शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

नदी म्हणजे आई, व्यक्ती, समाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नदी म्हणजे फक्त पाणी नव्हे, नदी म्हणजे जिवंत व्यक्ती, आपली आई व समाज होय. त्यामुळे नदी वाचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे मत मुंबई आय.आय.टी.चे प्रा. डॉ. श्याम असोलेकर यांनी कोल्हापुरात रविवारी व्यक्त केले.आठवा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रा. असोलेकर यांना ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. आर. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नदी म्हणजे फक्त पाणी नव्हे, नदी म्हणजे जिवंत व्यक्ती, आपली आई व समाज होय. त्यामुळे नदी वाचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे मत मुंबई आय.आय.टी.चे प्रा. डॉ. श्याम असोलेकर यांनी कोल्हापुरात रविवारी व्यक्त केले.आठवा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रा. असोलेकर यांना ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. भोसले यांच्या हस्ते ‘वसुंधरा’ सन्मानाने गौरविण्यात आले. त्यावेळी ते ‘नदी वाचवा - जीवन वाचवा’ या विषयावर बोलत होते. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या सन्मानाचे स्वरूप होते. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘किर्लोस्कर’चे व्हाईस प्रेसिडेंट (मार्केटिंग) संजीव निमकर, चंद्रहास रानडे, दळवीज आर्ट आॅफ इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवनात रात्री महोत्सवाचा समारोप झाला.श्याम असोलेकर म्हणाले, भारतात प्रमुख १४ नद्या आहेत. त्यांपैकी गंगा ही सर्वांत मोठी नदी आहे. तिचा अभ्यास मी केला आहे. नदीत प्राणी, कीटक, जंतू असतात; तसेच नदीकाठावर लोकवस्ती असते. त्यामुळे नदी म्हणजे हा एक समाज आहे. आपण २५ वर्षे पर्यावरणाचे रक्षण करतो आहे. त्यामुळे त्याच्या विकासासाठीचा हा लढा आहे. आज देशात ९० कोटी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. येथील अर्थव्यवस्था शेतीशी निगडित आहे. सुमारे सहा लाख खेडी असून, ५३ मोठी शहरे आहेत. विशेषत: नदी प्रदूषित होण्याचे मुख्य कारण नागरी वस्तीतील घनकचरा होय.सुभेदार म्हणाले, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये जिल्ह्यात चार लाख गणेश मूर्तिदान, तर १५०० ट्रॉली या निर्माल्य झाले. त्यामुळे नदी प्रदूषित होण्यापासून वाचली, याचा मला आनंद आहे. त्याचबरोबर १४४ कलम लावून डॉल्बी बंदी केला. याचे श्रेय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा व पोलीस प्रशासनाला जाते.संजीव निमकर यांनी, सात वर्षांपासून पर्यावरणपूरक हा विषय घेऊन हा महोत्सव राबवीत आहे. भारतभर असे कार्यक्रम कंपनीच्या वतीने करतो, असे सांगितले.यावेळी ‘सायबर’चा विद्यार्थी किशोर आरेकर, शाल्मली गोडसे व शिवाजी विद्यापीठाचा वीरेश शिवपुजे, तर युवा शास्त्रज्ञ अनिकेत कामत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. को-आॅर्डिनेशन कमिटीचे व्हाईस प्रेसिडेंट कृष्णा गावडे यांनी प्रास्ताविक, तर पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी स्वागत केले. यावेळी ‘किर्लोस्कर’चे चंद्रहास रानडे, वीरेंद्र चित्राव, प्रा. रवी निकम, आदी उपस्थित होते.