शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांची मलमपट्टी

By admin | Updated: June 5, 2014 01:19 IST

मतांसाठी उपनगरांतील रस्त्यांवर डांबर : चार वर्षांपासून नागरिक प्रतीक्षेत

अमर पाटील ल्ल कळंबा येणार्‍या पालिका निवडणुकीचे महत्त्व जाणून आज उपनगरांतील लोकप्रतिनिधी झाडून वाट लागलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागे लागलेत. गेली चार वर्षे नागरिक मात्र ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ याचे उत्तर शोधण्यात मग्न होते. आता पावसाळ्यापूर्वी आपल्या विकासकामांची पावती नागरिकांपर्यंत जावी, यासाठी प्रतिनिधी रस्त्यावर फूटभर खडी डांबर ओतत रस्त्यांची मलमपट्टी करून घेण्यात मग्न आहेत. शहराच्या दक्षिणेस लागून असणारी संभाजीनगर, तपोवन, नाळे कॉलनी, राजलक्ष्मीनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, साळोखेनगर, सुर्वे कॉलनी, राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, कळंबा फिल्टर हाऊस, बोंद्रेनगर, शासकीय कारागृह, फुलेवाडी ही उपनगरे आज प्रचंड विस्तारत आहेत. त्यांचे हे चित्र आहे. काही कॉलन्यांची स्थापन होऊन वीस वर्षे झाली तरी त्या ठिकाणी अंतर्गत रस्ते नाहीत, तर काही ठिकाणी दुबार रस्ते तयार करण्यात आले आहेत. कॉलनी अंतर्गत रस्ते करतानाही राजकीय दुजाभाव केला जातो, अशी नागरिकांची तक्रार आहे. अल्प बजेटचे कारण सांगून वेळ मारून नेली जाते. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. नवीन रस्ता झाल्यावर नागरिकांना थोडे हायसे वाटत असतानाच ड्रेनेज किंवा अन्य कामांसाठी रस्ते पुन्हा उकरले जातात. ही किमया फक्त उपनगरांतच घडते. साई मंदिर ते फुलेवाडी रिंगरोड, कळंबा जेल ते देवकर पाणंद अशी नगरोत्थानची कामे रखडलेली आहेत. रिंगरोड रस्त्यास तीन वर्षे डांबर लागले नाही. पादचारी व वाहनधारकांचे चार रस्त्यावर अपघात नित्याचेच ठरलेत. मतांसाठी रस्त्यांची चाललेली धूळफेक पाहता नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी ना पालिका प्रशासन ना प्रतिनिधींना सोयरसूतक असल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्य रस्ते व कॉलनी अंतर्गत रस्ते पादचारी व वाहनधारकांसाठी मृत्यूचे सापळे बनताहेत. पावसाळ्यापूर्वी नागरिकांच्या या मूलभूत प्रश्नांचा पालिका प्रशासन व प्रतिनिधींनी विचार करावा, ही अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.