शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

कोल्हापूरच्या राहुल कोसंबींना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार

By admin | Updated: June 22, 2017 20:31 IST

कोसंबी राधानगरी तालुक्यातील,"उभं आडवं" वैचारिक लेख संग्रह

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमीच्या पुरस्काराची घोषणा गुरुवारी करण्यात आली. मराठीतील दोन साहित्यिकांना यंदाचे पुरस्कार जाहिर झाले आहेत. अकादमीचा युवा पुरस्कार राधानगरी तालुक्यातील राहुल पांडुरंग कोसंबी यांच्या "उभं-आडवं" या कथासंग्रहाला तर एल. एम. कडू यांच्या खारीचा वाटा या पुस्तकाला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला.अकादमीने २४ भाषांतील पुरस्काराची घोषणा विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत गुरुवारी गुवाहाटी येथे केली. ५० हजार रुपये आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण १४ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे विशेष सोहळ्यात होणार आहे.

"उभं आडवं" हे राहुल कोसंबी यांचा वैचारिक लेख संग्रह आहे. त्यांनी "उभं आडवं" या पुस्तकातून समाजातील वास्तवावर लिखाण केलं आहे. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचे त्यांनी विश्लेषण केलं आहे. तसंच यातून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक भान दिसून येते. पुस्तकातील त्यांच्या विवेचन परिवर्तनाच्या चळवळीशी जोडलले आहे. राहुल कोसंबी हे राधानगरी तालुक्यातील चांदेकोते येथील रहिवाशी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण हलकर्णी (ता. चंदगड) येथे तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर व मुंबई येथे झाले आहे. त्यांनी दिल्ली येथील नॅशनल बुक ट्रस्ट आॅफ इंडिया येथे मराठी व कोकणी भाषेचे संपादक म्हणून २००८ पासून २०१५ पर्यंत त्यांनी काम पाहिले आहे.

मे २०१५ पासून एनबीटीच्या पश्चिम क्षेत्रीय मुंबई कार्यालयाचे प्रभारी अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. सध्या ते मुक्त शब्द मासिकासाठी ते सल्लागार संपादक म्हणून कार्यरत आहेत. मुंबई येथे पार पडलेले अखिल भारतीय साहित्य संमेलनामधील समीक्षेच्या चर्चासत्रामध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केला होता. मराठी साहित्य संमेलनाबरोबरच राष्ट्रीय चर्चासत्रामधूनही त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.