शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नदी म्हणजे आई, व्यक्ती, समाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नदी म्हणजे फक्त पाणी नव्हे, नदी म्हणजे जिवंत व्यक्ती, आपली आई व समाज होय. त्यामुळे नदी वाचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे मत मुंबई आय.आय.टी.चे प्रा. डॉ. श्याम असोलेकर यांनी कोल्हापुरात रविवारी व्यक्त केले.आठवा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रा. असोलेकर यांना ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. आर. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नदी म्हणजे फक्त पाणी नव्हे, नदी म्हणजे जिवंत व्यक्ती, आपली आई व समाज होय. त्यामुळे नदी वाचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे मत मुंबई आय.आय.टी.चे प्रा. डॉ. श्याम असोलेकर यांनी कोल्हापुरात रविवारी व्यक्त केले.आठवा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रा. असोलेकर यांना ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. भोसले यांच्या हस्ते ‘वसुंधरा’ सन्मानाने गौरविण्यात आले. त्यावेळी ते ‘नदी वाचवा - जीवन वाचवा’ या विषयावर बोलत होते. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या सन्मानाचे स्वरूप होते. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘किर्लोस्कर’चे व्हाईस प्रेसिडेंट (मार्केटिंग) संजीव निमकर, चंद्रहास रानडे, दळवीज आर्ट आॅफ इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवनात रात्री महोत्सवाचा समारोप झाला.श्याम असोलेकर म्हणाले, भारतात प्रमुख १४ नद्या आहेत. त्यांपैकी गंगा ही सर्वांत मोठी नदी आहे. तिचा अभ्यास मी केला आहे. नदीत प्राणी, कीटक, जंतू असतात; तसेच नदीकाठावर लोकवस्ती असते. त्यामुळे नदी म्हणजे हा एक समाज आहे. आपण २५ वर्षे पर्यावरणाचे रक्षण करतो आहे. त्यामुळे त्याच्या विकासासाठीचा हा लढा आहे. आज देशात ९० कोटी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. येथील अर्थव्यवस्था शेतीशी निगडित आहे. सुमारे सहा लाख खेडी असून, ५३ मोठी शहरे आहेत. विशेषत: नदी प्रदूषित होण्याचे मुख्य कारण नागरी वस्तीतील घनकचरा होय.सुभेदार म्हणाले, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये जिल्ह्यात चार लाख गणेश मूर्तिदान, तर १५०० ट्रॉली या निर्माल्य झाले. त्यामुळे नदी प्रदूषित होण्यापासून वाचली, याचा मला आनंद आहे. त्याचबरोबर १४४ कलम लावून डॉल्बी बंदी केला. याचे श्रेय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा व पोलीस प्रशासनाला जाते.संजीव निमकर यांनी, सात वर्षांपासून पर्यावरणपूरक हा विषय घेऊन हा महोत्सव राबवीत आहे. भारतभर असे कार्यक्रम कंपनीच्या वतीने करतो, असे सांगितले.यावेळी ‘सायबर’चा विद्यार्थी किशोर आरेकर, शाल्मली गोडसे व शिवाजी विद्यापीठाचा वीरेश शिवपुजे, तर युवा शास्त्रज्ञ अनिकेत कामत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. को-आॅर्डिनेशन कमिटीचे व्हाईस प्रेसिडेंट कृष्णा गावडे यांनी प्रास्ताविक, तर पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी स्वागत केले. यावेळी ‘किर्लोस्कर’चे चंद्रहास रानडे, वीरेंद्र चित्राव, प्रा. रवी निकम, आदी उपस्थित होते.