शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

‘रुद्र’साठीही वकीलांची फौज उभारू

By admin | Updated: September 25, 2015 00:26 IST

संजीव पुनाळेकर : पापे लपविण्यासाठी ‘सनातन’वर बंदीची मागणी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला संशयित समीर गायकवाड याला ‘बळीचा बकरा’ बनविला जात आहे. मडगाव (गोवा) बॉम्बस्फोटातील संशयित रुद्र पाटील यानेही न्यायालयात हजर व्हावे. त्याच्याही मागे वकिलांची फौज उभी करू, असे मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील व हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव पुनाळेकर यांनी गुरुवारी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड व शाम मानव यांच्यावर टीका करताना, ते आपली पापे लपविण्यासाठी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करीत असल्याचाही आरोप अ‍ॅड. पुनाळेकर यांनी केला. सनातन संस्था आणि हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीने या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. कॉ. पानसरे हत्याप्रकरणी अटकेतील सनातन साधक, संशयित समीर गायकवाड याच्या बाजूने अ‍ॅड. संजीव पुनाळेकर, अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी वकीलपत्र घेतल्याने या पत्रकार परिषदेस विशेष महत्त्व होते.अ‍ॅड. पुनाळेकर म्हणाले, माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ हे कोल्हापुरात बुद्धिभेद करीत आहेत; त्यामुळे ते सनातन संस्थेच्या मागे लागल्यास आम्हीही गप्प बसणार नाही. त्यांच्यावरही दहशतवादाचा गुन्हा नोंदवून त्यांना धडा शिकविणार आहोत, असेही ते म्हणाले. पानसरे हत्याप्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक होता. त्यामुळे त्याला निव्वळ संशयावरून कारवाई करून त्याचा नाहक बळी दिला जात आहे. याशिवाय रुद्रगौडा पाटील हाही सनातन संस्थेचा अर्धवेळ साधक होता; पण २०११ पासून न्यायालयाने त्याला मडगाव बॉम्बस्फोटामध्ये ‘फरार’ घोषित केल्यापासून तो आमच्या संपर्कात नाही; पण या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे. तसेच दुसरा संशयित प्रवीण लिमकर हाही संपर्कात नाही. त्या दोघांचा संपर्क झाल्यास त्यांना न्यायालयापुढे हजर राहण्याचा मी निश्चितच सल्ला देईन, असेही अ‍ॅड. पुनाळेकर यांनी सांगितले. शमशुद्दीन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना, ते धार्मिक दहशतवाद पसरवीत असल्याने त्यांची जागा तुरुंगातच आहे. ते जर ‘सनातन’च्या मागे लागले तर आम्ही गप्प बसणार नाही; तसेच त्यांच्यावर दहशतवादाचा गुन्हा लवकरच नोंदविणार असल्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला. मुश्रीफ पोलीस सेवेत असताना त्यांनी केलेल्या कामांची चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली....तर हेमंत करकरेंना जन्मठेपमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दिवंगत पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा दृश्य हात होता, असा आरोप करून ते म्हणाले, करकरे यांनी एका संशयिताला अटक न करताच त्याला खासगी विमानाने तपासासाठी फिरविले. त्याची ब्रेन मॅपिंग तपासणी केली. त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. जर आज करकरे जिवंत असते तर ते जन्मठेपेच्या कारवाईस पात्र होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनीही सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले, श्याम मानव यांच्या संस्थेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन कोटी रुपये दिले आहेत. त्या पैशांवर ते देशभर दौरे करीत आहेत; तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांची सर्वांत जास्त बदनामी त्यांनीच केल्याने त्यांना दिलेले पैसे मुख्यमंत्र्यांनी परत घ्यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रवरा प्रकल्पासाठी शासनाकडून दोन हजार कोटी रुपये उचलले होते, पण या प्रकल्पाचा दुष्काळग्रस्तांसाठी काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे या रकमेत शासनाची फसगत झाली आहे म्हणून शासनाने ही रक्कम वसूल करून दुष्काळग्रस्तांसाठी निधी म्हणून द्यावी, अशीही मागणी यावेळी अ‍ॅड. पुनाळेकर यांनी यावेळी केली.सनातन संस्थेची नाहक बदनामी केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती अ‍ॅड. पुनाळेकर यांनी दिली. (प्रतिनिधी) जितेंद्र आव्हाड यांनी ‘आदर्श’ इतिहास तपासावाराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड हे ‘सनातन’वर टीकेची झोड उठवत असल्याबाबत अ‍ॅड. पुनाळेकर म्हणाले, आव्हाड हे वारंवार ‘सनातन’वर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. ‘सनातन’ची त्यांना अनेक प्रकरणे आठवत असतील तर मुंबईत ‘आदर्श’ सोसायटीप्रकरणी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांना आपल्या ‘फ्लॅट’चा उल्लेख करण्यास का विसर पडला? याबाबतचा त्यांचा ढोंगीपणा आपण बाहेर काढू, असेही ते म्हणाले.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाराष्ट्रात अनेक घोटाळे केलेत. त्यांनी शासनाचे दोन कोटी रुपये बुडविले असून, त्यापासून बहुजनांचे लक्ष विचलित करण्यासाठी सनातन संस्थेवर वारंवार बंदी घालण्याची मागणी ते करीत असल्याचाही आरोप अ‍ॅड. पुनाळेकर यांनी केला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, गणेशमूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण, मूर्तीसमोर पशुबळी या विषयांवरही चर्चा केली. या पत्रकार परिषदेस अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, डॉ. मानसिंग शिंदे, राजन बुनगे हे उपस्थित होते.