शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांची मलमपट्टी

By admin | Updated: June 5, 2014 01:19 IST

मतांसाठी उपनगरांतील रस्त्यांवर डांबर : चार वर्षांपासून नागरिक प्रतीक्षेत

अमर पाटील ल्ल कळंबा येणार्‍या पालिका निवडणुकीचे महत्त्व जाणून आज उपनगरांतील लोकप्रतिनिधी झाडून वाट लागलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागे लागलेत. गेली चार वर्षे नागरिक मात्र ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ याचे उत्तर शोधण्यात मग्न होते. आता पावसाळ्यापूर्वी आपल्या विकासकामांची पावती नागरिकांपर्यंत जावी, यासाठी प्रतिनिधी रस्त्यावर फूटभर खडी डांबर ओतत रस्त्यांची मलमपट्टी करून घेण्यात मग्न आहेत. शहराच्या दक्षिणेस लागून असणारी संभाजीनगर, तपोवन, नाळे कॉलनी, राजलक्ष्मीनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, साळोखेनगर, सुर्वे कॉलनी, राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, कळंबा फिल्टर हाऊस, बोंद्रेनगर, शासकीय कारागृह, फुलेवाडी ही उपनगरे आज प्रचंड विस्तारत आहेत. त्यांचे हे चित्र आहे. काही कॉलन्यांची स्थापन होऊन वीस वर्षे झाली तरी त्या ठिकाणी अंतर्गत रस्ते नाहीत, तर काही ठिकाणी दुबार रस्ते तयार करण्यात आले आहेत. कॉलनी अंतर्गत रस्ते करतानाही राजकीय दुजाभाव केला जातो, अशी नागरिकांची तक्रार आहे. अल्प बजेटचे कारण सांगून वेळ मारून नेली जाते. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. नवीन रस्ता झाल्यावर नागरिकांना थोडे हायसे वाटत असतानाच ड्रेनेज किंवा अन्य कामांसाठी रस्ते पुन्हा उकरले जातात. ही किमया फक्त उपनगरांतच घडते. साई मंदिर ते फुलेवाडी रिंगरोड, कळंबा जेल ते देवकर पाणंद अशी नगरोत्थानची कामे रखडलेली आहेत. रिंगरोड रस्त्यास तीन वर्षे डांबर लागले नाही. पादचारी व वाहनधारकांचे चार रस्त्यावर अपघात नित्याचेच ठरलेत. मतांसाठी रस्त्यांची चाललेली धूळफेक पाहता नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी ना पालिका प्रशासन ना प्रतिनिधींना सोयरसूतक असल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्य रस्ते व कॉलनी अंतर्गत रस्ते पादचारी व वाहनधारकांसाठी मृत्यूचे सापळे बनताहेत. पावसाळ्यापूर्वी नागरिकांच्या या मूलभूत प्रश्नांचा पालिका प्रशासन व प्रतिनिधींनी विचार करावा, ही अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.