शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

जयंत पाटील यांची भूमिका ठरली महत्त्वाची

By admin | Updated: November 14, 2015 01:16 IST

स्वीकृतसाठी दरवाजे खुले : महापालिकेच्या घडामोडींबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा

कोल्हापूर : महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष टोकाला जाऊ नये आणि त्यातून काही वेगळे चित्र निर्माण होऊन राजकीय पक्षांची बदनामी होऊ नये म्हणून नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी बुधवारी (दि. ११) रात्री उशिरा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत भाजपचाच महापौर करण्याच्या आग्रहापासून पालकमंत्री पाटील यांना दूर करण्यात त्यांना यश आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान यामुळे प्रा. जयंत पाटील यांचा स्वीकृत नगरसेवक होण्याचा मार्ग मोकळा झाला. बुधवारी रात्री दहा ते साडेअकरा वाजता या वेळेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरी जाऊन नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी महापौर निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. चर्चेत प्रा. पाटील यांनी बऱ्याच विस्ताराने खुलासेही केले. घोडेबाजार केला तर भाजप व राष्ट्रवादीची बदनामी होईल; ते पुढची काही वर्षे डोकेदुखी ठरेल. तुम्ही राष्ट्रवादीतील कांही सदस्यांना फोडायचा प्रयत्न केल्यास ताराराणी आघाडीतही अंतर्गत नाराजी आहे असेही त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. भाजप-ताराराणी आघाडीसोबत असलेली काही माणसे ही राष्ट्रवादीला विश्वासार्ह वाटत नाहीत. म्हणूनच राष्ट्रवादीचा त्यांच्याबाबत आक्षेप आहे. भाजप आणि व्यक्तिगत पातळीवरही अशा प्रकारचे राजकारण करणारा नेता अशी तुमची प्रतिमा नाही. त्यामुळे ताराराणीतील एक-दोन कारभाऱ्यांच्या आग्रहाला बळी पडून कांही वेगळे घडविण्याच्या फंदात पडू नका. त्यात तुम्ही फसले जाण्याची अधिक शक्यता आहे. म्हणूनच कोणत्याही हालचाली न करता संयम राखावा, अशी भूमिका प्रा.पाटील यांनी चर्चेवेळी मांडली. पालकमंत्र्यांसोबत प्रा. पाटील बोलणी करण्यास जातात याचा अर्थ या सगळ्या घटनांना आमदार हसन मुश्रीफ यांची संमती असण्याची शक्यता आहे. कदाचित कॉँग्रेस-भाजपला विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुखवायचे नसेल असे या चर्चेवरून दिसते. मात्र, दोन पाटलांमधील या चर्चेनंतर भाजपने महापौर करण्याचा आग्रह सोडून देत फक्त निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी) असेही राजकारण.. दादांनी आपण विरोधी पक्षांत बसणार अशी जाहीर भूमिका न घेता तसे वृत्तपत्रांना फक्त निवेदन पाठवून द्यावे, असा आग्रह ताराराणी आघाडीतील काही म्होरक्यांचा होता. परंतु दादा त्यास तयार झाले नाहीत. पत्रकार परिषद घेण्यावर ते ठाम राहिले. मग पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांच्यामुळे हे झाले, असे दादांनी सांगू नये, असेही सूचित करण्यात आल्याचे समजते.