शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

ऊसतोडणी, वाहतूक कामगारांचा मंत्रालयावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 20:28 IST

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाने व साखर आयुक्तांनी दुर्लक्ष केले आहे. त्याबाबत महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने दि. १९ सप्टेंबरला मुंबई मंत्रालयावर हजारो ऊस तोडणी व वाहतूक कामगारांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्'ातील कामगारही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती ...

ठळक मुद्दे भाजप-सेना सरकारनेही फसवणूक केल्याचा आरोपनवीन त्रिपक्षीय सामंजस्य करार करा,

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाने व साखर आयुक्तांनी दुर्लक्ष केले आहे. त्याबाबत महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने दि. १९ सप्टेंबरला मुंबई मंत्रालयावर हजारो ऊस तोडणी व वाहतूक कामगारांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्'ातील कामगारही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. जाधव म्हणाले, ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या मागण्यांबाबतचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री, कामगार मंत्री, साखर आयुक्त व साखर संघास आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आले होते; पण त्याबाबत कोणताही निर्णय दिला नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारप्रमाणेच भाजप-सेना आघाडीच्या सरकारने राज्यातील ऊसतोडणी कामगार, बैलगाडीवान, मुकादम, ऊस वाहतूकदार यांची उपेक्षा चालूच ठेवली आहे. उलट ऊस तोडणी व वाहतुकीचे दर ठरविण्याबाबत सध्याच्या सरकारने या कामगारांची घोर फसवणूक केली आहे. शासनाने मजुरीवाढीच्या लादलेल्या २० टक्के एकतर्फी कराराला राज्यातील १० लाख ऊसतोडणी व वाहतूक कामगारांनी विरोध केला. सध्याच्या सरकारने कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी न करता फसवणूक केली. ऊस तोडणी व वाहतूक कामगारांना माथाडी बोर्डात समाविष्ट केल्याचे परिपत्रक सरकारने काढले; पण त्याची अंमलबजावणी केलेली नाही. याचा जाब विचारण्यासाठी व त्रिपक्षीय कराराचा कालावधी २०१४ ते आॅक्टोबर २०१७ संपला असल्याने नवीन त्रिपक्षीय सामंजस्य करार करा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे डॉ. जाधव म्हणाले.अशा आहेत मागण्या...- ऊस तोडणीच्या दरात ४० टक्के वाढ करून तो प्रतिटन २७८ रुपये करावा- ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्केवाढ करावी- मुकादमाचे कमिशन २० टक्केकरावे- ऊसतोडणी व वाहतूक कामगार मुकादम यांची माथाडी बोर्डात तातडीने नोंदणी सुरू करून त्यांना ओळखपत्र द्या.- या कामगारांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचा अपघात विमा, बैलजोडीचा एक लाख रुपयांचा आणि मजुरांसाठी ५० हजार रुपयांची औषध उपचाराची तरतूद असलेली विमा योजना लागू करा.- राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांसाठी माथाडी बोर्डाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने पुरेशी आर्थिक तरतूद व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावे.