शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

रस्ते बनले मृत्यूचे सापळे

By admin | Updated: July 29, 2016 23:29 IST

सातेरी-महादेव परिसर : संरक्षण कठड्यांची अवस्था बिकट

शिवराज लोंढे -- सावरवाडी --ऐतिहासिक वारसा जपलेल्या सातेरी-महादेव (ता. करवीर) पश्चिम पर्यटनक्षेत्रातील रस्त्यांची सध्या अवस्था दयनीय बनली आहे. नागमोडी वळणाचे रस्ते मृत्यूचे सापळे बनू लागले आहेत.करवीर तालुक्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर टाकणाऱ्या सातेरी-महादेव डोंगरी भागातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. राज्य शासनाने पर्यटन केंद्र म्हणून दर्जा दिलेल्या या परिसरात सध्या वाहतूक वाढत आहे. सातेरी-महादेव ही दोन प्राचीन मंदिरे आहेत. या डोंगरी भागात तीन बाजूंनी नागमोडी वळणाचे रस्ते आहेत. शासकीय निधीअभावी व पावसाचे प्रमाण जादा असल्यामुळे रस्ते खराब होत असतात. दऱ्या-खोऱ्यातून जाणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा असणारे संरक्षण कठडे कोसळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. घाटातील रस्त्यांचे गेल्या २0 वर्षांपासून रुंदीकरणाचे काम झालेले नाही. दुहेरी वाहतुकीची सोय नाही. रस्त्याचे रुंदीकरण झाले नसल्यामुळे, घाटातून जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना वाहने चालवावी लागतात. रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे दगड असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते.करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील घाटमाथ्यावरील या डोंगरी भागात सध्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दर सोमवारी महादेव मंदिराशेजारी मोफत अन्नदान केंद्र उभारले आहे. हजारो भाविकांची वाहनांसह याठिकाणी गर्दी होते. भक्तनिवासस्थानाजवळ वाहनांना थांबण्यासाठी अपुरी जागा आहे. नागमोडी वळणावरील रस्त्यावर मोरीचे बांधकाम रखडले आहे. पावसामुळे रस्ते खराब होऊ लागल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. धोंडेवाडी गावनजीक जाणाऱ्या घाटातील रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. दऱ्या-खोऱ्यातून हा रस्ता सातेरी-महादेव मंदिराकडे जातो. या स्थळावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे.ट्रक, एसटी वाहतूक कठीण बनली आहे. गेल्या वीस वर्षांपासून घाटातील रस्त्याचे रुंदीकरण केलेले नाही. डोंगरी भागातील मुख्य वाहतुकीचे रस्ते दुरुस्त करणे, घाटातील मुख्य रस्त्यांचे त्वरीत रुंदीकरण करणे, मुख्य वळणावर दिशादर्शक फलक लावणे, वळणावर गतीरोधकांची उभारणी करणे ही काळाची गरज आहे. यासाठी शासकीय निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून दळणवळणाचा प्रश्न निकालात काढणे गरजेचे आहे.सातेरी-महादेव डोंगरी भागातील घाटातील रस्त्यांचे नव्याने रुं दीकरण करणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या संरक्षण कठड्याच्या बांधकामाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने निधी मंजूर करावा.-मुकुंद पाटील, राष्ट्रीय समाज पक्ष, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षघाटमाथ्यातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम त्वरीत सुरु करणे गरजेचे आहे. डोंगरी भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नव्या लढ्याची आवश्यकता आहे. शासकीय जादा निधीसाठी जनआंदोलन छेडू.- वैशाली नलवडे, ग्रा.पं. सदस्य. भारतीय महिला फेडरेशन, सदस्य.