शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

‘स्वाभिमानी’च्या प्रश्नावर सदाभाऊंच्या उत्तराची उत्सुकता

By admin | Updated: July 8, 2017 18:35 IST

२१ जुलैला २३ प्रश्नांची उत्तरे देणार : ‘आत्मक्लेश’ ऐवजी ‘शिवार’यात्रेत रमण्याचे कारण काय?

  आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ८ : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी खासदार राजू शेट्टींनी ‘आत्मक्लेश’यात्रा काढली; पण यामध्ये सहभागी न होता भाजप सरकारच्या ‘शिवार’यात्रेत सहभागी झाला, हे योग्य आहे का? यासह तब्बल २३ प्रश्नांची उत्तरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे मागितली आहेत. या प्रश्नांच्या उत्तरांसह सदाभाऊ खोत २१ जुलैला चौकशी समितीपुढे हजर होणार असून ‘स्वाभिमानी’ने विचारलेल्या प्रश्नांवर भाऊ नेमकी उत्तरे काय देतात? याविषयी उत्सुकता लागली आहे.

सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री पदाची संधी मिळाल्यापासून खोत व राजू शेट्टी यांच्यात मतभेद सुरू झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत खोत दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोप संघटनेतून केला गेला. त्यात भरीस भर म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत खोत यांनी सुपुत्र सागर खोत यांना रिंगणात उतरविले; पण हा निर्णय घेताना राजू शेट्टी यांना विश्वासात घेतले नसल्याने त्यांनी विरोध केल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर खोत यांनी आक्रमकपणे भूमिका घेतली नाही. उलट शिवसेनेच्या मंत्र्यांनी सरकारमध्ये राहून सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही. शेतकरी कर्जमाफीच्या काळात सदाभाऊ खोत यांनी सरकार धार्जिणी भूमिका घेतल्याचा राग शेट्टी यांच्या मनात होता.

स्वामिनाथन आयोग लागू करा, सात / बारा कोरा करा, यासह विविध मागण्यांसाठी शेट्टी यांनी पुणे ते मुंबई ‘आत्मक्लेश’ यात्रा काढली. यामध्ये खोत सहभागी झाले नाहीत; पण उलट त्यांनी ‘आत्मक्लेश’ यात्रेची खिल्ली उडविल्याने शेट्टी चांगलेच संतप्त झाले. यामुळे ‘स्वाभिमानी’ने खोत यांच्या एकूणच वागणुकीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी तब्बल २३ प्रश्नांवर त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते; पण आयोग लागू करता येत नसल्याचे त्यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. ही शेतकऱ्यांची फसवणूक नाही का? यावर आपले मत काय?.

शेट्टी यांच्या ‘आत्मक्लेश’ यात्रेऐवजी ‘शिवार’ यात्रेत सहभागी झाला, हे खरे आहे. मात्र, राज्यमंत्री झाल्यापासून आपण चळवळीविरोधात केलेल्या कृत्यांमुळे आपणास पश्चात्ताप होतो का? असे प्रश्न विचारले आहेत. शेट्टी-खोत यांचे मनोमिलन अशक्यच! खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संबंध कमालीचे ताणले आहेत. एकमेकांवरील बोचरी टीका पाहता आता कोणी कितीही प्रयत्न केले तर दोघांचे मनोमिलन अशक्य असल्याची चर्चा संघटनेत सुरू आहे.