शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

‘आरएसएस’ची विचारधारा देशासाठी घातक

By admin | Updated: February 6, 2016 00:39 IST

अमरिंदरसिंग राजा ब्रार : नथुराम गोडसेचे मंदिर होऊ देणार नाही, युवक काँँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा

कोल्हापूर : भाजपचे सरकार ‘आरएसएस’ची विचारधारा देशातील जनतेवर लादण्याचे काम करीत आहे. ती लागू झाल्यास देशाचे तुकडे होऊन जातीय दंगली होतील, अशी चिंता अखिल भारतीय युवक कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अमरींदर सिंग राजा ब्रार यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. याला रोखण्यासाठी युवक कॉँग्रेसने सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉल येथे युवक कॉँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, प्रदेश प्रभारी हिंमतसिंग, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, राहुल वर्धा, धृवी लकडे, सत्यजित देशमुख, राहुल आवाडे, जिल्हाध्यक्ष शंभुराजे देसाई, जयराज पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.ब्रार म्हणाले, कॉँग्रेसने काही काम केले नाही, असा डांगोरा पिटत भाजप सत्तेवर आले; परंतु त्यांनी सत्तेवर आल्यानंतर दीड वर्षात कुणासाठीच काही केले नाही. सध्या भाजप सरकारविरोधी वातावरण आहे; त्यामुळे साडेतीन वर्षांनंतर पुन्हा पूर्ण बहुमताने कॉँग्रेसचे सरकार येईल. देशात सध्याचे सरकार ‘आरएसएस’ची विचारधारा लादण्याचे काम करीत आहे. ही विचारधारा देशाचे तुकडे करणारी आहे. त्यामुळे तिच्या विरोधासाठी युवक कॉँग्रेसला सज्ज राहावे लागेल. या सरकारच्या माध्यमातून नथुराम गोडसे याचे मंदिर बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो प्रयत्न युवक कॉँग्रेसच्या माध्यमातून हाणून पाडूया.ते पुढे म्हणाले, सोनिया गांधींसह त्यांच्या संपूर्ण परिवारावर खटला चालवून त्यांना संपविण्याचे षड्यंत्र या सरकारकडून सुरू आहे; कारण त्यांना संपविले की पूर्ण पक्षच संपेल व ‘आरएसएस’ची विचारधारा लादता येऊ शकेल, असे त्यांना वाटते. विश्वजित कदम म्हणाले, भाजप सरकारने देशभर कॉँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर सुडाचे राजकारण सुरू ठेवले आहे. त्यांना जनता कदापिही माफ करणार नाही. हे सरकार चुकून आपल्यातीलच काही लोकांनी निवडून दिले आहे. या सरकारने दिलेली कोणतीही वचने पाळलेली नाहीत.आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजप व मित्रपक्षांच्या सरकारमध्ये सुसंवाद नाही. त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चित्र बदलणार आहे. यासाठी पुढील काळात युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संघर्षाची भूमिका ठेवली पाहिजे. सरकारविरोधात भ्रष्टाचार, गैरकारभार यांसह अनेक मुद्दे आहेत. ही संधी समजून कार्यकर्त्यांनी आंदोलने करावीत.पी. एन. पाटील म्हणाले, ब्रिटिशांची सत्ता उलथवून लावतेवेळी भाजपचा जन्मही झाला नव्हता. यावेळी कॉँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तुरुंगवास भोगला. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी साखर उद्योगात क्रांती केली. अन्नसुरक्षेसारखी योजना बंद करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनाच फक्त ‘अच्छे दिन’ आले आहेत. प्रकाश आवाडे म्हणाले, जिल्हा परिषद व नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये येणाऱ्या विधानसभेची रंगीत तालीम असे समजूनच ताकदीने उतरावे. यावेळी ऋतुराज पाटील, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, सरला पाटील, अमर देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) हे सरकार सुटबूटवाल्यांचेभाजप सरकार हे गरीब व शेतकऱ्यांचे नसून ते सुटबूटवाल्या श्रीमंतांचे आहे. त्यांच्याकडून लोकहिताचे कोणतेही निर्णय आतापर्यंत झालेले नाहीत. उलट कॉँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या या सरकारच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात अनेक घोटाळे झाले असून, त्यामध्ये मंत्री अडकले आहेत, असा आरोप अमरींदरसिंग राजा ब्रार यांनी केला.इमानदारीने काम करा, न्याय मिळेलस्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. हसत-हसत फाशीचा दोर कवटाळला; परंतु आता तेवढे करण्याची गरज नाही. जनतेच्या प्रश्नांवर इमानदारीने लढा. तुम्हाला योग्य न्याय मिळेल. मनात पाप ठेवल्यास काहीच साध्य होणार नाही, असे आवाहन ब्रार यांनी युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले.