शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

भगवे, निळे झेंडे एकत्र फडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:55 IST

गांधीनगर : भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन न भरून निघण्यासारखी सामाजिक आणि आर्थिक हानी झाली. तसेच एकमेकांबद्दल मतभेद निर्माण झाले. हेच मतभेद दूर करण्यासाठी गांधीनगर (ता. करवीर) येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती त्या-त्या दिवशी साजरी ...

गांधीनगर : भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन न भरून निघण्यासारखी सामाजिक आणि आर्थिक हानी झाली. तसेच एकमेकांबद्दल मतभेद निर्माण झाले. हेच मतभेद दूर करण्यासाठी गांधीनगर (ता. करवीर) येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती त्या-त्या दिवशी साजरी करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला एकत्रित काढण्याचा निर्णय घेतला आहे.भीमा-कोरेगाव या प्रकरणानंतर दोन्ही समाजातील मतभेद वाढले आणि दोन्ही समाजाचे न भरून निघणारे नुकसान झाले. जयंती साजरी करण्याचा चंग बांधलेले भीमसैनिक आणि शिवभक्त मिरवणुकीची परवानगी मागण्यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्यात गेले असता येथील स.पो.नि. सुशांत चव्हाण यांनी शिवभक्त आणि भीमभक्तांची एकत्र बैठक बोलावून रयतेचे राजे शिवछत्रपती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रयतेबाबतचे कार्य अलौकिक आहे. त्यांचा देशभरातील प्रत्येक नागरिकांनी सन्मान केला पाहिजे. या महामानवांची वैचारिकता प्रत्येकाने अंगिकारली तर समाजामधील निर्माण होणारे तेढ थांबेल आणि समाजा-समाजामध्ये सामाजिक बांधीलकी, आपुलकी रुजेल, असे सांगितले. त्या दरम्यान शिवभक्त आणि भीमभक्तांनी येणाऱ्या दोन्ही महामानवांच्या जयंती या पारंपरिक पद्धतीने साजºया करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला एकत्रित काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे जातीय तेढ कमी होऊन समाज प्रबोधनांचा संदेश जाऊन सलोख्याचे वातावरण तयार होण्यास मदत होईल. गांधीनगरचेस. पो. नि. सुशांत चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन इतर गावांतील महामानवांच्या अनुयानांनाही विचार करायला लावणारे पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.बैठकीला जितेंद्र कुबडे, लखन कांबळे यांनी या महामानवांच्या जयंती ज्या-त्या दिवशी प्रतिमापूजन करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. बैठकीत ग्रा. पं. सदस्य विक्रम मोहिते, अनिल उपाध्ये, बाबासाहेब नेर्ले, भटक्या विमुक्त गोसावी समाजाचे अध्यक्ष उत्तम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी धर्मेंद्र जाधव, गणेश सरवदे, अभिजित अवघडे, विजय मनचुडिया, नितीन धनवडे, हरीष पोवार, पप्पू श्ािंदे, राजा इनामदार, विकी बेनाडे, विशाल फुले, रोशन निरंकारी, विवेक कोलप यांच्यासह विविध मंडळांनी मिरवणुकीस पाठिंबा दर्शविला आहे.