शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

आठवडाभरात रस्त्यांवर पडणार डांबर

By admin | Updated: November 6, 2014 00:39 IST

नगरोत्थानची कामे पुन्हा सुरू : अधिकारी-नगरसेवक व ठेकेदारांंनी कामाचा घेतला आढावा

कोल्हापूर : नगरोत्थान योजनेतील ३९ किलोमीटरचे रस्ते व इतर शासकीय अनुदानातून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे काम ठरलेल्या वेळेत सुरू करण्याचा निर्णय आज, बुधवारी महापालिकेत झालेल्या प्रतिनिधी व अधिकारी व ठेकेदारांच्या बैठकीत झाला. तसेच वेळेत व दर्जेदार काम न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक रकमेसह कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण होते. मुदतीत काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर पाच ते दहा हजार रुपये दरदिवशी दंड ठोठाविला जाणार आहे.शहरातील ३८.५० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते करण्यासाठी १०८ कोटींच्या निधीची तरतूद करूनही ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने रेंगाळलेला हा प्रकल्प आता पुन्हा सुरू होणार आहे. रखडलेल्या रस्त्यांसाठी चौथ्यांदा काढलेल्या निविदेला ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. लवकरच रस्त्यांचे काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.साडेतीन वर्षांपूर्वी नगरोत्थान योजनेचा निधी महापालिकेकडे वर्ग होऊनही प्रशासनातील ढिलाईमुळे योजनाच रखडली. त्यानंतर मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे करण्यात ठेकेदारांनी असमर्थता दर्शविली. निविदा काढूनही ठेकेदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने योजनेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता चौथ्या निविदेला प्रतिसाद दिल्याने पुन्हा रस्त्यांचे काम सुरू होणार आहे. कोणते काम कधी सुरू करायचे तसेच रस्त्यांच्या कामाच्या विलंबासाठी प्रतिदिन दहा हजार तर इतर रस्त्यांसाठी पाच हजार दंड ठोठावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. (प्रतिनिधी)१० ते १५ नोव्हेंबरपर्यंत या रस्त्यांचे काम सुरूजावळाचा गणपती ते रंकाळा स्टँडसर्किट हाऊस ते ड्रेनेज प्लँटवाय. पी. पोवार नगरराजारामपुरी मेनरोडस्टेशन रोडजरगनगरसेनापती बापट रस्ता विद्यापीठ रोडकदमवाडी ते भोसलेवाडी चौकरेणुका मंदिर ते राजर्षी शाहू जन्मस्थळसाई मंदिर ते फुलेवाडी नाकाफुलेवाडी रिंगरोड टिंबर मार्केट ते राजक पूर पुतळा, वाशी नाकायल्लमा मंदिर ते जवाहर नगर ‘लोकमत’चा दणकाशहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण झाली आहे. हाडे खिळखिळी करणाऱ्या शहरातील रस्त्यांची सद्य:स्थिती ‘लोकमत’ने ठळकपणे मांडली. गेली दहा दिवस शहरातील रस्त्यांबाबत वस्तुस्थिती सचित्रपणे लोकमत मांडत आहे. त्यामध्ये नागरिकांची भूमिका व त्यांना रस्त्याचा होणारा त्रास याचे विवेचनही केले. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने आज तातडीची बैठक घेत येत्या दहा दिवसांत सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा फतवा काढला आहे.