शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

ग्रामीण विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:18 IST

बाचणी : शाळांमध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहाराचा पुरवठा धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे शाळा सुरू होऊन अठरा दिवस झाले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी या आहारापासून वंचित आहेत. पुरवठा करणाऱ्या ठेकेदार बदलाचा हा परिणाम असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी शाळा पातळीवरही या आहाराची सोय करण्यात आली नाही.या आहारासाठी जिल्ह्याला महिन्याला ...

बाचणी : शाळांमध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहाराचा पुरवठा धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे शाळा सुरू होऊन अठरा दिवस झाले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी या आहारापासून वंचित आहेत. पुरवठा करणाऱ्या ठेकेदार बदलाचा हा परिणाम असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी शाळा पातळीवरही या आहाराची सोय करण्यात आली नाही.या आहारासाठी जिल्ह्याला महिन्याला सुमारे २००० ते २१५० टन इतके धान्य लागत असून, आतापर्यंत केवळ ८०० टनच पुरवठा झाला आहे. यातही शहरात ५००, तर ग्रामीण भागात केवळ २५० टन धान्य पुरवठा झाला आहे.राज्यातील सर्व शाळांना पोषण आहारासाठी धान्य पुरवठ्याचा ठेका कंझ्युमर फेडरेशन कंपनीला देण्यात आला आहे. १५ जूनला शाळा सुरू झाली असून, आजपर्यंत ग्रामीण भगातील बहुतांशी शाळांत हा धान्य पुरवठा झालेला नाही. विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. ठेकेदाराच्या धान्य पुरवठ्याच्या धिम्या गतीमुळे पुरवठा होण्यास अजून किती दिवस लागतील हे मात्र प्रशासनातील कोणताच अधिकारी खात्रीशीर सांगत नाही. त्यामुळे पोषण आहाराचे धान्य शाळेत वेळेत पोहोचण्यावर प्रशासनातील कोणाचेही नियंत्रण नाही .दरम्यान, धान्य पोहोचले नाही म्हणून संबंधित शाळांतील मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापकांनी मात्र याची कसलीच तजवीज केलेली दिसत नाही. कारण कोणत्याच शाळेने अखंडितपणे आहार दिलेला नाही. याकडे शिक्षण विभागानेही गांभीर्याने पाहिले नाही.शिक्षक बदलीने नियोजनाचे तीनतेरागत महिन्यात शिक्षक बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली, पण त्यातील वाद मात्र अजूनही प्रलंबित आहेत. चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असून, याकडेच सर्व शिक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. या गोंधळात विद्यार्थ्यांना आहार देण्याचे मात्र कुणीच नियोजन केले नसल्याने त्याचा फटका ग्र्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. प्रशासनही याबाबत गंभीर नाही.