शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून रंकाळा परिसर ‘चकाचक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 18:08 IST

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी आणि कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजने (एनएसएस)च्या ८०० स्वयंसेवकांनी रविवारी सकाळी तीन तास श्रमदान करून रंकाळा तलाव परिसर चकाचक केला. या स्वच्छता मोहिमेत रोटरी क्लब आॅफ करवीरचे सदस्य सहभागी झाले होते. या मोहिमेअंतर्गत सुमारे सात टन कचºयाचा उठाव झाला.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाचा उपक्रमसात टन कचºयाचा उठाव‘एनएसएस’च्या सुमारे आठशे स्वयंसेवकांचा सहभाग क्रांतिदिनी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी आणि कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजने (एनएसएस)च्या ८०० स्वयंसेवकांनी रविवारी सकाळी तीन तास श्रमदान करून रंकाळा तलाव परिसर चकाचक केला. या स्वच्छता मोहिमेत रोटरी क्लब आॅफ करवीरचे सदस्य सहभागी झाले होते. या मोहिमेअंतर्गत सुमारे सात टन कचºयाचा उठाव झाला.

या स्वच्छता मोहिमेस सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी इराणी खणी, मोहिते खण, रंकाळा पदपथ पतौडी उद्यान, संध्यामठाकडील उद्यान, रंकाळा तलावाच्या बाजूने जाणारा रस्ता या परिसराची स्वच्छता केली. घनकचरा, काचा व प्लास्टिकच्या बाटल्या विद्यार्थ्यांनी गोळा केल्या. तीन तासांचा या मोहिमेत सात टन कचरा जमा करण्यात आला. यात प्लास्टिक कचºयाचे स्वतंत्र संकलन करण्यात आले.

रोटरी क्लबने पुरविलेल्या पोत्यांमध्ये शंभर किलो प्लास्टिक कचरा संकलित करून स्वतंत्र वाहनातून तो पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला. या क्लबच्या वतीने पर्यावरण रक्षणाबरोबरच स्वच्छतेचा संदेश देणारे वाहन मोहिमेत सहभागी केले होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, ‘एनएसएस’चे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, रोटरी क्लबचे एस. एन. पाटील, विशाळ जांबळे, प्रमोद चौगुले, ज्ञानदेव केसरकर, हरेश पटेल, कुशल पटेल, मनोज कोळेकर, शीतल दुग्गे, किरण खटावकर, काशीनाथ सांगावकर, विद्यापीठातील विविध विभाग, शहरातील महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ‘एनएसएस’चे स्वयंसेवकांनी श्रमदान केले.

मोहिमेसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने दोन डंपर, एक पाण्याचा टँकर, तर विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग व ‘रोटरी क्लब’ने झाडू, विळे, टोपल्या, पोती, हातमोजे, मास्क उपलब्ध करून दिले. दरम्यान, विद्यापीठाने नियमितपणे रंकाळा परिसरातील इराणी खण परिसरात स्वच्छता मोहिमा राबविल्या आहेत. दहा टन कचºयाचा उठाव यापूर्वी केला आहे.स्वच्छतेशी रक्षाबंधनाचा संकल्प करावा

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या निर्देशानुसार विद्यापीठाने रंकाळा परिसराची नियमित स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी विद्यापीठाकडून स्वच्छता मोहीम नियमितपणे राबविण्यात येईल. उद्याच्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मनातच स्वच्छतेशी रक्षाबंधन करण्याचा संकल्प करावा. नागरिकांनी आपापल्या परिसरात जागरूकता दाखवून स्वच्छतेची सवय अंगी बाणवली, तर स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यास वेळ लागणार नाही.

क्रांतिदिनी महास्वच्छता अभियान

क्रांतिदिनानिमित्त बुधवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत कोल्हापूर शहर परिसरातील विविध प्राचीन वास्तू, पुतळे, रस्ते व परिसरात विद्यापीठातर्फे महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये विद्यापीठ परिसरासह बिंदू चौक, शिवाजी चौक, भवानी मंडप, अंबाबाई मंदिर, गंगावेस, रेल्वे स्टेशन, एस. टी. स्टँड, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, कावळा नाका, खासबाग, गांधी मैदान आदी २८ ठिकाणच्या पुतळ्यांची स्वच्छता केली जाईल. यात शहरातील विविध महाविद्यालयांचे ‘एनएसएस’चे स्वयंसेवक सहभागी होणार असल्याचे ‘एनएसएस’चे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले.