शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षिततेचे उपायही तितकेच प्रभावी हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यभरात दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट्स व अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी बुधवारी (दि. १०) मध्यरात्री विधानसभेत विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचे कोल्हापुरातील व्यापारी उद्योजक, व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. त्याचबरोबर शासनाने सुरक्षिततेच्या मुद्द्यांचाही गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही केली आहे.विधानसभेत दुकाने, मॉल्स, रेस्टारंटसह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यभरात दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट्स व अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी बुधवारी (दि. १०) मध्यरात्री विधानसभेत विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचे कोल्हापुरातील व्यापारी उद्योजक, व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. त्याचबरोबर शासनाने सुरक्षिततेच्या मुद्द्यांचाही गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही केली आहे.विधानसभेत दुकाने, मॉल्स, रेस्टारंटसह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यासाठी दुकाने व आस्थापना (गुमास्ता) कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर केले आहे. यामुळे रात्रभर खाण्यापिण्याची चंगळ अनुभवता येणार आहे.कोल्हापूर शहराचा विचार करता, करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत असतात. ते रात्री बारानंतर कोल्हापुरात आले तर त्यांना जेवण, राहणे, प्रवासी वाहतुकीची सोय होत नाही. मात्र, शासनाच्या विधेयक मंजुरीने ही सुविधा मिळण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे या विधेयकाचे अनेक व्यावसायिकांनी स्वागत केले आहे.त्याचबरोबर रात्रभर ही आस्थापने, प्रतिष्ठाने, हॉटेल्स सुरू ठेवल्याने सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. विशेषत: बार, मद्य, आदींच्या विक्रीसाठी निर्बंध हवेत, असा एकूणच सर्व स्तरांतून सूर उमटत आहे.कोल्हापुरातील आस्थापनाहॉटेल-लॉजिंग बोर्डिंग १२५रेस्टॉरंट ७५०मॉल्स ४यात्री निवास २००किराणा, धान्य दुकाने ७०००वैद्यकीय किरकोळ दुकाने ४५०शासनाने हे विधेयक आणून उत्तम निर्णय घेतला आहे. सध्या दळण-वळणाची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. त्यात कोल्हापूरच्या पर्यटनवाढीस या निर्णयामुळे हातभार लागणार आहे. यासह सुरक्षितता महत्त्वाची आहे. सुरक्षिततेचे उपाय व पोलिसांनी नियमित गस्त ठेवल्यास हा उत्तम निर्णय ठरेल.- बाळ पाटणकर,हॉटेल व्यावसायिकनिर्णयाचा फायदा पर्यटनवाढीस होईल. त्याचबरोबर सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था महत्त्वाची आहे. लॉजिंगला २४ तास परवानगी नव्हती. मात्र, या निर्णयामुळे ती मिळेल.- सिद्धार्थ लाटकर, सचिव, कोल्हापूर हॉटेल मालक संघ,शासनाने या विधेयकास संपूर्ण मंजुरी दिल्यास शहरातील वर्दळही वाढेल. त्याचा फायदा रिक्षाचालकांच्या व्यवसायास हातभार लागण्यास होईल. रात्री साडेअकरानंतर शहरात बहुतांश रेस्टॉरंटमध्ये बाहेरून आलेल्या पर्यटकांना जेवण मिळत नाही. या निर्णयामुळे पर्यटकांची वर्दळ वाढेल.- चंद्रकांत भोसले, रिक्षा व्यावसायिक, कोल्हापूरपर्यटनवाढीच्या दृष्टीने हा निर्णय चांगला आहे. मात्र, कोल्हापूरचा विचार करता, अंबाबाईचे मंदिर रात्री दहा वाजता बंद होते. त्यासह महिला कर्मचाºयांचाही प्रश्न मोठा आहे. रेल्वेगाड्यांचा राबताही मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळे या निर्णयाचा फारसा फायदा होणार नाही. सण, उत्सव काळातच हा निर्णय योग्य ठरू शकतो. - सीमा भोसले,हॉटेल व्यावसायिक,कोल्हापूर