शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते मूल्यांकनाचा भार महापालिकेवर

By admin | Updated: February 27, 2015 00:17 IST

१५ लाखांचा खर्च अपेक्षित : प्रशासन घेणार विधितज्ज्ञांचा अभिप्राय

कोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाचे नेमके मूल्य ठरविण्यासाठी नेमलेल्या संतोषकुमार समितीने अपूर्ण २५ कोटींची कामे व दर्जा तपासण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविली आहे. यासाठी स्वतंत्र एजन्सीच्या पुनर्मूल्यांकनाचा १५ लाखांचा भार मात्र मनपावर पडणार आहे. हा खर्च करायचा किंवा नाही, याबाबत विधितज्ज्ञांचे मत घेण्याचे गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठरले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती आदिल फरास होते.रस्ते प्रकल्पासाठी पुनर्मूल्यांकन करताना मागील केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल वापरू नये. त्याऐवजी रस्त्यांच्या कामात लांबी व रुंदीतील असणारी तफावत समोर येण्यासाठी आर्किटेक्ट असोसिएशनच्या मदतीने पुन्हा सर्वेक्षण करावे, अशी मागणी बुधवारी मुंबईत मूल्यांकन समितीच्या बैठकीत महापालिकेतर्फे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व आर्किटेक्ट असोसिएशनचे राजू सावंत यांनी केली होती. मात्र, हे मूल्यांकन महापालिकेच्या खर्चातून व्हावे, असा बैठकीचा सूर असल्याची माहिती प्रशासनाने स्थायी सदस्यांना बैठकीत दिली.पुनर्मूल्यांकन केल्याने मनपाचा पर्यायाने शहरवासीयांचाच फायदा होणार आहे. अद्याप २५ कोटी रुपयांची कामे प्रलंबित आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांची लांबी व रुंदी कमी आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च आणखी कमी होणार आहे. रस्त्यांचा दर्जा समोर आल्याने नेमकी किंमत पुढे येईल. पादचारी मार्ग अपूर्ण व उपयोगात आणता येण्यासारखे नाहीत. गटर्सची बांधणी केली आहे; मात्र पाणीच जात नाही. संपूर्ण प्रकल्पामुळे शहराचा जमीन स्तर उंचावला आहे. शहरात सध्या दोनशेहून अधिक ठिकाणी लहानशा पावसातही मोठी डबकी तयार होतात. या सर्वांचा यानिमित्ताने लेखा-जोखा मांडता येईल.रस्ते प्रकल्पात अनेक त्रुटी असल्याची फक्त चर्चाच आहे. मात्र, कागदावर याबाबत काहीही लेखा-जोखा मांडलेला नाही. यापूर्वी झालेल्या मूल्यांकनाच्या अहवालातील त्रुटींबाबत पुन्हा वादंग उठू शकते. सर्वांसमक्ष त्रयस्थ आर्किटेक्ट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली मूल्यांकन करणे एकूण सामाजिक व आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)फेरमूल्यांकनाचे फायदेसंपूर्ण प्रकल्पाची किंमत पारदर्शीपणे ठरेल.लांबी-रुंदीतील तफावतपुढे येईल.अपूर्ण कामांचा नेमकातपशील उघड होईल.करार व प्रत्यक्ष कामयातील तफावत समजेल.मनपाने मूल्यांकन केल्याने शंकेला वाव राहणार नाही.संतोषकुमार समितीचे लक्ष असल्याने सर्वेक्षण सर्वसमावेशक होईल.