शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
3
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
4
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
5
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
6
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
7
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
8
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
9
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
10
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
11
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
12
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
13
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
14
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
15
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
16
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
17
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
18
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
19
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
20
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र दुरुस्तीचे काम पूर्ण, आजपासून वीज सुरळीत

By admin | Updated: April 30, 2017 01:14 IST

युद्धपातळीवर काम; महापारेषण, महावितरणचा समन्वय

कोल्हापूर : महापारेषण कंपनीच्या तळंदगे येथील ४०० के.व्ही. उपकेंद्रातील ५०० एम.व्ही.ए. क्षमतेचे अतिउच्चदाबाचे रोहित्र नादुरुस्त झाल्याने त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागाला बसला; पण महापारेषणने युद्धपातळीवर काम करून शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे दुरुस्तीचे काम पूर्ण केले. नियोजबद्धरीत्या भारनियमनाचे प्रकरण हाताळल्याने ग्राहकांनाही फारसा त्रास झाला नाही. आज, रविवारी पहाटेनंतर या दुरुस्त केलेल्या रोहित्रावर हळूहळू भार वाढवून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.महापारेषण कंपनीच्या तळंदगे (ता. हातकणंगले) येथील ४०० के.व्ही. अतिउच्चदाब उपकेंद्रातून जिल्ह्णाला वीजपुरवठा असून सध्या विजेची मागणी ११०० मेगावॅट आहे. त्यानुसार तळंदगे उपकेंद्रात ५०० एमव्हीए क्षमतेचा एक व ३१५ एमव्हीए क्षमतेचे दोन असे एकूण ११३० एमव्हीए क्षमतेची तीन अत्युच्च दाबाची रोहित्रे आहेत; पण बुधवारी (दि. ३६) ५०० एमव्हीए क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रात अचानक बिघाड झाला. हे रोहित्र बदलण्याचे काम अवघड व जोखमीचे असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किमान आठ दिवस लागणार होते.पण महापारेषणने महावितरणच्या मदतीने हे काम तीन दिवसांत शनिवारी रात्री उशिरा पूर्ण झाले. त्याची रात्रीपासून पहाटेपर्यंत चाचणीही घेतली. घटनास्थळी महापारेषणचे संचालक (संचालन) ओमप्रकाश एम्पाल, मुख्य अभियंता सुरेशकुमार पाटील, अधीक्षक अभियंता एस. एस. कुंभार, कार्यकारी अभियंता ए. सी. ढमाले, कार्यकारी अभियंता आर. एम. देव, ‘महावितरण’चे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे, थांबून कार्यरत होते. वीज देणे बंदहे रोहित्र दुरुस्ती होईपर्यंत जिल्ह्णातील विविध विभागांतील भारनियमन विभागून वीजपुरवठा करण्यात आला. विजेची मागणी मोठी असल्याने या कालावधीत गोवा, कर्नाटक राज्यांना देण्यात येणारी वीज बंद करून ती कोल्हापूरला वळवली होती.जिल्ह्णात विजेची मागणी असल्यामुळे परराज्यांत दिली जाणारी वीज जिल्ह्णात वळविली होती. त्यातून भारनियमन कमी करण्यात यश आले आहे. शनिवारी रात्री उशिरा काम पूर्ण झाले असून आज, रविवार दुपारपासून या बदलेल्या रोहित्रामधून पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्यात येईल. - ए. सी. ढमाले, कार्यकारी अभियंता, महापारेषण कंपनीशेतीसाठी भारनियमनगेले चार दिवस हे रोहित्र बदलण्याचे जोखमीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यासाठी जिल्ह्णातील शेती पंपांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता दोन तास भारनियमन केले. ती वेळ पुढे वाढवून दिली. तसेच काही प्रमाणात गावठाणातही भारनियमन करावे लागले होते. ही परिस्थिती अगोदरच जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्राहक सावध झाले होते. त्यामुळे त्याचा फटका बसला नाही.