शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

‘एस. टी.’चे शासनात विलिनीकरण करा, अन्यथा तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:19 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे एस. टी. महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत बनली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ अशक्य आहे. त्यावर कायमस्वरूपी ...

कोल्हापूर : कोरोनामुळे एस. टी. महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत बनली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ अशक्य आहे. त्यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून या महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, अशी संघटनेची मागणी आहे. विलिनीकरणाचा निर्णय लवकर घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी शुक्रवारी दिला.

महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. विलिनीकरणाचा प्रयोग इतर राज्यात यशस्वी झाला असून, आपल्या राज्यात तो होण्यासाठी परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी प्रयत्न करावेत. एस. टी.तील काही काँग्रेसच्या संघटना स्वार्थासाठी सरकार विरोधात असंतोष पसरवत आहेत. त्यांच्यावर पक्षाने कठोर कारवाई करण्याची मागणी बरगे यांनी केली. एस. टी.ला उर्जितावस्थेत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कर्मचारी संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले. या मेळाव्यात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते बी. डी. शिंदे, राजेंद्र पाटील, मियालाल पटवेगार, हिंदुराव कुंभार, संजय कांबळे, ए. बी. माने, संजय पोवार-वाईकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते बबनराव थोरात, ए. आर. पाटील, परवीन पठाण, बी. आर. साळोखे, सुनील फल्ले, एस. वाय. पोवार, अय्याज चौगुले, ए. ए. गवंडी, अनिता पाटील, वैशाली पिंगळे, गजानन विचारे आदी उपस्थित होते. संघटनेचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी प्रास्तविक केले. रावण समुद्रे यांनी सूत्रसंचालन केले. संजय सासने यांनी आभार मानले.

श्रीरंग बरगे म्हणाले की, महामंडळाचा संचित तोटा सध्या साडेसहा हजार कोटी आहे. महामंडळ उर्जितावस्थेत आणण्यासाठी परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील आणि महामंडळाचे एमडी. शेखर चन्ने यांचे नियोजनबद्ध काम असून, मंत्री पाटील व एमडी चन्ने यांना विभागीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे.

चौकट

‘कागल’च्या व्यवस्थापकांवर कारवाई करा

लॉकडाऊनमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा कागल आगार व्यवस्थापकांनी निरोप समारंभ केला नाही. त्यांच्यावर कारवाईची मागणी चिकुर्डेकर यांनी केली. जे आगार व्यवस्थापक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निरोप समारंभ करीत नाहीत. त्यांची निश्चितच दखल घेतली जाईल. कामगारांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आमदार जाधव यांनी सांगितले.