शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:18 IST

बाचणी : शाळांमध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहाराचा पुरवठा धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे शाळा सुरू होऊन अठरा दिवस झाले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी या आहारापासून वंचित आहेत. पुरवठा करणाऱ्या ठेकेदार बदलाचा हा परिणाम असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी शाळा पातळीवरही या आहाराची सोय करण्यात आली नाही.या आहारासाठी जिल्ह्याला महिन्याला ...

बाचणी : शाळांमध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहाराचा पुरवठा धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे शाळा सुरू होऊन अठरा दिवस झाले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी या आहारापासून वंचित आहेत. पुरवठा करणाऱ्या ठेकेदार बदलाचा हा परिणाम असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी शाळा पातळीवरही या आहाराची सोय करण्यात आली नाही.या आहारासाठी जिल्ह्याला महिन्याला सुमारे २००० ते २१५० टन इतके धान्य लागत असून, आतापर्यंत केवळ ८०० टनच पुरवठा झाला आहे. यातही शहरात ५००, तर ग्रामीण भागात केवळ २५० टन धान्य पुरवठा झाला आहे.राज्यातील सर्व शाळांना पोषण आहारासाठी धान्य पुरवठ्याचा ठेका कंझ्युमर फेडरेशन कंपनीला देण्यात आला आहे. १५ जूनला शाळा सुरू झाली असून, आजपर्यंत ग्रामीण भगातील बहुतांशी शाळांत हा धान्य पुरवठा झालेला नाही. विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. ठेकेदाराच्या धान्य पुरवठ्याच्या धिम्या गतीमुळे पुरवठा होण्यास अजून किती दिवस लागतील हे मात्र प्रशासनातील कोणताच अधिकारी खात्रीशीर सांगत नाही. त्यामुळे पोषण आहाराचे धान्य शाळेत वेळेत पोहोचण्यावर प्रशासनातील कोणाचेही नियंत्रण नाही .दरम्यान, धान्य पोहोचले नाही म्हणून संबंधित शाळांतील मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापकांनी मात्र याची कसलीच तजवीज केलेली दिसत नाही. कारण कोणत्याच शाळेने अखंडितपणे आहार दिलेला नाही. याकडे शिक्षण विभागानेही गांभीर्याने पाहिले नाही.शिक्षक बदलीने नियोजनाचे तीनतेरागत महिन्यात शिक्षक बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली, पण त्यातील वाद मात्र अजूनही प्रलंबित आहेत. चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असून, याकडेच सर्व शिक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. या गोंधळात विद्यार्थ्यांना आहार देण्याचे मात्र कुणीच नियोजन केले नसल्याने त्याचा फटका ग्र्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. प्रशासनही याबाबत गंभीर नाही.