शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

महामार्गाचं दुखणं शेतकºयांच्या ‘वाटेवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:05 IST

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथील बायपास मार्गावर रखडलेल्या पुलाच्या अर्धवट कामामुळे महामार्गाचं दुखणं शेतकºयांच्या वाटेवर आलं असून, कोणी रस्ता देता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्गाचे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलिनीकरण केल्यानंतर उर्वरित रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे उदगाव कुरण रस्त्याचा प्रश्न समोर ...

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथील बायपास मार्गावर रखडलेल्या पुलाच्या अर्धवट कामामुळे महामार्गाचं दुखणं शेतकºयांच्या वाटेवर आलं असून, कोणी रस्ता देता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्गाचे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलिनीकरण केल्यानंतर उर्वरित रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे उदगाव कुरण रस्त्याचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे कुरण शेतीकडील शेतकºयांचे डोळे महामार्गाच्या कामाकडे लागले आहेत.कोल्हापूर-सांगली महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये बायपास मार्गावर उदगाव येथील टोल नाक्याजवळून महामार्गाच्या कामात या ओढ्यावर नवीन सर्व्हेनुसार पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यामुळे कुरण रस्ता तब्बल १५ फूट खोल जागेत गेला आहे. यावर शेतकºयांनी आंदोलन केल्यावर सुप्रीम कंपनीच्या अधिकाºयांनी महामार्ग ते आडवा जोड रस्त्यापर्यंत ४०० फूट अंतरावर भराव टाकून नवीन रस्ता करून देणार असल्याचे सांगितले होते. यावर या शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले होते.सांगली-कोल्हापूर महामार्गावर टोलचे भूत आल्यावर, तसेच सुप्रीमच्या कामावरून व नागरिकांच्या मागणीनुसार सरकारने सांगली-कोल्हापूर महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलीन केला. तमदलगे ते उदगाव टोल नाक्यापर्यंत राहिलेल्या अर्धवट कामामुळे शेतीच्या रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या कुरण रस्त्यालगत अर्धवट बांधकाम झालेल्या पुलामुळे शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर टोलनाक्यावरून सरळ कुरण मार्गाकडे येताना दोन्ही मार्ग अर्धवट बांधकाम झालेल्या पुलाजवळ येतात. अरुंद रस्त्यामुळे या परिसरात वारंवार अपघातही होत आहेत.कुरण शेत परिसरातील शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे सर्व बाजूने शेतकºयांनाच त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे बायपास मार्ग अपूर्णच ठेवा; पण आमचा रस्ता आम्हाला सुरळीत द्या, अन्यथा शेतकरी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.