शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

‘स्वयंवरा’चा शाही सोहळा

By admin | Updated: January 29, 2015 23:42 IST

राज्य नाट्य स्पर्धा : ‘राधाकृष्ण’चे सादरीकरण--राज्य नाट्य स्पर्धा

सं. स्वयंवर हे महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सादर झालेले दहावे नाटक. कै. कृष्णाजी खाडीलकर यांच्या लेखणीतून साकार झालेले हे नाटक रत्नागिरीच्या राधाकृष्ण कला मंचने सादर केले.नाथ हा माझा, सुजन कसा मन चोरी, रुपबली तो जा, भय न मम मना, यदुमनी सदना, मम मनी कृष्णसखा रमला, गुरु सुरस गोकुळी, नृपकन्या तव जाया, कांता मजसी तुची, रमणी मजसी नीजधाम अशा अवीट गोडीची गायनाला कठीण असलेली पदे या नाटकात आहेत. या गाण्याचे वेगवेगळे ताल व राग समजून घेऊन ती नाट्य संगीताच्या बाजात सादर करणे हे शिवधनुष्यच मानले जाते. या नाटकातील नाट्यपदे सादर करुन हे नाटक सादर करायला कोणीही धजावत नाही. परंतु रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचने शिवधनुष्य पेलले.प्रेरणा दामले (रुक्मिणी) यांनी गायनाबरोबरच अभिनयातही आपला ठसा उमटवला. नाटकातील गायकी अंगाची जवळजवळ १२ ते १३ गाणी सादर करुन प्रमुख भूमिका साकारण्यासाठी मोठे धैर्य लागते. शिवाय पौराणिक कथेतील भूमिका साकारताना देहबोलीवर विशिष्ट प्रकारचे नियंत्रण असावे लागते. या सर्वांचे भान ठेवून प्रेरणा दामले यांनी दर्जेदार रुक्मिणी साकारली.अनुप बापट (श्रीकृष्ण) यांनी संगीत नाटकात स्वयंवर या नाटकाद्वारे पदार्पण केल्याचे समजले. तरीही त्यांनी श्रीकृष्ण चांगला साकार केला. गायनावर विशेष मेहनत घेतल्याचे जाणवले. सुंदर मुखललना, कांता मजसी तूची, गुरु सुरस गोकुळी, सुधा दही दुधी यांसारखी पदे जी मोठ्या गायकांनी आधीच प्रसिद्ध करुन ठेवली आहेत ती पदे चांगली पेलली.संगीत दिग्दर्शक विलास हर्षे यांनी नाटकाला सुंदर संगीत दिग्दर्शन केले. नाट्यसंगीताचा डौल, बाज कायम ठेवून, स्वत:ची प्रतिभासुद्धा दाखवून दिली. उदय गोखले (व्हायोलिन), मिलिंद टिकेकर (तबला), मंदार जोशी (बासरी), विलास हर्षे (आॅर्गन) यांनी परस्पर समन्वयाने समर्पक अशी साथसंगत केली.नेपथ्य, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा यावरही विशेष लक्ष दिले गेले. रुक्मिणीचे कोकीळेशी हितगूज, रुक्मिणीचे गाणे ऐकून जमा झालेल्या गायी, मंदार जोशींची घुमलेली बासरी खरंच लाजवाब.नाटकाची मूळ संहिता वाचल्यानंतर असे लक्षात येते की, सगळे नाटक सादर करण्यासाठी जवळजवळ पाच ते साडेपाच तास लागतात. परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता मूळ संहितेतील काही पदे, कथानकाचा काही भाग वगळण्यात आला. समीधा मुकादम (स्नेहलता), पूर्वा खालगावकर (महाराणी), किरण जोशी (शिशुपाल), विनित घाणेकर (रुक्मी), अभय मुळ्ये (भीष्म) व सहकालाकारांनी आपापली कामगिरी सुंदर पार पाडली. प्रत्येक कलाकाराने वैयक्तिक कामगिरी चांगली पार पाडल्यामुळे सांघिक परिणाम मिळाला. प्रेरणा दामले (रुक्मिणी) व अनुप बापट (कृष्ण यांना प्रत्येकी एकवेळा तांत्रिक अडथळा व रंगभूषेतील अडथळा आला. पण, तरीही त्यांनी प्रसंगावधान राखून वेळ मारुन नेण्याचे मोठे धैर्य दाखवले. एकंदरीत राधाकृष्ण कला मंचाच्या कलाकारांनी स्वयंवराचा सोहळा दिमाखात सादर केला.संध्या सुर्वे