शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

एस. टी. अभावी पंधरा गावांतील जनतेची पायपीट

By admin | Updated: April 30, 2015 00:28 IST

अर्धवट मोऱ्या, खराब रस्ते : गगनबावडा-राधानगरी एस. टी. बस बंद असल्याने गैरसोय

गगनबावडा : राधानगरी एस.टी. पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. गगनबावडा-बावेली-राधानगरी दरम्यान रस्त्यावरील अर्धवट मोऱ्या, खराब रस्ता, धोकादायक वळणे, अशा विविध कारणांमुळे २००९ पासून ही गाडी बंद आहे. शिवाय बावेलीपर्यंत येणाऱ्या गाड्याही बंद आहेत. दोन तालुक्यांचा जवळचा मार्ग म्हणून येथील बावेली, कडवे, काटेवाडी, वाण्याचीवाडी, भटवाडी, गारीवडे, सुतारवाडी, बोरबेट, आदी गगनबावडा तालुक्यातील राही, चौके, मानबेट, कंदलगाव, मांडरवाडी, शेट्येवाडी, पडसाळी या गावांतील जनतेला एस. टी. अभावी पायपीट करावी लागत आहे.येथून दोन्ही तालुक्यांच्या ठिकाणी आयटीआय, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते. म्हणून ही गाडी पूर्ववत सुरू करण्यासाठीचे एस. टी. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. काटेवाडी ते इंडाल फाटा एक कि. मी. रस्ता वनखात्याच्या हद्दीत असल्याने हे काम रेंगाळले होते. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या मुख्य रस्त्याचे काम रखडले होते. तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके यांनी वनखात्याकडे हा प्रस्ताव पाठविला होता. त्यामुळे गतवर्षी येथे खडीकरण व रुंदीकरण झाल्याने गाडीचा अडसर दूर झाला. परिवहन विभागाने संबंधित बांधकाम विभागाचे ‘ना हरकत’ मागितले होते. बावेली गावठाण येथे रुंदीकरण व खड्डे भरणे ही कामे श्रमदानातून केली. गाडी सुरू करण्यासाठी ठराव केले; पण अद्याप गाडी सुरू केली नाही. त्यामुळे पंधरा गावांतील प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी संबंधितांनी वरिष्ठांच्याकडे केली आहे. ाार्ताहर)२०१४ च्या मे महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्या प्रिया वरेकर यांनी गगनबावडा-राधानगरी गाडी सुरू करण्याबाबत मागणी केली असता, सीईओ अविनाश सुभेदार यांनी पावसाळा संपताच ही गाडी सुरू करण्यास हिरवा कंदील दिला होता. परंतु, ते अजून आश्वासनच राहिले आहे.