शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आवाडे गटाची ‘अकेला चलो’ भूमिका

By admin | Updated: April 20, 2016 00:31 IST

कॉँग्रेसी तत्त्वावरच ‘अपक्ष’ अस्तित्व : कोणत्याही पक्षाची कुबडी किंवा पाठिंबा घेणार नाहीत ?

इचलकरंजी : शहर व परिसरातील राजकीय परिस्थिती आणि पार्श्वभूमी लक्षात घेऊन कोणत्याही पक्षाची कुबडी किंवा पाठिंबा न घेता सध्या तरी ‘अकेला चलो रे’ अशीच भूमिका आवाडे गटाची असल्याचा बोलबाला आहे. शनिवारच्या कॉँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात कितीही दबाव येवो, पण कॉँग्रेस सोडली तरी ‘अपक्ष’ राहून कॉँग्रेसी तत्त्वेच जोपासावयाची, अशी भूमिका राहण्याची अपेक्षा आहे.साधारणत: १९५६-५७ पासून कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा सार्वजनिक जीवनातील राजकारणात प्रवेश झाला असला तरी त्यांचे गुरू माजी खासदार दत्ताजीराव कदम पक्के कॉँग्रेसशी एकनिष्ठ. त्यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, बेंदूर समितीचे नेतृत्व, नगरसेवक, नगराध्यक्ष, इचलकरंजी जनता सहकारी बॅँकेचे संस्थापक अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, खासदार अशी अनेक पदे आवाडेंनी भूषविली. पण त्या सर्वांना कॉँग्रेस पक्षाचेच माध्यम होते. तत्कालीन स्थानिक नेतेमंडळी बाबासाहेब खंजिरे, अनंतराव भिडे, बापूसाहेब मोरे, मल्हारपंत बावचकर, सदाशिवराव मुरदंडे यांच्या संगतीत आवाडे मोठे झाले तरी हे सर्व कॉँग्रेसवालेच होते.त्याच्यानंतर १९८५-८६ मध्ये प्रकाश आवाडे आमदार झाले, तेही कॉँग्रेसमधूनच. पुढे प्रकाश आवाडे कॉँग्रेसच्याच मंत्रिमंडळात मंत्री होते. तर त्यांच्या सुविद्य पत्नी किशोरी आवाडे यासुद्धा कॉँग्रेसच्याच उमेदवारीवर २००० ते २००७ अशी साडेसात वर्षे नगराध्यक्ष होत्या. तर त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांनी एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष ही दोन्ही पदे त्यांनी चार-चार वर्षे भोगली. तीन सूतगिरण्या, एक साखर कारखाना, टेक्स्टाईल पार्क, आदी सहकारी संस्थाही कॉँग्रेसच्याच माध्यमातून आवाडेंनी उभ्या केल्या. त्यामुळे आवाडेंच्या तीन पिढ्या कॉँग्रेसमध्ये राहिल्या आणि वाढल्या. परिणामी अन्य पक्षात प्रवेश करण्याची सूतरामही शक्यता नसल्याचे कॉँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)वेगळा ठसा असूनही डावलल्याची खंतगेल्या साठ वर्षांत आवाडेंचा सार्वजनिक क्षेत्रात असलेला वावर, राजकीय दबदबा, सहकार क्षेत्रात त्यांनी साधलेली प्रगती यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा वेगळा ठसा आहे. आवाडे पिता-पुत्र दोघेही मंत्री राहिले असल्याने त्यावेळी त्यांचा जिल्हाभर वावर राहिला. तत्कालीन विकासकामांची वेगळी ओळख असताना अलीकडील काळात मात्र जिल्ह्याच्या राजकारणातून पश्चिमेकडील मंडळींनी त्यांना बाजूला काढले, याचीच खंत आवाडे समर्थकांत आहे