शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

रास्त भाव दुकानात जीवनावश्यक वस्तूंची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:26 IST

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांत जीवनावश्यक वस्तूंची विक्री ११ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. येथील वस्तूंची किंमत ...

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांत जीवनावश्यक वस्तूंची विक्री ११ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. येथील वस्तूंची किंमत खुल्या बाजारपेठेपेक्षा कमी असेल. यासाठी जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई, रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, रास्त भाव दुकानात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे आणि संघाने प्रमाणित केलेल्या स्वदेशी कंपन्यांनी उत्पादित केलेल्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री शहरातील १७०, तर जिल्ह्यातील १६०० रास्त भाव दुकानांतून होईल.

रास्त भाव दुकानात कपडे धुण्यासाठीचा साबण, चंदन साबण, मध, गुलकंद, आमसोल, खोबरेल तेल, बदाम तेल, हर्बल तेल, पापड आदी जीवनावश्यक वस्तूंसह चादरी, सतरंजी, पायपुसणी, घोंगडी, शबनम बॅग, टॉवेल, पायजमा, रूमाल, नॅपकीन विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. या वस्तू विक्रीमुळे संघ आणि रास्त भाव दुकानांना काही प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळेल. या वस्तू रेशनकार्ड धारकांसह इतर ग्राहकांनाही खरेदी करता येणार आहेत. पण रेशन घेताना या वस्तू खरेदी करण्याची कोणत्याही प्रकारची सक्ती नाही.

पत्रकार परिषदेस संघाचे उपाध्यक्ष प्रकाश चौगुले, ज्येष्ठ संचालक सखाराम सुतार, संचालिका गीता गुरव, सविता देसाई उपस्थित होते.