शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी. अभावी पंधरा गावांतील जनतेची पायपीट

By admin | Updated: April 30, 2015 00:28 IST

अर्धवट मोऱ्या, खराब रस्ते : गगनबावडा-राधानगरी एस. टी. बस बंद असल्याने गैरसोय

गगनबावडा : राधानगरी एस.टी. पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. गगनबावडा-बावेली-राधानगरी दरम्यान रस्त्यावरील अर्धवट मोऱ्या, खराब रस्ता, धोकादायक वळणे, अशा विविध कारणांमुळे २००९ पासून ही गाडी बंद आहे. शिवाय बावेलीपर्यंत येणाऱ्या गाड्याही बंद आहेत. दोन तालुक्यांचा जवळचा मार्ग म्हणून येथील बावेली, कडवे, काटेवाडी, वाण्याचीवाडी, भटवाडी, गारीवडे, सुतारवाडी, बोरबेट, आदी गगनबावडा तालुक्यातील राही, चौके, मानबेट, कंदलगाव, मांडरवाडी, शेट्येवाडी, पडसाळी या गावांतील जनतेला एस. टी. अभावी पायपीट करावी लागत आहे.येथून दोन्ही तालुक्यांच्या ठिकाणी आयटीआय, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते. म्हणून ही गाडी पूर्ववत सुरू करण्यासाठीचे एस. टी. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. काटेवाडी ते इंडाल फाटा एक कि. मी. रस्ता वनखात्याच्या हद्दीत असल्याने हे काम रेंगाळले होते. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या मुख्य रस्त्याचे काम रखडले होते. तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके यांनी वनखात्याकडे हा प्रस्ताव पाठविला होता. त्यामुळे गतवर्षी येथे खडीकरण व रुंदीकरण झाल्याने गाडीचा अडसर दूर झाला. परिवहन विभागाने संबंधित बांधकाम विभागाचे ‘ना हरकत’ मागितले होते. बावेली गावठाण येथे रुंदीकरण व खड्डे भरणे ही कामे श्रमदानातून केली. गाडी सुरू करण्यासाठी ठराव केले; पण अद्याप गाडी सुरू केली नाही. त्यामुळे पंधरा गावांतील प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी संबंधितांनी वरिष्ठांच्याकडे केली आहे. ाार्ताहर)२०१४ च्या मे महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्या प्रिया वरेकर यांनी गगनबावडा-राधानगरी गाडी सुरू करण्याबाबत मागणी केली असता, सीईओ अविनाश सुभेदार यांनी पावसाळा संपताच ही गाडी सुरू करण्यास हिरवा कंदील दिला होता. परंतु, ते अजून आश्वासनच राहिले आहे.