शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

संगणक परिचालकांचा दामासाठी रणसंग्राम

By admin | Updated: November 22, 2014 00:18 IST

संगणक परिचालकांची नियुक्ती ही महाआॅनलाईनकडून आणि काम ग्रामपंचायतीकडे त्यामुळे त्यांची ‘ना घर का....’ अशी अवस्था

प्रकाश चोथे - गडहिंग्लज--खेड्यापाड्यातल्या ग्रामपंचायती ‘आॅनलाईन’ आणण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसणारा ‘संगणक परिचालक’ मात्र दुर्लक्षिला गेला. त्यांची चिंता ना महा आॅनलाईनला आहे, ना शासनाला... म्हणूनच त्यांच्यावर आज बेमुदत बंद करीत लक्ष वेधण्याची वेळ आली आहे. संगणक परिचालकांची नियुक्ती ही महाआॅनलाईनकडून आणि काम ग्रामपंचायतीकडे त्यामुळे त्यांची ‘ना घर का....’ अशी अवस्था झाली आहे. राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत विकसित विविध दहापेक्षा अधिक सॉफ्टवेअरमध्ये आॅपरेटरना काम करावे लागते. जन्म-मृत्यू नोंद, मिळकत नोंदणी, कर मागणी-वसुली, आदींसह ग्रामपंचायतीच्या १ ते २७ नमुन्यांच्या नोंदींचा लेखाजोखा आॅपरेटरला मांडावा लागतो. रहिवासी, हयातीचा, विवाहाचा, चारित्र्याचा, आदींसह विविध १९ प्रकारचे दाखले आणि प्रमाणपत्रे ग्रामस्थांना याच आॅपरेटरच्या माध्यमातून संग्राम कक्षात मिळतात.संग्राम कक्षाची स्थापना झाल्यापासून जणू आॅपरेटर हा ग्रामपंचायतीच्या पत्रव्यवहारासाठी ‘लिपिक’ झाला आहे. सर्व प्रकारचा पत्रव्यवहार हा याच लिपिकाच्या माध्यमातून होत आहे. शिवाय कांही ‘अ‍ॅक्टिव्ह’ सदस्यांच्या वैयक्तिक कामकाजातही हाच लिपिक नाइलाजाने मदत करीत असतो. सर्वच ग्रामपंचायतीकडील आॅपरेटरना एकसारखेच काम असूनही त्यांच्या शिक्षणानुसार मानधन देण्याची महाआॅनलाईनची नेमकी भूमिका काय? हा प्रश्नही गुलदस्त्यात आहे. ग्रामपंचायतीकडून दरमहा ८००० रुपये घेणारी महाआॅनलाईन १२वी पर्यंत शिक्षण झालेल्यांना ३५००, तर पदवीधरांना ३८०० मानधन देते. शासन निणर्यातील ओळखपत्र आणि गणवेश यांची कुठल्याच आॅपरेटरला अद्याप ओळख नाही. मुळातच संगणक परिचालकांच्या भवितव्याबाबत २६ एप्रिल २०११ च्या शासन निर्णयातच प्रश्नचिन्ह निर्माण होते. कारण महाआॅनलाईनची भूमिका ठरवितानाच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना पुरविणाऱ्या मनुष्यबळाची सर्वतोपरी जबाबदारी फक्त महाआॅनलाईनकडेच आहे आणि हे मनुष्यबळ जास्तीत जास्त पाच वर्षांसाठी पुरविण्याची अट त्यांना आहे. त्यामुळे संगणक परिचालकांचे पुढे काय? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.नवनिर्वाचित मंत्रिमंडळातील तरुण आणि धडाडीच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकारात लक्ष घालून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. त्यामुळे राज्यातील सुमारे २७०००० संगणक परिचालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; पण शासनासोबत राहून केवळ स्वत:चे पोट भरणाऱ्या भांडवलदार कंपन्यांच्या बाबतीत परिघाबाहेर जाऊन विचार करण्याचा आणि पोटासाठी राबणाऱ्या सामान्य संगणक परिचालकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न होणार का, हा खरा प्रश्न आहे.