शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मराठीच्या भल्यासाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:48 IST

उदय कुलकर्णी मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील २० संस्था-संघटनांनी एकत्र येऊन ‘मराठीच्या भल्यासाठी’ नावाचं व्यासपीठ निर्माण ...

उदय कुलकर्णीमराठी भाषा, साहित्य व संस्कृतीसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील २० संस्था-संघटनांनी एकत्र येऊन ‘मराठीच्या भल्यासाठी’ नावाचं व्यासपीठ निर्माण केलं. या व्यासपीठाच्यावतीने २४ जूनला मराठी भाषेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मराठी भाषा व प्राधिकरणाबाबत कायद्याला मंजुरी देण्याचा आग्रह धरणे आंदोलनाच्यावेळी धरला जाणार आहे. त्यासाठी एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेटही घेणार आहे. याखेरीज आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मराठी भाषेच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जाहीरनामा तयार करण्याचाही विचार आहे. ‘मराठीच्या भल्यासाठी’ या व्यासपीठाकडून मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीसाठी रणशिंग फुंकले जात असतानाच इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि थोडेथोडके नव्हे, तर २ लाख ८७ हजार विद्यार्थी मराठी विषयात नापास झाल्याचं चित्र समोर आलं आणि मराठी भाषेची अवस्था किती गंभीर आहे याचा जणू दाखला मिळाला. खरं तर डॉ. नागनाथ कोतापल्ले व डॉ. शेषराव मोरे यांच्या समितीने पहिली ते बारावी मराठी भाषा सक्तीची करावी, अशी शिफारस केलेली आहे; पण याबाबत अंमलबजावणी झालेली नाही. उलट महाराष्ट्र सेल्फ फायनान्स स्कूल अ‍ॅक्ट २०१२ (सुधारित कायदा २०१७) अंतर्गत राज्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सहजपणे परवानगी मिळत असल्यानं मराठी शाळा धडाधड बंद पडत आहेत. साहजिकच मराठी भाषा शालेय व उच्च माध्यमिक स्तरावर सक्तीची करणं, मराठी शाळांचं गुणवत्तेच्या संदर्भात सक्षमीकरण करणं आणि शालेय ग्रंथालय समृद्ध करून विद्यार्थ्यांनी वर्षभरात किमान १०-२० मराठी पुस्तकं वाचावीत असे उपक्रम राबविण्याबाबत अध्यादेश काढणं या ‘मराठीच्या भल्यासाठी’ या व्यासपीठाच्या प्रारंभीच्या तीन प्रमुख मागण्या आहेत.आपण मराठी बोलतो, पण भाषा बोलताना आणि वापरताना मराठी संस्कृती जपण्याचा आपल्याला विसर पडतो. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा बेंबीच्या देठापासून देणारी असंख्य माणसं एखाद्या स्रीला सोशल मीडियामधून ‘त्राहि भगवन्’ करून सोडताना अर्वाच्य भाषेत समस्त स्त्री जातीचा अवमान करणारी व विकृत मानसिकतेचं दर्शन घडविणारी मुक्ताफळं उधळत असतात. अभिनेत्री केतकी चितळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या अशा प्रकाराच्या ताज्या बळी ठरल्या आहेत. केतकीनं तिच्याबाबतीत घडलेल्या ट्रोलिंंगला सडेतोड उत्तर देताना स्वत:ला मराठी भाषाभिमानी म्हणविणाºया माणसांना भाषेच्या शुद्धतेचे धडे दिले. तसेच मराठी माणसांची मानसिकता अशी असणार असेल, तर ती माणसं माझी असू शकत नाहीत अन् तो महाराष्ट्रही, असं सुनावलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेत असू तर शत्रूच्या स्रियांकडेही पाहण्याचा महाराजांचा दृष्टिकोन कसा होता, हे जाणून तोही अंगी बाणवायला नको का? आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना स्वीकारली असेल तर संसदेमध्ये श्रीरामाच्या नावानं घोषणा देऊ नयेत, अशी भूमिका घेतल्यानं नवनीत राणा अपशब्दांच्या धनी ठरल्या. मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचं अभिजातपण खरं कसं आहे हेदेखील आता मराठीच्या भल्यासाठी दाखवून देण्याची वेळ आली आहे!शब्द आणि शब्दार्थ याबाबत आपण फारसे जागरूक नसतोच. मध्यंतरी एका महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचं काम सुरू होतं. अशा अंकाची जबाबदारी प्रामुख्यानं भाषा विषयाच्या प्राध्यापकाकडं असते. एका लेखात विद्यार्थ्यानं ‘खलबतं’ या शब्दाऐवजी ‘गलबतं’ असा शब्द वापरला होता. प्राध्यापकांनादेखील ‘खलबतं’ आणि ‘गलबतं’ या शब्दांच्या अर्थांमध्ये नेमका काय फरक आहे याची कल्पना नव्हती, हे पाहून माझ्यासारख्या माणसाला अस्वस्थ व्हायला झालं.(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)