शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र दुरुस्तीचे काम पूर्ण, आजपासून वीज सुरळीत

By admin | Updated: April 30, 2017 01:14 IST

युद्धपातळीवर काम; महापारेषण, महावितरणचा समन्वय

कोल्हापूर : महापारेषण कंपनीच्या तळंदगे येथील ४०० के.व्ही. उपकेंद्रातील ५०० एम.व्ही.ए. क्षमतेचे अतिउच्चदाबाचे रोहित्र नादुरुस्त झाल्याने त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागाला बसला; पण महापारेषणने युद्धपातळीवर काम करून शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे दुरुस्तीचे काम पूर्ण केले. नियोजबद्धरीत्या भारनियमनाचे प्रकरण हाताळल्याने ग्राहकांनाही फारसा त्रास झाला नाही. आज, रविवारी पहाटेनंतर या दुरुस्त केलेल्या रोहित्रावर हळूहळू भार वाढवून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.महापारेषण कंपनीच्या तळंदगे (ता. हातकणंगले) येथील ४०० के.व्ही. अतिउच्चदाब उपकेंद्रातून जिल्ह्णाला वीजपुरवठा असून सध्या विजेची मागणी ११०० मेगावॅट आहे. त्यानुसार तळंदगे उपकेंद्रात ५०० एमव्हीए क्षमतेचा एक व ३१५ एमव्हीए क्षमतेचे दोन असे एकूण ११३० एमव्हीए क्षमतेची तीन अत्युच्च दाबाची रोहित्रे आहेत; पण बुधवारी (दि. ३६) ५०० एमव्हीए क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रात अचानक बिघाड झाला. हे रोहित्र बदलण्याचे काम अवघड व जोखमीचे असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किमान आठ दिवस लागणार होते.पण महापारेषणने महावितरणच्या मदतीने हे काम तीन दिवसांत शनिवारी रात्री उशिरा पूर्ण झाले. त्याची रात्रीपासून पहाटेपर्यंत चाचणीही घेतली. घटनास्थळी महापारेषणचे संचालक (संचालन) ओमप्रकाश एम्पाल, मुख्य अभियंता सुरेशकुमार पाटील, अधीक्षक अभियंता एस. एस. कुंभार, कार्यकारी अभियंता ए. सी. ढमाले, कार्यकारी अभियंता आर. एम. देव, ‘महावितरण’चे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे, थांबून कार्यरत होते. वीज देणे बंदहे रोहित्र दुरुस्ती होईपर्यंत जिल्ह्णातील विविध विभागांतील भारनियमन विभागून वीजपुरवठा करण्यात आला. विजेची मागणी मोठी असल्याने या कालावधीत गोवा, कर्नाटक राज्यांना देण्यात येणारी वीज बंद करून ती कोल्हापूरला वळवली होती.जिल्ह्णात विजेची मागणी असल्यामुळे परराज्यांत दिली जाणारी वीज जिल्ह्णात वळविली होती. त्यातून भारनियमन कमी करण्यात यश आले आहे. शनिवारी रात्री उशिरा काम पूर्ण झाले असून आज, रविवार दुपारपासून या बदलेल्या रोहित्रामधून पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्यात येईल. - ए. सी. ढमाले, कार्यकारी अभियंता, महापारेषण कंपनीशेतीसाठी भारनियमनगेले चार दिवस हे रोहित्र बदलण्याचे जोखमीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यासाठी जिल्ह्णातील शेती पंपांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता दोन तास भारनियमन केले. ती वेळ पुढे वाढवून दिली. तसेच काही प्रमाणात गावठाणातही भारनियमन करावे लागले होते. ही परिस्थिती अगोदरच जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्राहक सावध झाले होते. त्यामुळे त्याचा फटका बसला नाही.