शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

रोहित्र दुरुस्तीचे काम पूर्ण, आजपासून वीज सुरळीत

By admin | Updated: April 30, 2017 01:14 IST

युद्धपातळीवर काम; महापारेषण, महावितरणचा समन्वय

कोल्हापूर : महापारेषण कंपनीच्या तळंदगे येथील ४०० के.व्ही. उपकेंद्रातील ५०० एम.व्ही.ए. क्षमतेचे अतिउच्चदाबाचे रोहित्र नादुरुस्त झाल्याने त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागाला बसला; पण महापारेषणने युद्धपातळीवर काम करून शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे दुरुस्तीचे काम पूर्ण केले. नियोजबद्धरीत्या भारनियमनाचे प्रकरण हाताळल्याने ग्राहकांनाही फारसा त्रास झाला नाही. आज, रविवारी पहाटेनंतर या दुरुस्त केलेल्या रोहित्रावर हळूहळू भार वाढवून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.महापारेषण कंपनीच्या तळंदगे (ता. हातकणंगले) येथील ४०० के.व्ही. अतिउच्चदाब उपकेंद्रातून जिल्ह्णाला वीजपुरवठा असून सध्या विजेची मागणी ११०० मेगावॅट आहे. त्यानुसार तळंदगे उपकेंद्रात ५०० एमव्हीए क्षमतेचा एक व ३१५ एमव्हीए क्षमतेचे दोन असे एकूण ११३० एमव्हीए क्षमतेची तीन अत्युच्च दाबाची रोहित्रे आहेत; पण बुधवारी (दि. ३६) ५०० एमव्हीए क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रात अचानक बिघाड झाला. हे रोहित्र बदलण्याचे काम अवघड व जोखमीचे असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किमान आठ दिवस लागणार होते.पण महापारेषणने महावितरणच्या मदतीने हे काम तीन दिवसांत शनिवारी रात्री उशिरा पूर्ण झाले. त्याची रात्रीपासून पहाटेपर्यंत चाचणीही घेतली. घटनास्थळी महापारेषणचे संचालक (संचालन) ओमप्रकाश एम्पाल, मुख्य अभियंता सुरेशकुमार पाटील, अधीक्षक अभियंता एस. एस. कुंभार, कार्यकारी अभियंता ए. सी. ढमाले, कार्यकारी अभियंता आर. एम. देव, ‘महावितरण’चे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे, थांबून कार्यरत होते. वीज देणे बंदहे रोहित्र दुरुस्ती होईपर्यंत जिल्ह्णातील विविध विभागांतील भारनियमन विभागून वीजपुरवठा करण्यात आला. विजेची मागणी मोठी असल्याने या कालावधीत गोवा, कर्नाटक राज्यांना देण्यात येणारी वीज बंद करून ती कोल्हापूरला वळवली होती.जिल्ह्णात विजेची मागणी असल्यामुळे परराज्यांत दिली जाणारी वीज जिल्ह्णात वळविली होती. त्यातून भारनियमन कमी करण्यात यश आले आहे. शनिवारी रात्री उशिरा काम पूर्ण झाले असून आज, रविवार दुपारपासून या बदलेल्या रोहित्रामधून पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्यात येईल. - ए. सी. ढमाले, कार्यकारी अभियंता, महापारेषण कंपनीशेतीसाठी भारनियमनगेले चार दिवस हे रोहित्र बदलण्याचे जोखमीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यासाठी जिल्ह्णातील शेती पंपांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता दोन तास भारनियमन केले. ती वेळ पुढे वाढवून दिली. तसेच काही प्रमाणात गावठाणातही भारनियमन करावे लागले होते. ही परिस्थिती अगोदरच जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्राहक सावध झाले होते. त्यामुळे त्याचा फटका बसला नाही.