शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

‘एस. टी.’चे शासनात विलिनीकरण करा, अन्यथा तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:19 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे एस. टी. महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत बनली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ अशक्य आहे. त्यावर कायमस्वरूपी ...

कोल्हापूर : कोरोनामुळे एस. टी. महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत बनली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ अशक्य आहे. त्यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून या महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, अशी संघटनेची मागणी आहे. विलिनीकरणाचा निर्णय लवकर घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी शुक्रवारी दिला.

महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. विलिनीकरणाचा प्रयोग इतर राज्यात यशस्वी झाला असून, आपल्या राज्यात तो होण्यासाठी परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी प्रयत्न करावेत. एस. टी.तील काही काँग्रेसच्या संघटना स्वार्थासाठी सरकार विरोधात असंतोष पसरवत आहेत. त्यांच्यावर पक्षाने कठोर कारवाई करण्याची मागणी बरगे यांनी केली. एस. टी.ला उर्जितावस्थेत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कर्मचारी संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले. या मेळाव्यात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते बी. डी. शिंदे, राजेंद्र पाटील, मियालाल पटवेगार, हिंदुराव कुंभार, संजय कांबळे, ए. बी. माने, संजय पोवार-वाईकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते बबनराव थोरात, ए. आर. पाटील, परवीन पठाण, बी. आर. साळोखे, सुनील फल्ले, एस. वाय. पोवार, अय्याज चौगुले, ए. ए. गवंडी, अनिता पाटील, वैशाली पिंगळे, गजानन विचारे आदी उपस्थित होते. संघटनेचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी प्रास्तविक केले. रावण समुद्रे यांनी सूत्रसंचालन केले. संजय सासने यांनी आभार मानले.

श्रीरंग बरगे म्हणाले की, महामंडळाचा संचित तोटा सध्या साडेसहा हजार कोटी आहे. महामंडळ उर्जितावस्थेत आणण्यासाठी परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील आणि महामंडळाचे एमडी. शेखर चन्ने यांचे नियोजनबद्ध काम असून, मंत्री पाटील व एमडी चन्ने यांना विभागीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे.

चौकट

‘कागल’च्या व्यवस्थापकांवर कारवाई करा

लॉकडाऊनमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा कागल आगार व्यवस्थापकांनी निरोप समारंभ केला नाही. त्यांच्यावर कारवाईची मागणी चिकुर्डेकर यांनी केली. जे आगार व्यवस्थापक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निरोप समारंभ करीत नाहीत. त्यांची निश्चितच दखल घेतली जाईल. कामगारांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आमदार जाधव यांनी सांगितले.