शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी भ्रष्टाचारी अन् विरोधकही खवय्ये

By admin | Updated: December 14, 2014 23:44 IST

इस्लामपुरातील स्थिती : सामान्य जनतेचे प्रश्न अधांतरी; जनतेला वालीच नसल्याचे चित्र

अशोक पाटील - इस्लामपूर -‘एक गाव बारा भानगडी’, अशी स्थिती सध्या इस्लामपूर शहराची झाली आहे. सत्तेच्या खुर्चीमागील भानगडी चव्हाट्यावर आणण्याची जबाबदारी असलेल्या विरोधकांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे शहराचा विकास होण्याऐवजी शहराच्या बकालपणातच दिवसेंदिवस वाढ होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या भानगडी ‘मॅनेज’ करुन विरोधक गलेलठ्ठ झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मात्र भरडली जात आहे.शहराच्या १९८0 च्या विकास आराखड्यानंतर पालिकेने दोन वेळा नियोजित विकास आराखडा प्रस्तावित केला. या विकास आराखड्याच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांतील काही महाभागांनी लाखो रुपयांचा मलिदा जमा केला. तसेच स्वत:च्या भूखंडातील अडथळे सर्वसामान्यांच्या माथी मारुन आपले भूखंड सुरक्षित करुन ठेवले आहेत.बेघर वसाहतीतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वेठीस धरले आहे. त्यांना देण्यात आलेली घरे ही निकृष्ट दर्जाची आहेत. महादेवनगर परिसरातील बांधलेली घरे केव्हा उद्ध्वस्त होतील हे सांगता येत नाही. येथील घरांचे वाटप झाले असले तरी, केवळ २ ते ४ कुटुंबेच वास्तव्यास आहेत. वीज व पाण्याची व्यवस्था नसल्याने येथे राहण्यास कोणीही धजावत नाही.अशा परिस्थितीत कापूसखेड रस्त्याजवळील स्मशानभूमीलगत बांधलेल्या नवीन घरकुलांची दफनभूमी कधी होईल हे सांगता येत नाही. यशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. तसेच विरोधी भाजपचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य बाबासाहेब सूर्यवंशी यांनी विद्यमान नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी केलेल्या भानगडी बाहेर काढल्या असून त्यांनी त्यासाठी प्रशासनाकडे दाद मागितली आहे. रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यास पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. परंतु जुन्याच रस्त्यांना खोदून त्यांचे पॅचवर्क करण्याचा उद्योग सुरु आहे. याकडे विरोधकांचे दुर्लक्ष आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या स्वप्नातील रस्ते सत्यात कधी उतरणार, याचे उत्तर मात्र भाबड्या जनतेला मिळत नाही. रस्त्यावरील एल. ई. डी. दिव्यांच्या हजेरीतही जनतेला अंधारात चाचपडत जावे लागत आहे. पालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचे नाटक सुरु केले आहे. यामध्ये विरोधकांना टिपून त्यांचीच अतिक्रमणे काढायची आणि संबंधित समर्थकांना बगल देण्याचा उद्योग होत असल्याने ही अतिक्रमणे काढण्याची मोहीम वादग्रस्त ठरली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभिकरणाचे तीनतेरा वाजले आहेत. याला कारणीभूत दलित संघटनेचे नेते आहेत. दलितांमध्ये नेता कोण? हेच कोडे सुटत नसल्याने सत्ताधाऱ्यांनी या पुतळ्याच्या सुशोभिकरणातील रकमेवर हात मारण्याचा उद्योग सुरु झाला आहे. त्यामुळे या कामातील ठेकेदार हैराण झाला असून त्याला लुबाडण्याचे उद्योग सुरू असल्याची चर्चा आहे. बाजारादिवशी शहरात वाहतुकीची कोंडी होत असते. याबाबत दखल घेतली जात नाही. एखाद्याचा जीव गेल्यांतरच हा प्रश्न सुटणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.विरोधक खंबीरपणे आपली भूमिका बजावत आहेत. एखादा विरोधक सत्ताधाऱ्यांना मॅनेज झाला असेल असे वाटत नाही. परंतु गेली २५ वर्षे सत्ताधारी सत्तेत असल्यामुळे विरोधकांच्या तक्रारीची दखल न घेता मनमानी पध्दतीने कारभार करत आहेत. राज्यात सत्ता असल्यामुळे प्रशासनावर दबाव टाकून अनेक प्रकरणे दाबण्यात आली आहेत. आता केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे विक्रम पाटील यांना सोबत घेऊन आम्ही सर्व बेकायदेशीर कामांचा पर्दाफाश करणार आहोत. आम्ही सर्व विरोधक एकच आहोत, त्याचा प्रत्यय काही काळात येईल.- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते, इ. न. पा.