शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
3
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
4
Team India ODI Schedule 2026 : रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
5
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
6
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
7
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
8
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
9
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
10
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
11
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
12
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
13
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
14
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
15
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
16
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
17
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
18
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
19
१३ दागिन्यांची दुकाने, ६ रेस्टॉरंट्स आणि ४ सुपरमार्केटचा मालक, तरीही दररोज चालवतात टॅक्सी; का?
20
T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन संघात फिरकीपटूंचा भरणा! ३ अनफिट खेळाडूंचीही वर्ल्ड कपसाठी निवड
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांमार्फतच रस्त्यांची देखभाल

By admin | Updated: May 8, 2017 00:57 IST

कंत्राटदारांमार्फतच रस्त्यांची देखभाल

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अपुरे मनुष्यबळ, नवीन भरतीवर असलेल्या निर्बंधांमुळे रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती कंत्राटदारांमार्फतच करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. ‘वार्षिक देखभाल करार’या अंतर्गत ही कामे करून घेतली जाणार असून लवकरच या कामाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. पावसाळ्यापासून राज्यभर या पद्धतीने देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. त्यामध्ये बहुतांशी रस्त्यांवर वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते. शक्यतो हे सर्व रस्ते जिल्ह्यांना आणि तालुक्यांना जोडणारे असल्याने त्याची देखभाल आणि दुरुस्ती ही सातत्यपूर्ण करणे आवश्यक असते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्यांची देखभाल करणे आणि दुरुस्ती करणे यावर कमालीच्या मर्यादा येत आहेत. खड्डे पडल्यानंतर मग बांधकाम विभागाची प्रक्रिया सुरू होणार. मग ते खड्डे भरले जाणार. त्यामध्ये विलंब होऊ लागला. अशातच निवृत्तीनंतर त्या जागा पुन्हा नवीन भरती करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नियमित देखभालीसाठीही विभागाकडे माणसे नाहीत. त्यामुळे मग रस्त्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती होत नाही. परिणामी या रस्त्यांकडे कुणाचेच लक्ष नाही, अशी परिस्थिती दिसते. त्यावर उपाय म्हणून आता ‘वार्षिक देखभाल करार’संकल्पना पुढे आली आहे. लवकरच या कामाच्या निविदा निघणार आहेत. काय आहे संकल्पना?जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची तालुकावर विभागणी करून त्या-त्या रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांचा निविदा काढण्यात येतील. इच्छुक आणि पात्र कंत्राटदारांना निविदेनुसार रस्ता मंजूर करण्यात येईल. त्या रस्त्यावरील तेवढ्या अंतरावरील रस्त्याची दोन वर्षे देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी त्या कंत्राटदारावर राहील. सातत्याने त्या कंत्राटदाराचे त्याला मंजूर रस्त्यावर लक्ष राहणार असल्याने ही देखभाल नीट होईल, अशी अपेक्षा या संकल्पनेमागे आहे. ही कामे केली जातीलखड्डे भरणे, बाजूपट्ट्यांची दुरुस्ती, गवत काढणे, झाडांच्या वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फांद्या काढणे, गटार काढणे, रस्त्यावर येणाऱ्या पाण्याची निर्गत करणे, पुलाचे तुटलेले रेलिंग बसवणे, कडेची सरकारी झाडे रंगवणे, वाहतुकीच्या नियमनासाठी आवश्यक असे फलक उभारणे ही सर्व कामे या कंत्राटदाराला करावी लागतील. कामे होतील त्या पद्धतीने तो बिले विभागाकडे सादर करेल व कामाची खातरजमा करून बिले अदा केली जातील. ४८ तासांत खड्डा भरणारया संकल्पनेच्या माध्यमातून रस्त्यावर खड्डा पडल्यानंतर तो ४८ तासांत भरला जाईल. त्यामुळे खड्डे मोठे होऊन त्याचा वाहतुकीला त्रास होणार नाही, अशी अपेक्षा अधिकारी व्यक्त करत आहेत. दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार असल्याने रस्ते नेहमी नीटनेटके राहतील आणि नागरिकांसाठी सोयीचे ठरतील, असाही विश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत.