शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

कंत्राटदारांमार्फतच रस्त्यांची देखभाल

By admin | Updated: May 8, 2017 00:57 IST

कंत्राटदारांमार्फतच रस्त्यांची देखभाल

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अपुरे मनुष्यबळ, नवीन भरतीवर असलेल्या निर्बंधांमुळे रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती कंत्राटदारांमार्फतच करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. ‘वार्षिक देखभाल करार’या अंतर्गत ही कामे करून घेतली जाणार असून लवकरच या कामाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. पावसाळ्यापासून राज्यभर या पद्धतीने देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. त्यामध्ये बहुतांशी रस्त्यांवर वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते. शक्यतो हे सर्व रस्ते जिल्ह्यांना आणि तालुक्यांना जोडणारे असल्याने त्याची देखभाल आणि दुरुस्ती ही सातत्यपूर्ण करणे आवश्यक असते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्यांची देखभाल करणे आणि दुरुस्ती करणे यावर कमालीच्या मर्यादा येत आहेत. खड्डे पडल्यानंतर मग बांधकाम विभागाची प्रक्रिया सुरू होणार. मग ते खड्डे भरले जाणार. त्यामध्ये विलंब होऊ लागला. अशातच निवृत्तीनंतर त्या जागा पुन्हा नवीन भरती करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नियमित देखभालीसाठीही विभागाकडे माणसे नाहीत. त्यामुळे मग रस्त्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती होत नाही. परिणामी या रस्त्यांकडे कुणाचेच लक्ष नाही, अशी परिस्थिती दिसते. त्यावर उपाय म्हणून आता ‘वार्षिक देखभाल करार’संकल्पना पुढे आली आहे. लवकरच या कामाच्या निविदा निघणार आहेत. काय आहे संकल्पना?जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची तालुकावर विभागणी करून त्या-त्या रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांचा निविदा काढण्यात येतील. इच्छुक आणि पात्र कंत्राटदारांना निविदेनुसार रस्ता मंजूर करण्यात येईल. त्या रस्त्यावरील तेवढ्या अंतरावरील रस्त्याची दोन वर्षे देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी त्या कंत्राटदारावर राहील. सातत्याने त्या कंत्राटदाराचे त्याला मंजूर रस्त्यावर लक्ष राहणार असल्याने ही देखभाल नीट होईल, अशी अपेक्षा या संकल्पनेमागे आहे. ही कामे केली जातीलखड्डे भरणे, बाजूपट्ट्यांची दुरुस्ती, गवत काढणे, झाडांच्या वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फांद्या काढणे, गटार काढणे, रस्त्यावर येणाऱ्या पाण्याची निर्गत करणे, पुलाचे तुटलेले रेलिंग बसवणे, कडेची सरकारी झाडे रंगवणे, वाहतुकीच्या नियमनासाठी आवश्यक असे फलक उभारणे ही सर्व कामे या कंत्राटदाराला करावी लागतील. कामे होतील त्या पद्धतीने तो बिले विभागाकडे सादर करेल व कामाची खातरजमा करून बिले अदा केली जातील. ४८ तासांत खड्डा भरणारया संकल्पनेच्या माध्यमातून रस्त्यावर खड्डा पडल्यानंतर तो ४८ तासांत भरला जाईल. त्यामुळे खड्डे मोठे होऊन त्याचा वाहतुकीला त्रास होणार नाही, अशी अपेक्षा अधिकारी व्यक्त करत आहेत. दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार असल्याने रस्ते नेहमी नीटनेटके राहतील आणि नागरिकांसाठी सोयीचे ठरतील, असाही विश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत.