शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

आवाडे गटाची ‘अकेला चलो’ भूमिका

By admin | Updated: April 20, 2016 00:31 IST

कॉँग्रेसी तत्त्वावरच ‘अपक्ष’ अस्तित्व : कोणत्याही पक्षाची कुबडी किंवा पाठिंबा घेणार नाहीत ?

इचलकरंजी : शहर व परिसरातील राजकीय परिस्थिती आणि पार्श्वभूमी लक्षात घेऊन कोणत्याही पक्षाची कुबडी किंवा पाठिंबा न घेता सध्या तरी ‘अकेला चलो रे’ अशीच भूमिका आवाडे गटाची असल्याचा बोलबाला आहे. शनिवारच्या कॉँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात कितीही दबाव येवो, पण कॉँग्रेस सोडली तरी ‘अपक्ष’ राहून कॉँग्रेसी तत्त्वेच जोपासावयाची, अशी भूमिका राहण्याची अपेक्षा आहे.साधारणत: १९५६-५७ पासून कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा सार्वजनिक जीवनातील राजकारणात प्रवेश झाला असला तरी त्यांचे गुरू माजी खासदार दत्ताजीराव कदम पक्के कॉँग्रेसशी एकनिष्ठ. त्यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, बेंदूर समितीचे नेतृत्व, नगरसेवक, नगराध्यक्ष, इचलकरंजी जनता सहकारी बॅँकेचे संस्थापक अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, खासदार अशी अनेक पदे आवाडेंनी भूषविली. पण त्या सर्वांना कॉँग्रेस पक्षाचेच माध्यम होते. तत्कालीन स्थानिक नेतेमंडळी बाबासाहेब खंजिरे, अनंतराव भिडे, बापूसाहेब मोरे, मल्हारपंत बावचकर, सदाशिवराव मुरदंडे यांच्या संगतीत आवाडे मोठे झाले तरी हे सर्व कॉँग्रेसवालेच होते.त्याच्यानंतर १९८५-८६ मध्ये प्रकाश आवाडे आमदार झाले, तेही कॉँग्रेसमधूनच. पुढे प्रकाश आवाडे कॉँग्रेसच्याच मंत्रिमंडळात मंत्री होते. तर त्यांच्या सुविद्य पत्नी किशोरी आवाडे यासुद्धा कॉँग्रेसच्याच उमेदवारीवर २००० ते २००७ अशी साडेसात वर्षे नगराध्यक्ष होत्या. तर त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांनी एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष ही दोन्ही पदे त्यांनी चार-चार वर्षे भोगली. तीन सूतगिरण्या, एक साखर कारखाना, टेक्स्टाईल पार्क, आदी सहकारी संस्थाही कॉँग्रेसच्याच माध्यमातून आवाडेंनी उभ्या केल्या. त्यामुळे आवाडेंच्या तीन पिढ्या कॉँग्रेसमध्ये राहिल्या आणि वाढल्या. परिणामी अन्य पक्षात प्रवेश करण्याची सूतरामही शक्यता नसल्याचे कॉँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)वेगळा ठसा असूनही डावलल्याची खंतगेल्या साठ वर्षांत आवाडेंचा सार्वजनिक क्षेत्रात असलेला वावर, राजकीय दबदबा, सहकार क्षेत्रात त्यांनी साधलेली प्रगती यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा वेगळा ठसा आहे. आवाडे पिता-पुत्र दोघेही मंत्री राहिले असल्याने त्यावेळी त्यांचा जिल्हाभर वावर राहिला. तत्कालीन विकासकामांची वेगळी ओळख असताना अलीकडील काळात मात्र जिल्ह्याच्या राजकारणातून पश्चिमेकडील मंडळींनी त्यांना बाजूला काढले, याचीच खंत आवाडे समर्थकांत आहे