शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

ऊसतोडणी, वाहतूक कामगारांचा मंत्रालयावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 20:28 IST

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाने व साखर आयुक्तांनी दुर्लक्ष केले आहे. त्याबाबत महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने दि. १९ सप्टेंबरला मुंबई मंत्रालयावर हजारो ऊस तोडणी व वाहतूक कामगारांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्'ातील कामगारही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती ...

ठळक मुद्दे भाजप-सेना सरकारनेही फसवणूक केल्याचा आरोपनवीन त्रिपक्षीय सामंजस्य करार करा,

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाने व साखर आयुक्तांनी दुर्लक्ष केले आहे. त्याबाबत महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने दि. १९ सप्टेंबरला मुंबई मंत्रालयावर हजारो ऊस तोडणी व वाहतूक कामगारांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्'ातील कामगारही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. जाधव म्हणाले, ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या मागण्यांबाबतचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री, कामगार मंत्री, साखर आयुक्त व साखर संघास आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आले होते; पण त्याबाबत कोणताही निर्णय दिला नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारप्रमाणेच भाजप-सेना आघाडीच्या सरकारने राज्यातील ऊसतोडणी कामगार, बैलगाडीवान, मुकादम, ऊस वाहतूकदार यांची उपेक्षा चालूच ठेवली आहे. उलट ऊस तोडणी व वाहतुकीचे दर ठरविण्याबाबत सध्याच्या सरकारने या कामगारांची घोर फसवणूक केली आहे. शासनाने मजुरीवाढीच्या लादलेल्या २० टक्के एकतर्फी कराराला राज्यातील १० लाख ऊसतोडणी व वाहतूक कामगारांनी विरोध केला. सध्याच्या सरकारने कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी न करता फसवणूक केली. ऊस तोडणी व वाहतूक कामगारांना माथाडी बोर्डात समाविष्ट केल्याचे परिपत्रक सरकारने काढले; पण त्याची अंमलबजावणी केलेली नाही. याचा जाब विचारण्यासाठी व त्रिपक्षीय कराराचा कालावधी २०१४ ते आॅक्टोबर २०१७ संपला असल्याने नवीन त्रिपक्षीय सामंजस्य करार करा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे डॉ. जाधव म्हणाले.अशा आहेत मागण्या...- ऊस तोडणीच्या दरात ४० टक्के वाढ करून तो प्रतिटन २७८ रुपये करावा- ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्केवाढ करावी- मुकादमाचे कमिशन २० टक्केकरावे- ऊसतोडणी व वाहतूक कामगार मुकादम यांची माथाडी बोर्डात तातडीने नोंदणी सुरू करून त्यांना ओळखपत्र द्या.- या कामगारांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचा अपघात विमा, बैलजोडीचा एक लाख रुपयांचा आणि मजुरांसाठी ५० हजार रुपयांची औषध उपचाराची तरतूद असलेली विमा योजना लागू करा.- राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांसाठी माथाडी बोर्डाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने पुरेशी आर्थिक तरतूद व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावे.