शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

कोल्हापूरच्या राहुल कोसंबींना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार

By admin | Updated: June 22, 2017 20:31 IST

कोसंबी राधानगरी तालुक्यातील,"उभं आडवं" वैचारिक लेख संग्रह

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमीच्या पुरस्काराची घोषणा गुरुवारी करण्यात आली. मराठीतील दोन साहित्यिकांना यंदाचे पुरस्कार जाहिर झाले आहेत. अकादमीचा युवा पुरस्कार राधानगरी तालुक्यातील राहुल पांडुरंग कोसंबी यांच्या "उभं-आडवं" या कथासंग्रहाला तर एल. एम. कडू यांच्या खारीचा वाटा या पुस्तकाला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला.अकादमीने २४ भाषांतील पुरस्काराची घोषणा विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत गुरुवारी गुवाहाटी येथे केली. ५० हजार रुपये आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण १४ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे विशेष सोहळ्यात होणार आहे.

"उभं आडवं" हे राहुल कोसंबी यांचा वैचारिक लेख संग्रह आहे. त्यांनी "उभं आडवं" या पुस्तकातून समाजातील वास्तवावर लिखाण केलं आहे. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचे त्यांनी विश्लेषण केलं आहे. तसंच यातून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक भान दिसून येते. पुस्तकातील त्यांच्या विवेचन परिवर्तनाच्या चळवळीशी जोडलले आहे. राहुल कोसंबी हे राधानगरी तालुक्यातील चांदेकोते येथील रहिवाशी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण हलकर्णी (ता. चंदगड) येथे तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर व मुंबई येथे झाले आहे. त्यांनी दिल्ली येथील नॅशनल बुक ट्रस्ट आॅफ इंडिया येथे मराठी व कोकणी भाषेचे संपादक म्हणून २००८ पासून २०१५ पर्यंत त्यांनी काम पाहिले आहे.

मे २०१५ पासून एनबीटीच्या पश्चिम क्षेत्रीय मुंबई कार्यालयाचे प्रभारी अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. सध्या ते मुक्त शब्द मासिकासाठी ते सल्लागार संपादक म्हणून कार्यरत आहेत. मुंबई येथे पार पडलेले अखिल भारतीय साहित्य संमेलनामधील समीक्षेच्या चर्चासत्रामध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केला होता. मराठी साहित्य संमेलनाबरोबरच राष्ट्रीय चर्चासत्रामधूनही त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.