शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी. ला प्रवाशांचे वावडे

By admin | Updated: September 17, 2015 23:45 IST

चालकांच्या मनमानीचा फटका : शिवाजी विद्यापीठ, उजळाईवाडी येथे बस थांबत नाही

प्रदीप शिंदे - कोल्हापूर  q--एस. टी. महामंडळाच्यावतीने ‘हात दाखवा, गाडी थांबवा!’ अशी घोषणाबाजी कधी काळी करण्यात आली होती; पण ‘हात दाखवून अवलक्षण’चाच काहीसा अनुभव तेव्हाही येत होता व आताही येत आहे. त्याचा प्रत्यय कोल्हापूर ते गडहिंग्लज, आजरा, चंदगड, बेळगावकडे जाणाऱ्या एस. टी. बसेसमधून दररोज प्रवाशांना येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र परिवहन महामंडळास प्रवाशांचे वावडे आहे का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. एस. टी. नफ्यात आणण्यासाठी महामंडळाने विविध योजना सुरू केल्या आहेत़ मात्र, एस. टी.चे काही कर्मचारी त्यालाच पायदळी तुडवत असल्याचे चित्र सध्या गडहिंग्लज, आजरा, चंदगड आगारातून कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या एस. टी. बसेसकडे पाहिल्यानंतर दिसून येते. चालकांच्या या मनमानी कारभारामुळेच प्रवाशांना आर्थिक भुर्दंड तर बसतोच पण चालकांच्या या बेशिस्त वर्तनाकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याने तोट्यातील एस.टी. अधिकच खड्ड्यात रूतत आहे. या मार्गावरील अनेक गाड्या प्रशासनाने दिलेल्या थांब्यावर थांबत नाहीत. विशेषकरून टेंबलाईवाडी, शिवाजी विद्यापीठ, आर.सी.सी. बिल्डर स्टॉप, उजळाईवाडी येथील उड्डाणपूल परिसरात अनेक प्रवाशांनी हात दाखवूनसुद्धा एस. टी. बसेस न थांबता रिकामी घेऊन जाण्याचा चालक व वाहकांना धन्यता वाटते. त्याचा फटका विशेषत: महाविद्यालयीन तरुण- तरुणींसह वयोवृद्धांना बसत आहे. शासनाने दिलेल्या एस. टी. सवलतीचा लाभ घेत हे ज्येष्ठ नागरिक एस. टी.नेच प्रवास करत असतात़ मात्र, त्यांनाही गाडी थांबविण्यासाठी विनंती करूनसुद्धा चालक एस. टी. थांबवत नसल्याचा अनुभव येत आहेत. विनाथांब्याचे गणित काय?कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातील कंट्रोल रूमच्या माहितीनुसार, गडहिंग्लज आगारातून कोल्हापुरात दररोज ४० फेऱ्या होतात. त्यातील कोल्हापूर ८ फेऱ्यांची विना थांबा गाड्यांची नोंद आहे. मात्र, या मार्गावर सर्व गाड्या विनाथांबा असल्यासारखे धावतात. त्यांच्या या मनमानी कारभाराचा फटका मात्र एस.टी.च्या उत्पन्नावर व प्रवाशांना बसत आहे. आर.सी.सी. बिल्डर स्टॉपची ‘अ‍ॅलर्जी’हनुमानगर परिसर, ग्रीन पार्क, मोरेवाडी, आर. के. नगर, राजेंद्रनगर परिसरातील नागरिकांसह शिवाजी विद्यापीठाच्या बी.टेक. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गोवा, आजरा, चंदगडसह कर्नाटकातील निपाणी, बेळगावकडे जाण्यासाठी आर.सी.सी बिल्डर हा स्टॉप सोयीस्कर आहे. त्यामुळे अनेकजण या ठिकाणी एस.टी.ची वाट पाहत थांबतात. अनेक वेळेला बसेस या ठिकाणी थांबण्याची विनंती करूनसुद्धा गाड्या थांबविल्या जात नाहीत. मात्र, कर्नाटकातील गाड्या थांबून प्रवाशांना घेऊन जातात. त्यामुळे अनेकजण बेळगाव, निपाणीवरून येताना कर्नाटक गाड्यांना पहिली पसंती देतात. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील एस.टी.ला प्रवाशांची अ‍ॅलर्जी आहे का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.मला तवंदी, शिपूर या गावी आठवड्यातून एक-दोनदा जावे लागते. जाते व येते वेळी आर.सी.सी. बिल्डर स्टॉप येथे एस.टी. बसगाड्या थांबत नाहीत. बऱ्याच वेळेला गावावरून येताना उशीर होतो. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकावर यावे लागते. तेथून परत आर. के. नगरला येण्यासाठी रिक्षाला ८० ते ९० रुपये भाडे जाते. त्यामुळे विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे. नानासाहेब पाटील, प्रवासी