शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

एस. टी. जाताना फुल्ल, येताना रिकामी

By admin | Updated: July 28, 2016 00:53 IST

कर्नाटक राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप

कोल्हापूर : कर्नाटक राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बेळगावकडे जाण्यासाठी जादा वीस बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, जाताना या बसगाड्या हाऊसफुल्ल, तर येताना मात्र रिकाम्या परत येत आहेत. या ‘बंद’मुळे कोल्हापुरातील कर्नाटक बसच्या दररोजच्या सुमारे २४० फेऱ्या रद्द झाल्या आहेत. कर्नाटक राज्य शासनाने परिवहन कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी दहा टक्के वेतनवाढ दिली होती. यंदाही तेवढीच देण्यात आली आहे. तिला जोरदार विरोध करीत ‘परिवहन’च्या कर्मचाऱ्यांनी सोमवार (दि. २५) पासून ‘बेमुदत बंद’ आंदोलन सुरू केले आहे. वेतनवाढीच्या मागणीसाठी बुधवारी तिसऱ्या दिवशीही कर्नाटकमधील परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. कोल्हापुरातील कर्नाटकातील विविध मार्गांवरील सुमारे २४० फेऱ्या रद्द झाल्या आहेत. हा बंद आपल्या पथ्यावर पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने रत्नागिरी, कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक आणि संभाजीनगर आगारामार्फत २० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. जाताना या गाड्या तुडुंब भरून जातात. मात्र, कर्नाटक पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव महाराष्ट्रातून येणाऱ्या एस. टी. गाड्यांना काकतीपर्यंत जाण्याची परवानगी दिली आहे. तिथून पुढे बेळगावमध्ये जाण्यासाठी खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. त्यामुळे या गाड्यांना जाताना हाऊसफुल्ल व येताना चार-पाच प्रवासी घेऊनच परतावे लागत आहे.