शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘मल्टिस्टेट’ची भूमिका पालकमंत्र्यांनी कडेपर्यंत न्यावी :हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 14:50 IST

‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटबाबत सध्या आपणाला काही बोलायचे नाही; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली भूमिका त्यांनी कडेपर्यंत न्यावी, असा उपरोधिक टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला. स्वबळाची तयारी म्हणूनच भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अनेकांना जवळ केले, आता ते मागे हटण्याची शक्यता नसल्याने युती होवो अथवा न होवो विधानसभेला तिरंगीच लढत होईल, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे‘मल्टिस्टेट’ची भूमिका पालकमंत्र्यांनी कडेपर्यंत न्यावी :हसन मुश्रीफ युती होवो अथवा न होवो विधानसभेला तिरंगीच लढत

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटबाबत सध्या आपणाला काही बोलायचे नाही; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली भूमिका त्यांनी कडेपर्यंत न्यावी, असा उपरोधिक टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला. स्वबळाची तयारी म्हणूनच भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अनेकांना जवळ केले, आता ते मागे हटण्याची शक्यता नसल्याने युती होवो अथवा न होवो विधानसभेला तिरंगीच लढत होईल, असेही त्यांनी सांगितले.जिल्हा बॅँकेच्या ताळेबंदाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर अनौपचारिक गप्पा मारताना मुश्रीफ यांनी सावध भूमिका व्यक्त केली. कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी आघाडीच्या दोन्ही जागा निवडून येणार हे निश्चित आहे.

गेल्यावेळेलाही शिवसेनेच्या उमेदवाराला कागलमध्ये मताधिक्य मिळालेच होते, असे सांगत हसन मुश्रीफ म्हणाले, लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे दुपारी तीननंतर मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. कोल्हापुरात तर तीन नंतर २५ टक्के मतदान झाले, हे कशाचे द्योतक आहे? एक सुप्त लाट जाणवत होती, ती नेमकी सरकारच्या कारभाराच्या विरोधात होती का? हे २३ मे रोजी समजेल.लोकसभेचा निकाल लागायच्या अगोदरच युतीमध्ये फटकेबाजी सुरू असल्याबाबत विचारले असता, मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायची म्हणून भाजपने प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांना घेतले, त्यांना पदे देऊन ताकद दिल्याने ते गुडघ्याला बाशिंग बांधूनच उभे आहेत; त्यामुळे युती झाली अथवा नाही झाली, तरी तिरंगी लढत होणारच आहे.अरूंधती महाडिक यांचे कौतुकलोकसभा निवडणुकीत ‘भागीरथी’ संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक या कमालीच्या राबल्या. एक खासदाराची पत्नी आपल्या पतीसाठी किती परिश्रम घेते, हे चांगले उदाहरण असून, त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

‘त्यांना’ विधानसभेला विचारतीलसाखर उद्योगाबाबत आपणच फार चिंता करता, शिवसेना-भाजपचे कारखानदार बोलत नाहीत, यावर मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आणि साखर कारखानदारीतील कार्यकर्ता म्हणून ही भूमिका मांडत असतो. शिवसेना-भाजपच्या कारखानदारांचा प्रश्न आहे; पण एफआरपी न दिल्यास त्यांना विधानसभेला शेतकरी निश्चितच विचारतील. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkokrajhar-pcकोकराझार