शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

साेपानराव नि मुख्यमंत्री...! - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:23 IST

राज्याच्या मागास विभागातून आमदार साेपानराव पाटील खडकेवर हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले हाेते. त्यांचे अन् मुख्यमंत्र्यांचे दाट अन् जिव्हाळ्याचे ...

राज्याच्या मागास विभागातून आमदार साेपानराव पाटील खडकेवर हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले हाेते. त्यांचे अन् मुख्यमंत्र्यांचे दाट अन् जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध जुळलेले हाेते. निवडक आमदारांच्या मंत्रिमंडळात समावेश करताना आ. साेपानराव पाटील यांना ‘कॅबिनेट मंत्रीपद’ देण्याचे आश्वासन प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू हाेती. सगळ्यांचेच लक्ष आजच्या बैठकीकडेच लागले हाेते.

काही वेळा अचानक एखादी अकल्पित घटना अशी घडते अन् सगळेच रागरंग बदलून जातात! ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी पाठविलेल्या तातडीच्या संदेशानुसार, नुकतेच विराेधी पक्षातून सत्तारूढ पक्षात प्रवेश केलेले ‘बाहुबली’ नेते आमदार काैतुकराव किल्लेदार यांना कॅबिनेट मंत्रीपदावर नियुक्त करण्यास अन् त्यांच्याकडे राज्य महसूल खात्याच्या मंत्रीपदाचा पदभार साेपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे जाहीर झाले.

आ. साेपानराव पाटील या निर्णयामुळे खूप नाराज अन् अस्वस्थ झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ‘आपण दिलेल्या आश्वासनावर मी विसंबून हाेताे, पण विपरीतच घडले अन् पदरात निराशाच पडली...’ मुख्यमंत्री त्यांची समजूत घालताना म्हणाले, ‘हे लक्षात घ्या पाटील! तुम्हाला कॅबिनेट मंंत्रीपद देण्याचे मी निश्चितच केले हाेते, पण ऐनवेळी अकल्पितपणे आलेल्या पक्षश्रेष्ष्ठींच्या तातडीच्या आदेशामुळे माझा नाइलाज झाला. असाे. येत्या काही दिवसांत मी तुमच्यासाठी अनुकुल निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे, अन् त्यासाठी पक्षश्रेष्ठींची अनुमतीही मिळाली आहे.’

आठवड्याभरानंतरच्या बैठकीत पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार आमदार साेपानराव पाटील यांच्याकडे महसूल खात्याच्या ‘राज्यमंत्री’पदाचा कार्यभार साेपविण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. ‘राज्यमंत्री’ साेपानराव पाटलांनी स्वत:च्या मनाला बजावले की, ‘दुय्यम दर्जाचे हे कनिष्ठपद अनिच्छेने का हाेईना लाभले यातच यापुढे समाधान मानावे लागणार आहे. ‘मनुष्य: चिन्तयेत् ऐकम्, दैवम् अन्यत्र चिन्तयेत्’ हेच सत्य ठरते.

कॅबिनेटऐवजी राज्यमंत्रीपद मिळाल्यापासून साेपानरावांचा ‘रुतबा’ कमी झाला हाेता. कुणीही त्यांच्या पदाची फारशी दखल घेत नव्हते. जाे कुणी येई ताे फक्त कॅबिनेट मंत्र्यांनाच भेटण्यासाठी आलेला असे. साहजिकच राज्यमंत्री साेपानरावांची उदासीनता अन् अस्वस्थपणा वाढत गेला. सध्या त्यांच्याकडे ‘करण्या’सारखे काेणतेही काम राहिले नव्हते.

साेपानरावांना नेहमी उदास राहताना पाहून त्यांची निजी सचिव गुरुदास पाण्डे यांनी अखेरीस त्यांना विचारलेच, ‘सर काय झालं आहे? आपण नेहमी अस्वस्थ दिसता! काही विशेष घडलंय का?’

‘अरे भावा, काय सांगू? कुणीही मला आताशा भेटण्यासाठीही येत नाही! समाेर कॅबिनेट मंत्र्यांच्या दालनासमाेर भलीमाेठी रांग लागलेली असते.’ साेपानरावांनी आपली खंत सचिवांपुढे बाेलून दाखविली.

‘बस्स, फारच क्षुल्लक गाेष्ट आहे ही सर! - आपण म्हणत असाल तर मी एक उपाय सुचवू का?’

सचिव गुरुदास पाण्डे, या राजकारणातील सव्यापसव्याचे ‘आचार्य चाणक्य’ किंवा ‘गुरू’ मानले जात हाेते. त्यांच्या या कर्तबगारीचा लाभ अनेक मंत्र्यांना त्यांचे ‘शागीर्द’ म्हणजे सचिव असताना ‘संकट विमाेचक’ म्हणून झालेला हाेता.

राज्यमंत्री साेपानराव पाटील यांच्या चिंतेवर ‘मार्ग’ सुचविण्यासाठी विचारणा करताना चाणाक्ष सचिव पाण्डे यांनी नफा-नुकसानीचा विचार केला हाेताच.

मंत्री साेपानराव गहिवरून पाण्डे यांना म्हणाले, ‘अरे भावा! आता फार लांबण लावू नकाेस! लवकर काय उपाय आहे ते सांग!’

आपली अस्वस्थता उन् उतावळेपणा काही क्षण लपवून आपले पूर्ण लक्ष पाण्डेजीवर एकवटले.

‘सर, आपल्याकडे साेपविण्यात आलेल्या महसूल खात्यांत बरेच कर्मचारी १०/१२ वर्षांपासून खुर्चीवर चिकटून ठाण मांडून बसले आहेत. त्यांची तातडीने गडचिराेली जिल्ह्यात बदली करण्यात आल्याचा आदेश जारी करा! तसेच अनेक कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची अथवा ‘सस्पेंड’ करण्यात येत असल्याची ‘वाॅर्निंग पाठवा. तूर्त हाच उपाय आपणापुढे मांडला आहे!’ सचिव पाण्डे.

‘पण यामुळे काय साध्य हाेईल?’

साेपानरावांनी निरागसपणे शंका व्यक्त केली.

‘यामुळे सर! आपली समस्या मिटेल अन् आपल्या इच्छेनुरूप सर्व काही घडेल.’ पाण्डे.

‘ठीक आहे! पण कॅबिनेट मंत्रीजी यात काही खाेडा तर घालणार नाहीत?’ - साेपानराव.

‘त्याची चिंता आपण मुळीच करू नका! मी ते पाहीन...! तसे पाहू गेल्यास आपण तर मा. मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील व्यक्ती आहात!’ सचिव पाण्डे यांनी त्यांना दिलासा दिला. त्या आश्वासनामुळे मंत्री साेपानराव यांचे धैर्य वाढले, आशा पल्लवित झाल्या, अन् पुढील पाऊल उचलण्यासाठी त्यांनी पाण्डे यांना अनुमती दिली.

मग काय पाहता? सचिव पांडे यांनी प्रत्येक कागदपत्रावर मंत्री साेपानराव यांची सही व शिक्का उठवून, कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे, कामावरून काढून टाकण्याचे अन् बदल्यांचे आदेश निर्वेधपणे जारी करण्यास सुरुवात केली.

या कामगिरीमुळे कर्मचाऱ्यांच्या विश्वात भूकंप झाल्याप्रमाणे हाहाकार उडाला.