शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कामे सुरू होणार

By admin | Updated: November 18, 2014 23:32 IST

नगरोत्थान योजना : डिसेंबरअखेर कामे पूर्ण होणार, गळती काढण्याचे काम अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : खराब रस्त्यांतून शहरवासीयांची सुटका होण्याची वेळ आली आहे. ठेकेदारांनी चुकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. उद्या, बुधवारपासून १५० हून अधिक लहान-मोठे रस्ते व नगरोत्थान योजनेतील रखडलेल्या कामांची सुरुवात केली जाणार आहे. रस्त्यावरील गळती काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरअखेर सर्व रस्ते चकचकीत करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी ‘लोकमत’ला दिली.नगरोत्थान योजनेतील ३९ किलोमीटरचे रस्ते व इतर शासकीय अनुदानातून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे काम वेळेत व दर्जेदार न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक रकमेसह कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे. मुदतीत काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर पाच ते दहा हजार रुपये दरदिवशी दंड ठोठावण्यात येणार असल्याने सर्व्हे, गळती काढणे, टेस्ट रिपोर्ट, आदी तांत्रिक बाबींची पूर्तता अंतिम टप्प्यात आहे. अनेक ठेकेदारांनी खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.शहरातील ३८.५० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते करण्यासाठी १०८ कोटींच्या निधीची तरतूद करूनही ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने रेंगाळलेला हा प्रकल्प २५ नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार आहे. कामात अडथळा आणणाऱ्या नगरसेवकांवर थेट फौजदारी दाखल करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्याने रस्त्यांचे काम वेळेत व दर्जेदार होईल, अशी नागरिकांना आशा आहे. (प्रतिनिधी)कामाचा दिखावा नकोराज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून दिलेल्या निकषांप्रमाणेच रस्ते झाले पाहिजेत, असा दंडक आहे. मात्र, शहरात महापालिकेने करूनही वेळेअगोदर खराब झालेल्या मोठ्या रस्त्यांची संख्या फक्त आठ आहे. उर्वरित खराब असलेले रस्ते ‘सार्वजनिक’नेच केले आहेत. कोणत्याही प्रकारचा डांबरी रस्ता किमान पाच वर्षे टिकलाच पाहिजे, असा दंडक आहे. रस्त्यांच्या डागडुजीची जबाबदारी पहिली दोन वर्षे ठेकेदाराची असते. खडीचे अयोग्य प्रमाण, रोलिंग व डांबराचा अभाव, रस्त्याची असमान पातळी यांमुळे शहरातील रस्त्यांना एका पावसातच घरघर लागली. डांबर-खडीची पावडर-लाली लावून रस्ता केल्याचा दिखावा के ला जात आहे. ‘निव्वळ पैसे कमावण्यासाठी रस्ते’, ही संस्कृती वाढल्यानेच ‘या रस्त्यांखाली दडलंय काय?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती बदलण्याची नागरिकांनीच सजगता दाखवीत तक्रारीसाठी वृत्तपत्रे तसेच महापालिका यांच्याकडे जाण्याची गरज आहे.खराब रस्त्यांसाठी ठेकेदार व अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. सर्व कनिष्ठ व उपअभियंत्यांद्वारे रस्त्याच्या कामांवर लक्ष ठेवून दर दोन दिवसांनी अहवाल घेण्यात येणार आहे. अडथळा आणणाऱ्यांवर थेट फौजदारीची तयारी प्रशासनाने केली आहे. कामाच्या दर्जाबाबत काही शंका असल्यास नागरिकांनी तत्काळ महापालिका प्रशासनाची संपर्क साधावा.- नेत्रदीप सरनोबत(शहर अभियंता)कोट्यवधींचा निधी खड्ड्यात नकोडांबरी रस्त्यावर दोन थर अंथरून कारपेट पद्धतीने केलेला रस्ता किमान पाच वर्षे व कमाल सात वर्षे तरी टिकला पाहिजे, असा दंडक आहे. मात्र, ठेकेदारांनी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या संगनमताने चालुगिरी केल्याने कोट्यवधींचा निधी खड्ड्यांत जात आहे. आता पुन्हा रस्त्यांसाठी मोठा निधी खर्च केला जाणार आहे. निधी खड्ड्यात घालू नका, अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.४सेनापती बापट रोड ते वास्कर बंगला, मार्केट यार्ड चौक ते जाधववाडी-कदमवाडी-भोसलेवाडी चौक, शेतकरी पंप ते लोणार वसाहत, मध्यवर्ती इमारत ते लाईन बझार-भगवा चौक, रेणुका मंदिर ते राजर्षी शाहू जन्मस्थळ, राजारामपुरी मुख्य रस्ता, मध्यवर्ती बसस्थानक-परिख पूल या रस्त्याचे काम नगरोत्थान योजनेंर्तगत सुरू करण्यात आले आहे.हे रस्ते होणार चकाचकजावळाचा गणपती ते रंकाळा स्टँडसर्किट हाऊस ते ड्रेनेज प्लँटवाय. पी. पोवारनगरराजारामपुरी मेन रोडस्टेशन रोडजरगनगरसेनापती बापट रस्ता,विद्यापीठ रोडकदमवाडी ते भोसलेवाडी चौकरेणुका मंदिर ते शाहू जन्मस्थळसाई मंदिर ते फुलेवाडी नाकारिंग रोडटिंबर मार्केट ते राजक पूर पुतळायल्लम्मा मंदिर ते जवाहरनगर कोल्हापुरात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी मंगळवारी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता एम. एम. निर्मळे, एन. एस. पाटील, सुरेश पाटील यांच्यासह ठेकेदार उपस्थित होते.