शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धुवाधार!--पावसाचा जोर वाढला :

By admin | Updated: July 23, 2014 00:44 IST

राधानगरी ६९ टक्के भरले, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापूर : गेले दोन दिवस पावसाचा काहीसा ओसरलेला जोर आज, मंगळवारी पुन्हा वाढला. सकाळपासून जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर असल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. राधानगरी ६९, तर वारणा धरण ५७ टक्के भरले आहे. दूधगंगेच्या पाणीपातळीही वाढ झालेली आहे. सकाळपासून जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, चंदगड, शाहूवाडी तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू असून, नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेले दोन दिवस पाऊस कमी असल्याने नद्यांची पातळी कमी झाली होती, पण पावसाने जोर पकडल्याने त्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. धरणक्षेत्रात सरासरी ७५ मिलिमीटर पाऊस झाल्याने पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरण ६९ टक्के, वारणा ५७, तर काळम्मावाडी ४२ टक्के भरले आहे. त्याचबरोबर इतर धरणांची पातळीही वाढलेली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३१.९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. चंदगड व राधानगरी तालुक्यांत ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पंचगंगेची पातळी काल, सोमवारी सायंकाळी कमी झाली होती; पण आज ती ३३.४ फुटांवर आली. अद्याप २८ बंधारे पाण्याखाली असून १५ मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. ( प्रतिनिधी)‘राधानगरी’तून वीजनिर्मितीसाठी पाणी सोडलराधानगरी : राधानगरी परिसरात आज, मंगळवार सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. धरणक्षेत्रांत पाऊस सुरू असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरणक्षेत्रात आज सकाळी १०९ मिलिमीटर व एकूण १८३८ मिलिमीटर पाऊस झाला. येथील मोहिते कंपनीच्या वीजनिर्मिती प्रकल्पातून काल, सोमवारी सकाळपासून वीजनिर्मिती सुरू करण्यात आली. यासाठी दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता धरणाची पाणीपातळी ३३२.५५ फूट झाली असून, पाणीसाठा ५.८१ टीएमसी इतका आहे. दाजीपूर येथे घेण्यात येणाऱ्या नोंदीनुसार आज ७८.०६ मिलिमीटर व एकूण २१८१.०८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तुळशी धरणक्षेत्रात आज ५३ व एकूण ११५९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात १.८०० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. (प्रतिनिधी)वारणा नदी पात्राबाहेरसांगली : जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ वगळता जिल्ह्याच्या उर्वरित भागात आज, मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे वारणेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिराळा तालुक्यातील अंत्री बुद्रुक येथे दुमजली इमारतीची भिंत कोसळली. तालुक्यातील नदीकाठाचे काही रस्ते व पूलही बंद झाले आहेत. सांगली व मिरज शहरात पाणी साचून राहिले आहे.