस नसल्याने वाढले आहेत. फुल बाजारातील गणेशोत्सव काळातील उलाढालाही लाखो रुपयांच्या घरात पोहचली आहे.गणेश भक्तांचा उत्साह वाढण्यासाठी वातावरण सुगंधीत राहणे गरजेचे असते. त्यामुळे सुगंधी वातावरणासाठी हरतºहेच्या अगरबत्तीही बाजारात आल्या आहेत. त्याचा सुगंधी धुर कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीत पोहचला आहे. विशेषत: एक रुपयांपासून अगदी ५०० रुपयांपर्यंत अगरबत्तीच्या किंमती आहेत.

गुजरात, कर्नाटक आदी राज्यातून अगरबत्ती कोल्हापूरातील स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. गणेशोत्सवाचा काळ ११ दिवसांचा असतो त्यामुळे या कालावधीत मोठ्या अगरबत्तीनाही मागणी आहे. याकरीता ९ व १५ दिवस जळणारी अगरबत्ती बाजारात आली आहे. त्यांच्या किंमतीही अनुक्रमे अडीच हजार, ३०० रुपये आहेत.यासह कापूरही मोठ्या प्रमाणात लागतो. यात छोटा, मोठा, षटकोनी, चौकोनी असे १० ग्रॅम पासून किलोच्या पॅकींगमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. किंमतही अगदी रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत किमंत आहे. यासह केवळ होम हवनसाठी ‘भीमसेन ’काळा कापूरही बाजारात विक्री उपलब्ध आहे. विशेषही या कापूराचा वापर स्वाईन फ्लूला प्रतिबंध करण्यासाठी रुमालामध्ये एक तुकडा ठेवला जातो. त्यामुळे या कापूरालाही मागणी वाढली आहे. याचा दरही १० ग्रॅमला ३५ रुपयांना आहे.कापूसाचे वस्त्रालाही मोठी मागणी आहे. हे वस्त्र १० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत आहे. यंदा गणेशमूर्तीच्या फुटांप्रमाणे तयार वस्त्रमाळ बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. अगदी १ फुटांपासून २१ फुटांपर्यंतच्या या माळा उपलब्ध आहेत. यासह अष्टगंधामध्ये सुगंधी व नियमित असे दोन प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नियमित अष्टगंध २०० रु किलो आहे. बाप्पाला फळांचा नैवेधही लागतोच त्यामुळे फळबाजारही तेजीत आहे. पाच फळे अगदी ५० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात सफरचंद, डाळींब, सिताफळ, संत्री, चिक्कु, यांचा समावेश आहे.

मोदकासाठी हवा कर्नाटकी नारळ

गणरायाला २१ मोदकांचा नैवेधाशिवाय गणेशोत्सव होत नाही. या मोदकाला खास कर्नाटकी नारळाच्या खोबºयाचा किस लागतो. हे खोबºयाला जाडी अधिक असते. त्याचा दरही नियमित नारळापेक्षा अधिक आहे. शेकडा १८०० ते २५०० असा घाऊक बाजारात दर आहे. तर तोरणासाठी व गणरायाला वाहनासाठी तामिळनाडूतील शेंडी नारळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. याचा दरही शेकडा १०५० रुपये इतका घाऊक बाजारात आहे.तामिळनाडू, कर्नाटकात गेल्यावर्षीपासून पावसाने ओढ दिल्याने नारळाचे दर गेल्या वर्षीच्या मानाने यंदा वाढलेले आहेत. रोज कोल्हापूरात किमान ३-४ ट्रक नारळांची आवक होते. एका ट्रकमध्ये जास्तीत जास्त २६ हजार नारळ भरतात. नारळाच्या भरतीवरुन किंमतही ठरते.बिपीन बेंडके,नारळ व्यापारी,नियमित अगरबत्ती, कापूरासह १५ व ९ दिवस सलग जळत सुगंध पसरवणारी अगरबत्ती बाजारात आली आहे. यासह भिमसेन कापूरालाही मोठी मागणी आहे. जिल्हाभरात गणेशोत्सवाच्या काळात अगरबत्ती व कापूर यांची कोट्यावधीची उलाढाल होते.- राहूल हळदे,अगरबत्ती, कापूर विक्रेते,