शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचं दुखणं शेतकºयांच्या ‘वाटेवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:05 IST

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथील बायपास मार्गावर रखडलेल्या पुलाच्या अर्धवट कामामुळे महामार्गाचं दुखणं शेतकºयांच्या वाटेवर आलं असून, कोणी रस्ता देता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्गाचे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलिनीकरण केल्यानंतर उर्वरित रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे उदगाव कुरण रस्त्याचा प्रश्न समोर ...

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथील बायपास मार्गावर रखडलेल्या पुलाच्या अर्धवट कामामुळे महामार्गाचं दुखणं शेतकºयांच्या वाटेवर आलं असून, कोणी रस्ता देता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्गाचे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलिनीकरण केल्यानंतर उर्वरित रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे उदगाव कुरण रस्त्याचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे कुरण शेतीकडील शेतकºयांचे डोळे महामार्गाच्या कामाकडे लागले आहेत.कोल्हापूर-सांगली महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये बायपास मार्गावर उदगाव येथील टोल नाक्याजवळून महामार्गाच्या कामात या ओढ्यावर नवीन सर्व्हेनुसार पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यामुळे कुरण रस्ता तब्बल १५ फूट खोल जागेत गेला आहे. यावर शेतकºयांनी आंदोलन केल्यावर सुप्रीम कंपनीच्या अधिकाºयांनी महामार्ग ते आडवा जोड रस्त्यापर्यंत ४०० फूट अंतरावर भराव टाकून नवीन रस्ता करून देणार असल्याचे सांगितले होते. यावर या शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले होते.सांगली-कोल्हापूर महामार्गावर टोलचे भूत आल्यावर, तसेच सुप्रीमच्या कामावरून व नागरिकांच्या मागणीनुसार सरकारने सांगली-कोल्हापूर महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलीन केला. तमदलगे ते उदगाव टोल नाक्यापर्यंत राहिलेल्या अर्धवट कामामुळे शेतीच्या रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या कुरण रस्त्यालगत अर्धवट बांधकाम झालेल्या पुलामुळे शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर टोलनाक्यावरून सरळ कुरण मार्गाकडे येताना दोन्ही मार्ग अर्धवट बांधकाम झालेल्या पुलाजवळ येतात. अरुंद रस्त्यामुळे या परिसरात वारंवार अपघातही होत आहेत.कुरण शेत परिसरातील शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे सर्व बाजूने शेतकºयांनाच त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे बायपास मार्ग अपूर्णच ठेवा; पण आमचा रस्ता आम्हाला सुरळीत द्या, अन्यथा शेतकरी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.