शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते हस्तांतर, पुढाकार घ्यायचा कोणी?

By admin | Updated: April 10, 2017 23:57 IST

मनपा महासभेत प्रस्ताव येण्याची शक्यता नाही : प्रशासनास राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील सर्वप्रकारची दारूची दुकाने बंद झाल्यामुळे कोल्हापूर महापालिका हद्दीतील रस्ते राज्य सरकारने मनपा प्रशासनाकडे हस्तांतर करण्याचा पर्याय पुढे आला असला तरी या कामाला सुरुवात कोणी करायची आणि कोणत्या मुद्द्यांवर करायची, असा प्रश्न तयार झाला आहे. मनपा प्रशासन राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहे. त्यामुळे १९ एप्रिलला होणाऱ्या महासभेत तसा प्रस्ताव येण्याची शक्यता दिसत नाही. न्यायालयाच्या दणक्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील बहुतांशी दारूची दुकाने बंद झाली आहेत. या निर्णयाबाबत समाजातून विशेषत: महिलावर्गातून स्वागत होत आहे. तथापि ‘लिकर लॉबी’ मात्र कमालीची अस्वस्थ झाली आहे. दररोज कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली असून अनेकांचे रोजगारही गेले आहेत. त्यातून मार्ग काढण्याकरिता पळवाट शोधण्यात आली आहे. नगरपालिका व महानगरपालिका हद्दीतून जाणारे राज्य व राष्ट्रीय महामार्गच सरकारने हस्तांतर करावेत, असा पर्याय पुढे आला आहे. राज्य सरकारही त्यादृष्टीने अनुकुल आहे. कोल्हापूर शहरातून चार राज्यमार्ग व एक राष्ट्रीय महामार्ग जातो. भविष्यात हे रस्ते हस्तांतर करायचे झालेच तर त्यात कोणी पुढाकार घ्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा राज्य सरकारकडून काय प्रस्ताव येतोय, याची प्रतीक्षा मनपा प्रशासन करत आहे. जर मनपा प्रशासनाने पुढाकार घेतला तर फायदा कमी आणि बदनामीच अधिक होणार आहे तसेच कोणत्या मुद्द्यावर रस्ते ताब्यात घेण्याचा प्रस्ताव द्यायचा, असा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे. आजच्या घडीला हे रस्ते ताब्यात घेण्यामुळे महापालिकेचा फायदाही नाही आणि तोटाही नाही. मग आपणच का घाई करायची, अशा विचारात प्रशासन आहे. ‘लिकर लॉबी’ने महानगरपालिका व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन दिल्यानंतर रस्त्यांची मालकी, रस्त्यांची हद्द, सध्याची परिस्थिती याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम नगररचना तसेच शहर अभियंता कार्यालयाने सुरू केले आहे. रस्त्यांचे नकाशेही त्यांनी उपलब्ध केले आहेत. चार राज्यमार्ग व एक राष्ट्रीय महामार्ग सध्या मनपाच्या ताब्यात असून या मार्गाची देखभाल दुरुस्ती, पथदिवे, पावसाच्या पाण्याचा निचरा असा सर्व खर्च गेल्या अनेक वर्षांपासून मनपा प्रशासनच करत आहे. त्यामुळे हे रस्ते ताब्यात घेतल्यानंतरही तो करावा लागणार आहे. त्याचा कुठलाही अतिरिक्त भार पडणार नाही. (प्रतिनिधी) मोठा महसूल बुडतोयसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महिलावर्गात चांगली प्रतिक्रिया असली तरी राज्यातील हजारो दारूच्या दुकानांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मिळणारा सात ते आठ हजार कोटींचा महसूल बुडणार आहे, म्हणून सरकारमधीलच काहीजण यातून मार्ग काढत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नगरपालिका व महानगरपालिका यांना रस्ते ताब्यात घेण्याबाबत पत्र पाठविले जाणार असून, त्याचा मसुदाही तयार झाला असल्याचे समजते. अशा प्रकारचे पत्र लवकरच पाठविले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने आपणहून काही करायचे नाही, अशी भूमिका घेतली आहे.