शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भगवे, निळे झेंडे एकत्र फडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:55 IST

गांधीनगर : भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन न भरून निघण्यासारखी सामाजिक आणि आर्थिक हानी झाली. तसेच एकमेकांबद्दल मतभेद निर्माण झाले. हेच मतभेद दूर करण्यासाठी गांधीनगर (ता. करवीर) येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती त्या-त्या दिवशी साजरी ...

गांधीनगर : भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन न भरून निघण्यासारखी सामाजिक आणि आर्थिक हानी झाली. तसेच एकमेकांबद्दल मतभेद निर्माण झाले. हेच मतभेद दूर करण्यासाठी गांधीनगर (ता. करवीर) येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती त्या-त्या दिवशी साजरी करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला एकत्रित काढण्याचा निर्णय घेतला आहे.भीमा-कोरेगाव या प्रकरणानंतर दोन्ही समाजातील मतभेद वाढले आणि दोन्ही समाजाचे न भरून निघणारे नुकसान झाले. जयंती साजरी करण्याचा चंग बांधलेले भीमसैनिक आणि शिवभक्त मिरवणुकीची परवानगी मागण्यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्यात गेले असता येथील स.पो.नि. सुशांत चव्हाण यांनी शिवभक्त आणि भीमभक्तांची एकत्र बैठक बोलावून रयतेचे राजे शिवछत्रपती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रयतेबाबतचे कार्य अलौकिक आहे. त्यांचा देशभरातील प्रत्येक नागरिकांनी सन्मान केला पाहिजे. या महामानवांची वैचारिकता प्रत्येकाने अंगिकारली तर समाजामधील निर्माण होणारे तेढ थांबेल आणि समाजा-समाजामध्ये सामाजिक बांधीलकी, आपुलकी रुजेल, असे सांगितले. त्या दरम्यान शिवभक्त आणि भीमभक्तांनी येणाऱ्या दोन्ही महामानवांच्या जयंती या पारंपरिक पद्धतीने साजºया करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला एकत्रित काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे जातीय तेढ कमी होऊन समाज प्रबोधनांचा संदेश जाऊन सलोख्याचे वातावरण तयार होण्यास मदत होईल. गांधीनगरचेस. पो. नि. सुशांत चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन इतर गावांतील महामानवांच्या अनुयानांनाही विचार करायला लावणारे पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.बैठकीला जितेंद्र कुबडे, लखन कांबळे यांनी या महामानवांच्या जयंती ज्या-त्या दिवशी प्रतिमापूजन करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. बैठकीत ग्रा. पं. सदस्य विक्रम मोहिते, अनिल उपाध्ये, बाबासाहेब नेर्ले, भटक्या विमुक्त गोसावी समाजाचे अध्यक्ष उत्तम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी धर्मेंद्र जाधव, गणेश सरवदे, अभिजित अवघडे, विजय मनचुडिया, नितीन धनवडे, हरीष पोवार, पप्पू श्ािंदे, राजा इनामदार, विकी बेनाडे, विशाल फुले, रोशन निरंकारी, विवेक कोलप यांच्यासह विविध मंडळांनी मिरवणुकीस पाठिंबा दर्शविला आहे.