शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

सुरक्षिततेचे उपायही तितकेच प्रभावी हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यभरात दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट्स व अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी बुधवारी (दि. १०) मध्यरात्री विधानसभेत विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचे कोल्हापुरातील व्यापारी उद्योजक, व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. त्याचबरोबर शासनाने सुरक्षिततेच्या मुद्द्यांचाही गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही केली आहे.विधानसभेत दुकाने, मॉल्स, रेस्टारंटसह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यभरात दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट्स व अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी बुधवारी (दि. १०) मध्यरात्री विधानसभेत विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचे कोल्हापुरातील व्यापारी उद्योजक, व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. त्याचबरोबर शासनाने सुरक्षिततेच्या मुद्द्यांचाही गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही केली आहे.विधानसभेत दुकाने, मॉल्स, रेस्टारंटसह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यासाठी दुकाने व आस्थापना (गुमास्ता) कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर केले आहे. यामुळे रात्रभर खाण्यापिण्याची चंगळ अनुभवता येणार आहे.कोल्हापूर शहराचा विचार करता, करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत असतात. ते रात्री बारानंतर कोल्हापुरात आले तर त्यांना जेवण, राहणे, प्रवासी वाहतुकीची सोय होत नाही. मात्र, शासनाच्या विधेयक मंजुरीने ही सुविधा मिळण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे या विधेयकाचे अनेक व्यावसायिकांनी स्वागत केले आहे.त्याचबरोबर रात्रभर ही आस्थापने, प्रतिष्ठाने, हॉटेल्स सुरू ठेवल्याने सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. विशेषत: बार, मद्य, आदींच्या विक्रीसाठी निर्बंध हवेत, असा एकूणच सर्व स्तरांतून सूर उमटत आहे.कोल्हापुरातील आस्थापनाहॉटेल-लॉजिंग बोर्डिंग १२५रेस्टॉरंट ७५०मॉल्स ४यात्री निवास २००किराणा, धान्य दुकाने ७०००वैद्यकीय किरकोळ दुकाने ४५०शासनाने हे विधेयक आणून उत्तम निर्णय घेतला आहे. सध्या दळण-वळणाची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. त्यात कोल्हापूरच्या पर्यटनवाढीस या निर्णयामुळे हातभार लागणार आहे. यासह सुरक्षितता महत्त्वाची आहे. सुरक्षिततेचे उपाय व पोलिसांनी नियमित गस्त ठेवल्यास हा उत्तम निर्णय ठरेल.- बाळ पाटणकर,हॉटेल व्यावसायिकनिर्णयाचा फायदा पर्यटनवाढीस होईल. त्याचबरोबर सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था महत्त्वाची आहे. लॉजिंगला २४ तास परवानगी नव्हती. मात्र, या निर्णयामुळे ती मिळेल.- सिद्धार्थ लाटकर, सचिव, कोल्हापूर हॉटेल मालक संघ,शासनाने या विधेयकास संपूर्ण मंजुरी दिल्यास शहरातील वर्दळही वाढेल. त्याचा फायदा रिक्षाचालकांच्या व्यवसायास हातभार लागण्यास होईल. रात्री साडेअकरानंतर शहरात बहुतांश रेस्टॉरंटमध्ये बाहेरून आलेल्या पर्यटकांना जेवण मिळत नाही. या निर्णयामुळे पर्यटकांची वर्दळ वाढेल.- चंद्रकांत भोसले, रिक्षा व्यावसायिक, कोल्हापूरपर्यटनवाढीच्या दृष्टीने हा निर्णय चांगला आहे. मात्र, कोल्हापूरचा विचार करता, अंबाबाईचे मंदिर रात्री दहा वाजता बंद होते. त्यासह महिला कर्मचाºयांचाही प्रश्न मोठा आहे. रेल्वेगाड्यांचा राबताही मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळे या निर्णयाचा फारसा फायदा होणार नाही. सण, उत्सव काळातच हा निर्णय योग्य ठरू शकतो. - सीमा भोसले,हॉटेल व्यावसायिक,कोल्हापूर