शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

गड्या आपला गावच बरा...

By admin | Updated: June 18, 2016 00:47 IST

हद्दवाढीविरोधात भावना : विकासाबाबत विश्वास निर्माण करण्याची गरज

राजाराम लोंढे ---कोल्हापूर --शहर परिसरातील ग्रामपंचायती नागरिकांना मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे पुरवत असताना कोल्हापूर शहरात येण्याचा आग्रह कशासाठी? केवळ करासाठी शहरात घेण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्याला आमचा विरोध राहणारच. शहर व उपनगरांतील सोयी-सुविधा पाहता, आम्ही आमच्या गावात सुखी आहोत, अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागांतून उमटत आहेत. शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेल्या काही महिन्यापासून ऐरणीवर आला आहे. शहराला लागून असलेल्या गावांना विचारात न घेताच सरकारने निर्णय घ्यावा, असा महापालिकेचा आग्रह आहे; तर अगोदर शहरातील नागरिकांना सुविधा पुरवा आणि मगच हद्दवाढीचा विचार करा, अशी भूमिका प्रस्तावित हद्दवाढीतील गावांतील नागरिकांची आहे. हद्दवाढीविरोधात अठरा गावे व दोन औद्योगिक वसाहतींनी शुक्रवारी काम बंद करून आपला निषेध नोंदविला. दैनंदिन व्यवहारांसोबत दुकानांसह सर्व कामे बंद ठेवून कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ देणार नाही, असा निर्धार केला. हद्दवाढीला नेमका विरोध का, याबाबत ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांनी तीव्र शब्दांत हद्दवाढीस विरोध केला. पाणी, वीज, गटारींसह सर्व सुविधा ग्रामपंचायत अगदी माफक दरात देत असताना कशासाठी शहरात जायचे, शहरात फायद्यापेक्षा तोटाच अधिक आहे. महापालिकेच्या सुविधा वापरता; मग शहरात का येत नाही, असे शहरातील नेते म्हणत आहेत; पण के. एम. टी.सह इतर सुविधा देऊन आमच्यावर कोण उपकार करीत नाही, त्यासाठी आम्ही पैसे मोजतो. हद्दवाढीबाबत जनमताच्या विरोधात जाऊन सक्ती कराल तर याद राखा, टोलमुक्तीसारखे जनआंदोलन हद्दवाढीविरोधात उभे केले जाईल, असा इशारा या गावातील लोकांनी यावेळी दिला.शहर विकासाच्या बाबतीत मॉडेल करा, ग्रामीण जनतेमध्ये विश्वास निर्माण करा, मग लोक आपोआप शहरात येतील; पण मुळात शहर सुविधांबाबत भकास असताना आम्हाला त्यात कशाला ओढता? आमचा संसार गुण्यागोविंदाने सुरू आहे, त्यात माती टाकू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत. महापालिकेत ३५ वर्षे नोकरी केली. तिथे येणाऱ्या सामान्य माणसाची काय अवस्था होते, ते डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे आम्हाला आगीत उडी मारण्यास कोणी सांगू नये. - लक्ष्मण गाडगीळ (पाचगाव)ुविरोध : त्यामागील विविध कारणे मूलभूत सुविधांबाबत खात्री नाही. करांचा बोजा अंगावरशेतीसह मोकळ्या जागांवर आरक्षण पडण्याची शेतकऱ्यांना भीती जनावरे सांभाळणे अवघड होईल.ग्रामीण भागात माफक दरात सोयीसुविधा उपलब्ध होतात.शहरात राहण्याबाबत फारशी उत्सुकता दिसत नाही.