शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
6
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
7
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
8
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
9
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
10
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
11
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
12
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
13
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
14
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
15
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
16
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
17
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
18
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
19
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
20
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं

भगवे, निळे झेंडे एकत्र फडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:55 IST

गांधीनगर : भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन न भरून निघण्यासारखी सामाजिक आणि आर्थिक हानी झाली. तसेच एकमेकांबद्दल मतभेद निर्माण झाले. हेच मतभेद दूर करण्यासाठी गांधीनगर (ता. करवीर) येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती त्या-त्या दिवशी साजरी ...

गांधीनगर : भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन न भरून निघण्यासारखी सामाजिक आणि आर्थिक हानी झाली. तसेच एकमेकांबद्दल मतभेद निर्माण झाले. हेच मतभेद दूर करण्यासाठी गांधीनगर (ता. करवीर) येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती त्या-त्या दिवशी साजरी करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला एकत्रित काढण्याचा निर्णय घेतला आहे.भीमा-कोरेगाव या प्रकरणानंतर दोन्ही समाजातील मतभेद वाढले आणि दोन्ही समाजाचे न भरून निघणारे नुकसान झाले. जयंती साजरी करण्याचा चंग बांधलेले भीमसैनिक आणि शिवभक्त मिरवणुकीची परवानगी मागण्यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्यात गेले असता येथील स.पो.नि. सुशांत चव्हाण यांनी शिवभक्त आणि भीमभक्तांची एकत्र बैठक बोलावून रयतेचे राजे शिवछत्रपती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रयतेबाबतचे कार्य अलौकिक आहे. त्यांचा देशभरातील प्रत्येक नागरिकांनी सन्मान केला पाहिजे. या महामानवांची वैचारिकता प्रत्येकाने अंगिकारली तर समाजामधील निर्माण होणारे तेढ थांबेल आणि समाजा-समाजामध्ये सामाजिक बांधीलकी, आपुलकी रुजेल, असे सांगितले. त्या दरम्यान शिवभक्त आणि भीमभक्तांनी येणाऱ्या दोन्ही महामानवांच्या जयंती या पारंपरिक पद्धतीने साजºया करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला एकत्रित काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे जातीय तेढ कमी होऊन समाज प्रबोधनांचा संदेश जाऊन सलोख्याचे वातावरण तयार होण्यास मदत होईल. गांधीनगरचेस. पो. नि. सुशांत चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन इतर गावांतील महामानवांच्या अनुयानांनाही विचार करायला लावणारे पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.बैठकीला जितेंद्र कुबडे, लखन कांबळे यांनी या महामानवांच्या जयंती ज्या-त्या दिवशी प्रतिमापूजन करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. बैठकीत ग्रा. पं. सदस्य विक्रम मोहिते, अनिल उपाध्ये, बाबासाहेब नेर्ले, भटक्या विमुक्त गोसावी समाजाचे अध्यक्ष उत्तम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी धर्मेंद्र जाधव, गणेश सरवदे, अभिजित अवघडे, विजय मनचुडिया, नितीन धनवडे, हरीष पोवार, पप्पू श्ािंदे, राजा इनामदार, विकी बेनाडे, विशाल फुले, रोशन निरंकारी, विवेक कोलप यांच्यासह विविध मंडळांनी मिरवणुकीस पाठिंबा दर्शविला आहे.