शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

गड्या आपला गावच बरा...

By admin | Updated: June 18, 2016 00:47 IST

हद्दवाढीविरोधात भावना : विकासाबाबत विश्वास निर्माण करण्याची गरज

राजाराम लोंढे ---कोल्हापूर --शहर परिसरातील ग्रामपंचायती नागरिकांना मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे पुरवत असताना कोल्हापूर शहरात येण्याचा आग्रह कशासाठी? केवळ करासाठी शहरात घेण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्याला आमचा विरोध राहणारच. शहर व उपनगरांतील सोयी-सुविधा पाहता, आम्ही आमच्या गावात सुखी आहोत, अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागांतून उमटत आहेत. शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेल्या काही महिन्यापासून ऐरणीवर आला आहे. शहराला लागून असलेल्या गावांना विचारात न घेताच सरकारने निर्णय घ्यावा, असा महापालिकेचा आग्रह आहे; तर अगोदर शहरातील नागरिकांना सुविधा पुरवा आणि मगच हद्दवाढीचा विचार करा, अशी भूमिका प्रस्तावित हद्दवाढीतील गावांतील नागरिकांची आहे. हद्दवाढीविरोधात अठरा गावे व दोन औद्योगिक वसाहतींनी शुक्रवारी काम बंद करून आपला निषेध नोंदविला. दैनंदिन व्यवहारांसोबत दुकानांसह सर्व कामे बंद ठेवून कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ देणार नाही, असा निर्धार केला. हद्दवाढीला नेमका विरोध का, याबाबत ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांनी तीव्र शब्दांत हद्दवाढीस विरोध केला. पाणी, वीज, गटारींसह सर्व सुविधा ग्रामपंचायत अगदी माफक दरात देत असताना कशासाठी शहरात जायचे, शहरात फायद्यापेक्षा तोटाच अधिक आहे. महापालिकेच्या सुविधा वापरता; मग शहरात का येत नाही, असे शहरातील नेते म्हणत आहेत; पण के. एम. टी.सह इतर सुविधा देऊन आमच्यावर कोण उपकार करीत नाही, त्यासाठी आम्ही पैसे मोजतो. हद्दवाढीबाबत जनमताच्या विरोधात जाऊन सक्ती कराल तर याद राखा, टोलमुक्तीसारखे जनआंदोलन हद्दवाढीविरोधात उभे केले जाईल, असा इशारा या गावातील लोकांनी यावेळी दिला.शहर विकासाच्या बाबतीत मॉडेल करा, ग्रामीण जनतेमध्ये विश्वास निर्माण करा, मग लोक आपोआप शहरात येतील; पण मुळात शहर सुविधांबाबत भकास असताना आम्हाला त्यात कशाला ओढता? आमचा संसार गुण्यागोविंदाने सुरू आहे, त्यात माती टाकू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत. महापालिकेत ३५ वर्षे नोकरी केली. तिथे येणाऱ्या सामान्य माणसाची काय अवस्था होते, ते डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे आम्हाला आगीत उडी मारण्यास कोणी सांगू नये. - लक्ष्मण गाडगीळ (पाचगाव)ुविरोध : त्यामागील विविध कारणे मूलभूत सुविधांबाबत खात्री नाही. करांचा बोजा अंगावरशेतीसह मोकळ्या जागांवर आरक्षण पडण्याची शेतकऱ्यांना भीती जनावरे सांभाळणे अवघड होईल.ग्रामीण भागात माफक दरात सोयीसुविधा उपलब्ध होतात.शहरात राहण्याबाबत फारशी उत्सुकता दिसत नाही.