शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामान्य जनतेचे प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:10 IST

इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा : शहर काँग्रेस समितीचे आंदोलनइचलकरंजी : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न, रेशन व्यवस्था यांसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने शुक्रवारी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, तहसीलदार वैशाली ...

ठळक मुद्देइचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने शुक्रवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सातत्याने पाठपुरावा करून गाºहाणे मांडूनही शासनाला जाग येत नाही.घरेलू कामगारांच्या सन्मानधनाचा प्रश्न सोडवावा,

इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा : शहर काँग्रेस समितीचे आंदोलनइचलकरंजी : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न, रेशन व्यवस्था यांसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने शुक्रवारी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, तहसीलदार वैशाली राजमाने यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी अध्यक्ष प्रकाश मोरे, अशोक आरगे, शेखर शहा, सुनील पाटील, राहुल खंजिरे, राजू बोंद्रे, अमृत भोसले, रूपाली कोकणे, बिल्किस मुजावर, लक्ष्मी पोवार, शकुंतला मुळीक, नरसिंह पारीक, बाळासाहेब कलागते, आदींसह कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते.१ शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात झाली. मुख्य मार्गांवरून फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी भाजप सरकारकडून सर्वसामान्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न तत्काळ निर्गत करावेत, अशी मागणी करण्यात आली.२ घरेलू कामगारांच्या समस्या, पंतप्रधान आवास योजनेतील जाचक अटी यासह रेशनकार्डावरील बंद झालेले धान्य यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल बनली आहे. या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून गाºहाणे मांडूनही शासनाला जाग येत नाही. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.३ शासनाने याची दखल घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत. केसरी शिधापत्रिकाधारकांना धान्य द्यावे. आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी पाच किलोमीटर अंतराची अट शिथील करावी. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेसाठी उत्पन्नाची अट ५० हजार रुपये करावी. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान वाढवावे. घरेलू कामगारांच्या सन्मानधनाचा प्रश्न सोडवावा, अशा मागण्या करण्यात आल्या.