शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रस्ते हस्तांतर अधांतरीच

By admin | Updated: June 28, 2017 00:37 IST

ठराव अद्याप महापौरांकडेच : उलटसुलट चर्चेला जोर

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘दोन कोटींचा आंबा’ पाडल्याचा आरोप तसेच सभागृहात झालेला तीव्र विरोध यामुळे पदरी बदनामी पडलेल्या रस्ते हस्तांतरण ठरावावर महापौर हसिना फरास यांनी सही केली नसल्याने हा विषय अधांतरीच लटकला आहे. सभेचा इतिवृत्तांत तयार झाल्यानंतर प्रक्रियेनुसार रस्ते हस्तांतराचा ठराव नगरसचिव कार्यालयाकडून महापौरांकडे पाठविण्यात आला; परंतु महापौरांनी त्यावर सही केली नसल्याने पुन्हा एकदा उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा २० जूनला झाली. या सभेत वादग्रस्त रस्ते हस्तांतराचा ठराव भाजप-ताराराणी आघाडीचा तीव्र विरोध मोडून काढत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. असा ठराव सभागृहात येण्यापूर्वीपासून काही ‘कारभारी नगरसेवकां’नी मद्य विके्रते, हॉटेल व्यावसायिकांकडून दोन कोटींची सुपारी घेतल्यची चर्चा सुरू होती. त्यामुळे महापालिका वर्तुळाचे डोळे विस्फारले होते. ही चर्चा सुरू असताना पुरवणी अजेंड्यावर उपमहापौर अर्जुन फरास व काँग्रेस गटनेते शारंधर देशमुख यांनी रस्ते हस्तांतरणाचा सदस्य ठराव ठेवला होता. त्यामुळे यावर कोणता निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. हा ठराव मंजूर करून घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा कर्णोपकर्णी सुरू होती. तर २० जूनच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक सुनील कदम यांनी ठराव मंजूर करून देण्यासाठी दोन कोटींची सुपारी फुटल्याचा जाहीर आरोप केला, तर तो मंजूर करू नये म्हणून भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहात ‘गोंधळी’चे रूप धारण करत जोरदार विरोध केला होता. तरीही बहुमताच्या जोरावर सत्तारूढ काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने तो मंजूर करून घेतला. या ठराव मंजूर झाल्यामुळे नगरसेवकांची बदनामी अधिक झाली. सभा झाल्यानंतर प्रक्रियेनुसार मंजूर झालेला ठराव नगरसचिव कार्यालयाकडून महापौर फरास यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. ज्या तडफेने हा ठराव मंजूर करून घेतला त्याच तडफेने तो महापौर फरास सही करून पुढील प्रक्रियेसाठी प्रशासनाकडे पाठवतील, अशी शक्यता होती; पण महापौरांनी त्यावर सहीच केलेली नाही. ठरावावर त्या लवकर सही करतील असे दिसत नाही. बदनामी झाल्याची महापौरांची भावनारस्ते हस्तांतराच्या ठरावानंतर महापौर फरास व्यथित झाल्या आहेत. कारण या ठरावामुळे आपली बदनामी झाल्याची त्यांची भावना झाली आहे. मुळात २० जूनला सभा ही उपमहापौर अर्जुन माने यांना देण्यात येणार होती, परंतु सभागृहात होणारा संभाव्य गोंधळ लक्षात घेऊन फरास यांनीच अध्यक्षस्थानी बसावे, असा निर्णय झाला. ठरावावर सही न करण्यास केवळ बदनामीचे कारण आहे की अन्य कोणते कारण आहे याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.